शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

अवकाळीने आणली स्ट्रॉबेरी उत्पादकांना अवकळा! राज्यात १५० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:13 IST

या पिकाला थंड हवामान लागते, तर रोपाला वर्षातून किमान १५० तास तरी चिलिंगचे वातावरण आवश्यक असते. असे वातावरणच फळाला पोषक ठरते. या फळाचे राज्यातील पाच हजारांहून अधिक शेतकरी उत्पादन घेतात. तर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या चार हजारांवर आहे.

ठळक मुद्देसततचा पाऊसही कारणीभूत । ६० टक्के मालाचे नुकसान, यावर्षी १४ हजार टनच उत्पादन

नितीन काळेल।सातारा : सततच्या आणि अवकाळी पावसामुळे या वर्षी राज्यातील साडेतीनपैकी दोन हजार एकरांवरील स्ट्रॉबेरीचे पीक संपले आहे. त्यामुळे ४० टक्केच उत्पादन हाती येणार असून, त्यालाही दर्जा नसेल. परिणामी, दरही मिळणार नसल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक कोलमडणार आहेत. त्यातच दर वर्षी सुमारे ३० हजार टन उत्पादन होते. यंदा ते १२ ते १४ हजार टन होऊन उत्पादकांना १५० कोटी रुपयांचा तोटा होण्याचा अंदाज आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात राज्यात सर्वांत अधिक स्ट्रॉबेरीचे उत्पादन होते. ब्रिटिश आल्यापासून येथे स्ट्रॉबेरी घेतली जाते. पूर्वी स्ट्रॉबेरीचे क्षेत्र थोडे होते; मात्र १९९४नंतर क्षेत्राचा विस्तार झाला. सद्य:स्थितीत राज्यात स्ट्रॉबेरीचे क्षेत्र अंदाजे साडेतीन हजार एकर असून, सातारा जिल्ह्यात ते तीन हजार एकरांवर आहे. तर, एकट्या महाबळेश्वर तालुक्यात दोन हजार एकरांवर स्ट्रॉबेरी होते. म्हणजेच अर्ध्यापेक्षा अधिक उत्पन्न एकट्या महाबळेश्वर तालुक्यातच होते.

या पिकाला थंड हवामान लागते, तर रोपाला वर्षातून किमान १५० तास तरी चिलिंगचे वातावरण आवश्यक असते. असे वातावरणच फळाला पोषक ठरते. या फळाचे राज्यातील पाच हजारांहून अधिक शेतकरी उत्पादन घेतात. तर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या चार हजारांवर आहे. स्ट्रॉबेरी थंड हवामानाच्या भागात होत असल्याने दर वर्षी ५० एकरांपर्यंत कमी किंवा जास्त क्षेत्र निर्माण होते. या वर्षी हे क्षेत्र थोडेस वाढले; पण टिकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याला कारण म्हणजे सततचा आणि अवकाळी पाऊस.

  • राज्यात पाच महिने पाऊस राहिला. त्यामुळे साडेतीन हजारांपैकी दोन हजार एकरांवरील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ६० टक्के फळे वाया गेलीत.

 

  • 100 या स्ट्रॉबेरीची वार्षिक उलाढाल २०० ते २५० कोटींची आहे. या वर्षी कशीबशी १०० कोटी रुपयांचीच उलाढाल होऊ शकते. त्यातून केलेला खर्चही काढणे अवघड आहे. एकंदरीतच, स्ट्रॉबेरीचे अधिक उत्पादन नाही. आहे त्या मालाला दर्जा नाही. आताच दर पडलेत, ते वाढणे अवघड आहे. त्यामुळे अशा स्थितीतून पुन्हा उभारी घेणे उत्पादकांना सहजासहजी शक्य नाही.

 

 

स्ट्रॉबेरी हा नाशवंत माल आहे. यावर प्रक्रिया होणे महत्त्वाचे असते. उत्पादन वाढले तर विक्री होणे आवश्यकच असते. त्यामुळे उत्पादकांना थेट विक्रीला परवानगी मिळावी. तसेच या वर्षी सततच्या आणि अवकाळी पावसामुळे ६० टक्के क्षेत्रावरील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. सर्वांत महागडे हे फळ असून, आताच्या नुकसानामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे या फळाला विम्याचे कवच देण्याची खरी गरज आहे. - बाळासाहेब भिलारे

 --अध्यक्ष स्ट्रॉबेरी ग्रोअर्स असोसिएशन आॅफ इंडिया

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजारRainपाऊस