शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

डाळिंब उत्पादकच बनणार आता निर्यातदार! दुप्पट-तिप्पट लाभ : व्यापाऱ्याला न देता स्वत:च करणार विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:32 IST

डाळिंबातून चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा करतात; परंतु व्यापाºयांना डाळिंब देण्याने चार पैसे कमी मिळतात.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील शेतकरी होणार आर्थिक सक्षम

नितीन काळेल।सातारा : डाळिंबातून चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा करतात; परंतु व्यापाºयांना डाळिंब देण्याने चार पैसे कमी मिळतात. त्यासाठी शेतकºयांनी स्वत: निर्यातदार व्हावे, यासाठी सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने त्यासाठी पाऊल उचलले असून, त्यांच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मार्गदर्शनातून शेतकºयांना निर्यातदार होता येणार असून, व्यापाºयाला फळे न देण्याने दुप्पट, तिप्पट पैसे मिळणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. अनेक शेतकरी पूर्णपणे डाळिंब पिकांवर अवलंबून आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब घेतले जात आहे. अनेक शेतकºयांचे डाळिंब युरोप, आखाती देशात निर्यात होत आहे; पण हे डाळिंब व्यापाºयांच्या माध्यमातून जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हाती चांगला दर लागत नाही. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने डाळिंब उत्पादक शेतकºयांसाठी एक पाऊल उचलले आहे. या कार्यालयाने जिल्ह्यातील १०० शेतकºयांना डाळिंब उत्पादनाविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे. या माध्यामातून शेतकºयांना डाळिंबाचे व्यवस्थापन, खते, औषधे यांचे प्रमाण, कागदपत्रे, पत्रव्यवहार, डाळिंब निर्यात करायचे असेल तर त्याच्या अटी, नियम काय आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

बाहेरील देशात डाळिंब निर्यात करायचे झाल्यास त्याचे वजन हे २५० ग्रॅमच्या पुढे असणे आवश्यक आहे. ते कीडरोग मुक्त व कीडनाशक उर्वरित अंश विरहित असणेही गरजेचे आहे. असे डाळिंब कंटेनरमधून पाठविली जातात. एका कंटेनरमध्ये साधारणपणे १२ ते २० टन डाळिंब बसतात. त्याची वाहतूक तीन ते पाच डिग्री सेल्सिअस अंशामध्ये केली जाते, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकºयांना मिळाली तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.व्यापाºयांचा हस्तक्षेप नसणार...जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब बाजारात आपला माल घेऊन जातात. तेथे व्यापारी खरेदी करतात. त्यावेळी व्यापारी म्हणेल तो दर असतो. तर काही व्यापारी शेतकºयांच्या बांधावर येऊन डाळिंब घेऊन जातात. चांगला माल व्यापारी बाहेरील देशात निर्यात करतात. माल शेतकºयांचा; पण फायदा व्यापाºयांचा होतो. त्यातून व्यापाºयांनाच अधिक पैसे मिळतात. शेतकºयांनी स्वत:च माल निर्यात केला तर दुप्पट, तिप्पट अधिक पैसे मिळणार आहेत. त्यातून शेतकºयांचे आर्थिक जीवनमान अधिक उंचावणार आहे. तर सातारा जिल्ह्यात सध्या हजारो शेतकरी डाळिंब घेतात. त्यांना यामुळे अधिक पैसे मिळणार आहेत. एकंदरीतच शेतकºयांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती येण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी