शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

विमानतळ विस्तारवाढीसंदर्भात भूमिका स्पष्ट करा

By admin | Updated: May 19, 2015 00:32 IST

नामदेव पाटील : कऱ्हाडात विस्तारवाढ बाधित समितीची प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा

कऱ्हाड : ‘सध्याच्या शासनाची विस्तारवाढीसंदर्भातील भूमिका स्पष्ट होत नसल्याने त्यांच्याकडून नक्की विमानतळ विस्तारवाढ केली जाणार आहे की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही. सरकार जर विमानतळ विस्तारवाढ करणार असेल, तर त्यासंदर्भात त्यांनी तत्काळ जमिनीचा दर स्पष्ट करावा, तसेच विमानतळ विस्तारवाढीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असे प्रतिपादन कऱ्हाड विमानतळ विस्तावरवाढ बाधित शेतकरी समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी केले.कऱ्हाड येथे सोमवारी कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर शिंदे, सचिव अ‍ॅड. शिवाजी पाटील, अ‍ॅड. प्रकाश चव्हाण, शिवाजी धुमाळ, भास्करराव धुमाळ, जगन्नाथ पाटील, राजेंद्र पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र शिंदे, जनार्दन पाटील, बाबासाहेब शिंदे, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी किशोर पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वारुंजी, केसे, मुंढे, विजयनगर या गावांतील विस्तारवाढ बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. प्रांताधिकारी यांच्याशी विमानतळ विस्तारवाढसंदर्भातील शासनाची नेमकी कोणती भूमिका आहे. जमिनीच्या दराबाबत शासन केव्हा निर्णय घेणार आदीविषयी विस्तारवाढ बाधित शेतकऱ्यांनी चर्चा केली. विमानतळ विस्तारीकरण, जमिनीचे दर, अशा विषयावर विस्तारवाढ बाधित समितीच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी समितीतर्फे दिलेल्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांपासून शासनाने कऱ्हाड विमानतळ हद्दवाढप्रक्रिया सुरू केलेली आहे. शासनाकडून विस्तारवाढीची मोजणीप्रक्रिया पूर्ण झाली आहे. विस्तारवाढीसंदर्भात संघटनेने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी जमिनीस प्रतिगुंठा तीन लाख पन्नास हजार रुपये अशी दराविषयी चर्चा झाली होती. त्याप्रमाणे विस्तारवाढ बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी प्रतिगुंठा दहा लाखांप्रमाणे विमानतळ विस्तारवाढ करण्यासाठीची मागणी केली होती. मात्र, तो प्रश्न प्रलंबित राहिला. (प्रतिनिधी) अन्यथा आत्मदहन करू...सध्या सरकारच बदलले असल्याने विमानतळ विस्तारवाढीबाबत शेतकऱ्यांची संभ्रमावस्था झाली आहे. शासनाकडून देखील योग्य निर्णय घेतला जात नसल्याने त्यांच्या धोरणासंदर्भात शेतकरी अनभिज्ञ आहेत. तरी शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा शेतकऱ्यांना आत्मदहन अथवा आठ दिवसांत उपोषण या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.