शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने आणली स्ट्रॉबेरी उत्पादकांना अवकळा! राज्यात १५० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:13 IST

या पिकाला थंड हवामान लागते, तर रोपाला वर्षातून किमान १५० तास तरी चिलिंगचे वातावरण आवश्यक असते. असे वातावरणच फळाला पोषक ठरते. या फळाचे राज्यातील पाच हजारांहून अधिक शेतकरी उत्पादन घेतात. तर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या चार हजारांवर आहे.

ठळक मुद्देसततचा पाऊसही कारणीभूत । ६० टक्के मालाचे नुकसान, यावर्षी १४ हजार टनच उत्पादन

नितीन काळेल।सातारा : सततच्या आणि अवकाळी पावसामुळे या वर्षी राज्यातील साडेतीनपैकी दोन हजार एकरांवरील स्ट्रॉबेरीचे पीक संपले आहे. त्यामुळे ४० टक्केच उत्पादन हाती येणार असून, त्यालाही दर्जा नसेल. परिणामी, दरही मिळणार नसल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक कोलमडणार आहेत. त्यातच दर वर्षी सुमारे ३० हजार टन उत्पादन होते. यंदा ते १२ ते १४ हजार टन होऊन उत्पादकांना १५० कोटी रुपयांचा तोटा होण्याचा अंदाज आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात राज्यात सर्वांत अधिक स्ट्रॉबेरीचे उत्पादन होते. ब्रिटिश आल्यापासून येथे स्ट्रॉबेरी घेतली जाते. पूर्वी स्ट्रॉबेरीचे क्षेत्र थोडे होते; मात्र १९९४नंतर क्षेत्राचा विस्तार झाला. सद्य:स्थितीत राज्यात स्ट्रॉबेरीचे क्षेत्र अंदाजे साडेतीन हजार एकर असून, सातारा जिल्ह्यात ते तीन हजार एकरांवर आहे. तर, एकट्या महाबळेश्वर तालुक्यात दोन हजार एकरांवर स्ट्रॉबेरी होते. म्हणजेच अर्ध्यापेक्षा अधिक उत्पन्न एकट्या महाबळेश्वर तालुक्यातच होते.

या पिकाला थंड हवामान लागते, तर रोपाला वर्षातून किमान १५० तास तरी चिलिंगचे वातावरण आवश्यक असते. असे वातावरणच फळाला पोषक ठरते. या फळाचे राज्यातील पाच हजारांहून अधिक शेतकरी उत्पादन घेतात. तर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या चार हजारांवर आहे. स्ट्रॉबेरी थंड हवामानाच्या भागात होत असल्याने दर वर्षी ५० एकरांपर्यंत कमी किंवा जास्त क्षेत्र निर्माण होते. या वर्षी हे क्षेत्र थोडेस वाढले; पण टिकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याला कारण म्हणजे सततचा आणि अवकाळी पाऊस.

  • राज्यात पाच महिने पाऊस राहिला. त्यामुळे साडेतीन हजारांपैकी दोन हजार एकरांवरील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ६० टक्के फळे वाया गेलीत.

 

  • 100 या स्ट्रॉबेरीची वार्षिक उलाढाल २०० ते २५० कोटींची आहे. या वर्षी कशीबशी १०० कोटी रुपयांचीच उलाढाल होऊ शकते. त्यातून केलेला खर्चही काढणे अवघड आहे. एकंदरीतच, स्ट्रॉबेरीचे अधिक उत्पादन नाही. आहे त्या मालाला दर्जा नाही. आताच दर पडलेत, ते वाढणे अवघड आहे. त्यामुळे अशा स्थितीतून पुन्हा उभारी घेणे उत्पादकांना सहजासहजी शक्य नाही.

 

 

स्ट्रॉबेरी हा नाशवंत माल आहे. यावर प्रक्रिया होणे महत्त्वाचे असते. उत्पादन वाढले तर विक्री होणे आवश्यकच असते. त्यामुळे उत्पादकांना थेट विक्रीला परवानगी मिळावी. तसेच या वर्षी सततच्या आणि अवकाळी पावसामुळे ६० टक्के क्षेत्रावरील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. सर्वांत महागडे हे फळ असून, आताच्या नुकसानामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे या फळाला विम्याचे कवच देण्याची खरी गरज आहे. - बाळासाहेब भिलारे

 --अध्यक्ष स्ट्रॉबेरी ग्रोअर्स असोसिएशन आॅफ इंडिया

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजारRainपाऊस