शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खटाव परिसरातील शेतकरी पेरणी कामात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:04 IST

सध्या परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने खटावसह परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पेरण्यामध्ये व्यस्त झाला आहे. त्यामुळे शेतामध्ये तसेच शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतात गवताचे साम्राज्य रब्बी पीक कसे घ्यायचे याची चिंतासर्व शिवारात सध्या पेरण्याची लगबग सुरू

खटाव : सध्या परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने खटावसह परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पेरण्यामध्ये व्यस्त झाला आहे. त्यामुळे शेतामध्ये तसेच शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.खटाव तसेच परिसरातील गावांमध्ये परतीच्या पावसाने चांगलीच हजेर लावली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिके काढणीस विलंब झाला. त्याचबरोबर मोठ्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसानही झाले.

त्यातच खरीप पिके शेतातच असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पूर्व कोणतीच मशागत करता आले नाही. त्यामुळे रब्बी पीक कसे घ्यायचे याची चिंता लागून राहिली होती. सध्या पडलेल्या उघडीपीमुळे शेतकरी पुन्हा एकदा कामात व्यस्त झाला आहे.

पावसामुळे शेतात सर्वत्र गवताचे साम्राज्य वाढल्यामुळे शेतकऱ्यांसमोर पहिल्यांदा त्याचा बंदोबस्त करण्याची समस्या उभी राहिली आहे. मजूर लावून ती स्वच्छता करून रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू असल्याचे चित्र सध्या खटाव परिसरात पाहायला मिळत आहे.

रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा व अन्य पिकांच्या पेरण्याची लगबग सध्या सर्व शिवारात सुरू आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी