शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ विस्तारवाढीसंदर्भात भूमिका स्पष्ट करा

By admin | Updated: May 19, 2015 00:32 IST

नामदेव पाटील : कऱ्हाडात विस्तारवाढ बाधित समितीची प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा

कऱ्हाड : ‘सध्याच्या शासनाची विस्तारवाढीसंदर्भातील भूमिका स्पष्ट होत नसल्याने त्यांच्याकडून नक्की विमानतळ विस्तारवाढ केली जाणार आहे की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही. सरकार जर विमानतळ विस्तारवाढ करणार असेल, तर त्यासंदर्भात त्यांनी तत्काळ जमिनीचा दर स्पष्ट करावा, तसेच विमानतळ विस्तारवाढीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असे प्रतिपादन कऱ्हाड विमानतळ विस्तावरवाढ बाधित शेतकरी समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी केले.कऱ्हाड येथे सोमवारी कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर शिंदे, सचिव अ‍ॅड. शिवाजी पाटील, अ‍ॅड. प्रकाश चव्हाण, शिवाजी धुमाळ, भास्करराव धुमाळ, जगन्नाथ पाटील, राजेंद्र पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र शिंदे, जनार्दन पाटील, बाबासाहेब शिंदे, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी किशोर पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वारुंजी, केसे, मुंढे, विजयनगर या गावांतील विस्तारवाढ बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. प्रांताधिकारी यांच्याशी विमानतळ विस्तारवाढसंदर्भातील शासनाची नेमकी कोणती भूमिका आहे. जमिनीच्या दराबाबत शासन केव्हा निर्णय घेणार आदीविषयी विस्तारवाढ बाधित शेतकऱ्यांनी चर्चा केली. विमानतळ विस्तारीकरण, जमिनीचे दर, अशा विषयावर विस्तारवाढ बाधित समितीच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी समितीतर्फे दिलेल्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांपासून शासनाने कऱ्हाड विमानतळ हद्दवाढप्रक्रिया सुरू केलेली आहे. शासनाकडून विस्तारवाढीची मोजणीप्रक्रिया पूर्ण झाली आहे. विस्तारवाढीसंदर्भात संघटनेने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी जमिनीस प्रतिगुंठा तीन लाख पन्नास हजार रुपये अशी दराविषयी चर्चा झाली होती. त्याप्रमाणे विस्तारवाढ बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी प्रतिगुंठा दहा लाखांप्रमाणे विमानतळ विस्तारवाढ करण्यासाठीची मागणी केली होती. मात्र, तो प्रश्न प्रलंबित राहिला. (प्रतिनिधी) अन्यथा आत्मदहन करू...सध्या सरकारच बदलले असल्याने विमानतळ विस्तारवाढीबाबत शेतकऱ्यांची संभ्रमावस्था झाली आहे. शासनाकडून देखील योग्य निर्णय घेतला जात नसल्याने त्यांच्या धोरणासंदर्भात शेतकरी अनभिज्ञ आहेत. तरी शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा शेतकऱ्यांना आत्मदहन अथवा आठ दिवसांत उपोषण या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.