शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
3
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
4
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
5
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
6
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
7
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
8
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
9
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
10
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
11
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
12
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
13
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
14
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
15
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
16
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
17
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
18
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
19
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
20
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर

फलटणकरांना काळजी ‘काजळी’ची!

By admin | Updated: January 13, 2015 00:16 IST

कारखान्याचे कानावर हात : प्रदूषण मंडळाचेही सोयीस्कर दुर्लक्ष

फलटण : येथील श्रीराम जवाहर साखर उद्योग कारखान्याच्या काजळीने फलटण व आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्रस्त केले असून, सारखी काजळी डोळ्यात जाऊन डोळ्यांना दुखापती होऊ लागल्या आहेत. काजळीने हैराण झालेल्या नागरिकांकडून कारखाना व प्रदूषण नियंत्रण मंडळ आता काय लोकांची आंधळे होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.फलटण शहरात पंढरपूर रोडवर श्रीराम सहकारी साखर कारखाना असून, हा कारखाना जवाहर उद्योगाने भागीदारी तत्त्वावर चालविण्यास घेतला आहे व त्याचे नामकरण ‘श्रीराम जवाहर उद्योग’ असे केले आहे. साखर कारखान्याच्या हंगामात दरवेळी कारखान्यातून निघणाऱ्या काजळीचा नागरिकांना त्रास होत असतो. मात्र, यावर्षी हा त्रास खूपच वाढला आहे.कारखान्यातून निघणारी काळी काजळी (राख) मोठ्या प्रमाणात बाहेर पसरून वाहनचालक व पायी जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात जात आहे. काजळी डोळ्यातगेल्यावर डोळ्यांची भयंकर आगआग होत आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या तर डोळ्यांत हमखास ही काजळी जात असून, यामुळे अपघाताचेही वारंवार प्रकार घडले गेले आहेत. काजळीमुळे डोळे चोळून आग होण्याने बराचवेळ डोळ्यापुढे अंधारी येत आहे.कारखान्यातून बाहेर पडलेली काजळी घराबाहेर वाळत टाकलेल्या कपड्यांवर पडून कपडेही खराब होत आहेत. घरातही खिडकीवाटे काजळी आत येऊन भांड्यावर बसत आहे. शहर व परिसरात अनेकजण अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री करीत असतात. यावरही ही काजळी पडून ती काजळी अन्नावाटे पोटात जात आहे व याचा परिणाम पोटदुखीवरही होत आहे. काजळीमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले असून, काजळी नियंत्रणात आणण्यासाठी असणारी यंत्रणा कारखान्याने बसविली नसल्याने काजळी सर्वत्र पसरून याचा त्रास नागरिकांना होत आहे. काजळी संदर्भात वारंवार कारखान्याला कळवूनही कारखाना प्रशासन लक्षच देत नसल्याचे दिसून येते. प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबतची माहिती असूनही ते आंधळेपणाचे ढोंग घेत सुस्त आहे. कारखान्यातून निघणाऱ्या काजळीबाबत मी कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन वारंवार समक्ष त्यांना यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. काजळीच्या भयानक त्रास नागरिकांना होत असल्याने व मी स्वत: प्रत्यक्ष हा त्रास अनुभवल्याने आता कारखाना प्रशासन लक्ष देत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करणार आहे. तसेच वेळप्रसंगी मनसे स्टाईलने आंदोलन करू.- युवराज शिंदे, मनसे, उपजिल्हाप्रमुखडोळ्यात काजळी गेल्याने आग होते. डोळे सुजणे, लाल होणे असे प्रकार होतात. नाका-तोंडात काजळी गेल्याने धाप लागते. एखाद्याला मधुमेह ुअसल्यास त्याच्या डोळ्यात काजळी जाऊन दुखापत झाल्यास गंभीर परिस्थिती उद्भवते. काजळीचा त्रास तातडीने बंद झाला पाहिजे. - डॉ. सुभाष गुळवे, आरोग्याच्या तक्रारी वाढल्याकारखान्यातील काजळीचा त्रास फलटणकरांना चांगलाच होत आहे. या त्रासातून ना चिमुकल्यांची सुटका ना ज्येष्ठांची. डोळ्यातून वाहणारे पाणी पुसुन कधी यातून सुटका मिळणार असा सवाल स्थानिकांना पडला आहे. तर निद्रिस्त अवस्थेत असलेल्या प्रदुषण महामंडळानेही याकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.