शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

डाळिंब उत्पादकच बनणार आता निर्यातदार! दुप्पट-तिप्पट लाभ : व्यापाऱ्याला न देता स्वत:च करणार विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:32 IST

डाळिंबातून चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा करतात; परंतु व्यापाºयांना डाळिंब देण्याने चार पैसे कमी मिळतात.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील शेतकरी होणार आर्थिक सक्षम

नितीन काळेल।सातारा : डाळिंबातून चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा करतात; परंतु व्यापाºयांना डाळिंब देण्याने चार पैसे कमी मिळतात. त्यासाठी शेतकºयांनी स्वत: निर्यातदार व्हावे, यासाठी सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने त्यासाठी पाऊल उचलले असून, त्यांच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मार्गदर्शनातून शेतकºयांना निर्यातदार होता येणार असून, व्यापाºयाला फळे न देण्याने दुप्पट, तिप्पट पैसे मिळणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. अनेक शेतकरी पूर्णपणे डाळिंब पिकांवर अवलंबून आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब घेतले जात आहे. अनेक शेतकºयांचे डाळिंब युरोप, आखाती देशात निर्यात होत आहे; पण हे डाळिंब व्यापाºयांच्या माध्यमातून जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हाती चांगला दर लागत नाही. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने डाळिंब उत्पादक शेतकºयांसाठी एक पाऊल उचलले आहे. या कार्यालयाने जिल्ह्यातील १०० शेतकºयांना डाळिंब उत्पादनाविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे. या माध्यामातून शेतकºयांना डाळिंबाचे व्यवस्थापन, खते, औषधे यांचे प्रमाण, कागदपत्रे, पत्रव्यवहार, डाळिंब निर्यात करायचे असेल तर त्याच्या अटी, नियम काय आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

बाहेरील देशात डाळिंब निर्यात करायचे झाल्यास त्याचे वजन हे २५० ग्रॅमच्या पुढे असणे आवश्यक आहे. ते कीडरोग मुक्त व कीडनाशक उर्वरित अंश विरहित असणेही गरजेचे आहे. असे डाळिंब कंटेनरमधून पाठविली जातात. एका कंटेनरमध्ये साधारणपणे १२ ते २० टन डाळिंब बसतात. त्याची वाहतूक तीन ते पाच डिग्री सेल्सिअस अंशामध्ये केली जाते, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकºयांना मिळाली तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.व्यापाºयांचा हस्तक्षेप नसणार...जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब बाजारात आपला माल घेऊन जातात. तेथे व्यापारी खरेदी करतात. त्यावेळी व्यापारी म्हणेल तो दर असतो. तर काही व्यापारी शेतकºयांच्या बांधावर येऊन डाळिंब घेऊन जातात. चांगला माल व्यापारी बाहेरील देशात निर्यात करतात. माल शेतकºयांचा; पण फायदा व्यापाºयांचा होतो. त्यातून व्यापाºयांनाच अधिक पैसे मिळतात. शेतकºयांनी स्वत:च माल निर्यात केला तर दुप्पट, तिप्पट अधिक पैसे मिळणार आहेत. त्यातून शेतकºयांचे आर्थिक जीवनमान अधिक उंचावणार आहे. तर सातारा जिल्ह्यात सध्या हजारो शेतकरी डाळिंब घेतात. त्यांना यामुळे अधिक पैसे मिळणार आहेत. एकंदरीतच शेतकºयांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती येण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी