शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

डाळिंब उत्पादकच बनणार आता निर्यातदार! दुप्पट-तिप्पट लाभ : व्यापाऱ्याला न देता स्वत:च करणार विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:32 IST

डाळिंबातून चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा करतात; परंतु व्यापाºयांना डाळिंब देण्याने चार पैसे कमी मिळतात.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील शेतकरी होणार आर्थिक सक्षम

नितीन काळेल।सातारा : डाळिंबातून चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा करतात; परंतु व्यापाºयांना डाळिंब देण्याने चार पैसे कमी मिळतात. त्यासाठी शेतकºयांनी स्वत: निर्यातदार व्हावे, यासाठी सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने त्यासाठी पाऊल उचलले असून, त्यांच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मार्गदर्शनातून शेतकºयांना निर्यातदार होता येणार असून, व्यापाºयाला फळे न देण्याने दुप्पट, तिप्पट पैसे मिळणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. अनेक शेतकरी पूर्णपणे डाळिंब पिकांवर अवलंबून आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब घेतले जात आहे. अनेक शेतकºयांचे डाळिंब युरोप, आखाती देशात निर्यात होत आहे; पण हे डाळिंब व्यापाºयांच्या माध्यमातून जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हाती चांगला दर लागत नाही. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने डाळिंब उत्पादक शेतकºयांसाठी एक पाऊल उचलले आहे. या कार्यालयाने जिल्ह्यातील १०० शेतकºयांना डाळिंब उत्पादनाविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे. या माध्यामातून शेतकºयांना डाळिंबाचे व्यवस्थापन, खते, औषधे यांचे प्रमाण, कागदपत्रे, पत्रव्यवहार, डाळिंब निर्यात करायचे असेल तर त्याच्या अटी, नियम काय आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

बाहेरील देशात डाळिंब निर्यात करायचे झाल्यास त्याचे वजन हे २५० ग्रॅमच्या पुढे असणे आवश्यक आहे. ते कीडरोग मुक्त व कीडनाशक उर्वरित अंश विरहित असणेही गरजेचे आहे. असे डाळिंब कंटेनरमधून पाठविली जातात. एका कंटेनरमध्ये साधारणपणे १२ ते २० टन डाळिंब बसतात. त्याची वाहतूक तीन ते पाच डिग्री सेल्सिअस अंशामध्ये केली जाते, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकºयांना मिळाली तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.व्यापाºयांचा हस्तक्षेप नसणार...जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब बाजारात आपला माल घेऊन जातात. तेथे व्यापारी खरेदी करतात. त्यावेळी व्यापारी म्हणेल तो दर असतो. तर काही व्यापारी शेतकºयांच्या बांधावर येऊन डाळिंब घेऊन जातात. चांगला माल व्यापारी बाहेरील देशात निर्यात करतात. माल शेतकºयांचा; पण फायदा व्यापाºयांचा होतो. त्यातून व्यापाºयांनाच अधिक पैसे मिळतात. शेतकºयांनी स्वत:च माल निर्यात केला तर दुप्पट, तिप्पट अधिक पैसे मिळणार आहेत. त्यातून शेतकºयांचे आर्थिक जीवनमान अधिक उंचावणार आहे. तर सातारा जिल्ह्यात सध्या हजारो शेतकरी डाळिंब घेतात. त्यांना यामुळे अधिक पैसे मिळणार आहेत. एकंदरीतच शेतकºयांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती येण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी