शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

जिल्ह्यात आठ दिवसांपासून थंडीचा मुक्काम!, शेती कामांसह बाजारपेठेवरही परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 13:46 IST

सातारा : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून थंडीचा मुक्काम असून शुक्रवारी तर साताऱ्यात १४.२ आणि महाबळेश्वरला १०.५ अंश किमान तापमानाची ...

सातारा : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून थंडीचा मुक्काम असून शुक्रवारी तर साताऱ्यात १४.२ आणि महाबळेश्वरला १०.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. यामुळे गारठा कायम असल्याने शेती कामांसह बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.जिल्ह्यातील पारा मागील आठ दिवसांपासून घसरला आहे. यामुळे थंडीची तीव्रता वाढत चालली आहे. सायंकाळी सातनंतर थंडीला सुरुवात होते. तर पहाटेच्या सुमारास कडाका पडत आहे. यामुळे शहरातील बाजारपेठेसह ग्रामीण भागातील शेती कामावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.सातारा शहराचे किमान तापमानही गेल्या आठ दिवसांत १६ अंशावरुन कमी-कमी होत गेले. रविवारी तर १३.०६ अंश तापमान नोंद झाले होते. पण, सोमवारी तापमान वाढून १४.०९ अंशावर पोहोचले. पण, त्यानंतर तापमानात उतार आला. शुक्रवारी तर १४.२ अंश तापमानाची नोंद झाली.त्यातच शीतलहर असल्याने गारठा चांगलाच जाणवत आहे. यामुळे सकाळी ११ पर्यंत हवेत गारठा राहत आहे. यामुळे नागरिकांना ऊबदार कपडे घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे. तर सकाळच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे.महाबळेश्वरचा पाराही घसरला आहे. मागील चार दिवसांपूर्वी सलग दोन दिवस पारा १० अंशाच्या खाली राहिला. तर मंगळवारी या वर्षातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यावेळी महाबळेश्वरला ८.८ अंश इतके तापमान नोंद झाले होते. यामुळे महाबळेश्वरसह परिसरातील गारठ्यात वाढ झाली आहे.

सातारा शहरातील नोंद किमान तापमान...२० जानेवारी १६.०१,२१ जानेवारी १५.०६,२२ जानेवारी १४.०२,२३ जानेवारी १३.०६,२४ जानेवारी १४.०९,२५ जानेवारी १४,२६ जानेवारी १३.०६,२७ जानेवारी १४.०७२८ जानेवारी १४.०२

टॅग्स :Satara areaसातारा परिसर