शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
3
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
4
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
5
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
6
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
7
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
8
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
9
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
10
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
11
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
12
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
13
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
14
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
15
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
16
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
17
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
18
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
19
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
20
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

तिरडीची लाकडं अन् कापडं स्मशानातून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:01 IST

सातारा : प्रत्येकाच्या आयुष्यातील अंतिम सत्य मृत्यू असून, त्याचा शेवट स्मशानभूमीत होतो. प्रत्येकाला एक दिवस तेथे जायचंच आहे; पण ...

सातारा : प्रत्येकाच्या आयुष्यातील अंतिम सत्य मृत्यू असून, त्याचा शेवट स्मशानभूमीत होतो. प्रत्येकाला एक दिवस तेथे जायचंच आहे; पण त्याकडेच दुर्लक्ष होते. हेच लक्षात घेऊन जिल्ह्यातील ४९ स्मशानभूमींची रविवारी स्वच्छता करण्यात आली. यामध्ये २ हजार ५२६ सदस्यांनी सुमारे ११६ टन कचरा गोळा केला. स्मशानभूमीत पडलेले तिरडीवरची लाकडे, उशा अन् पूजेच्या वस्तूंसह पालापाचोळा काढला.रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सातारा जिल्ह्यात रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत ४९ ठिकाणच्या दफनभूमी व कोरेगाव, पाचगणी येथील स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविले.दफनभूमी स्वच्छता अभियानांतर्गत ७० एकर ६ गुंठे क्षेत्रात तब्बल २ हजार ५२४ सदस्यांनी ११६.५ टन कचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली. बहुतांशी ठिकाणी मुस्लीम, ख्रिश्चन, तसेच लिंगायत, तेली समाजातील बांधवांनीदेखील सहभाग घेतला होता.प्रतिष्ठानमार्फत जिल्ह्यात प्रथमत:च हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला गेला. दरम्यान सातारा, कोरेगाव, कºहाड, पाटण, वाई, माण, खटाव, जावळी, महाबळेश्वर आदी ठिकाणी ४९ दफनभूमीत स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. स्मशानभूमी आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आला. याच महिन्यात स्मशानभूमींची स्वच्छता करण्याचा संकल्प जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविण्यात आला होता. त्यावेळी दोनच तासांत अडीच हजार सदस्यांकडून ६१ टन कचरा गोळा करण्यात आला होता.कचरा एकत्रित गोळा करून त्याची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. तसेच त्या ठिकाणी आसपास मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या झाडाझुडपांना बाजूला करण्यात आले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून करण्यात आली होती. तसेच मास्क व हातमोजे प्रतिष्ठानकडून पुरविण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी खराटे, दांताळे, घमेली, खोरे, पंजे आदी आवश्यक साहित्य स्वत: आणले होते.येथे राबलेअसंख्य हातकºहाड, कोळे, काले, उंब्रज, मसूर, विद्यानगर, तारळे, पाटण, नाटोशी, मल्हारपेठ, कोरेगाव, रहिमतपूर, संगममाहुली, नेले, नांदगाव, अतीत, कोपर्डे, गजवडी, परळी, भुर्इंज, वेळे, ओझर्डे, परखंदी रोड, पसरणी, बावधन, रायगाव, कुडाळ, पाचगणी, निमसोड, औंध, वडूज, पुसेसावळी, खातगुण, पुसेगाव, दहिवडी, म्हसवड आदी ठिकाणच्या ४९ दफनभूमींची एकाच वेळी स्वच्छता करण्यात आली.मुस्लीम तसेच इतर समाजबांधवांकडून कौतुकदफनभूमी स्वच्छता अभियानात गावातील ग्रामस्थ, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य जगाला मानवतेचा संदेश देणारा आहे, असे भावोद्गार काढून अनेकांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले. तसेच यापुढे आपली स्मशानभूमी स्वच्छ ठेवण्याचा अनेकांनी निर्धार केला.तालुका सदस्य गोळा कचरा संख्या टनातसातारा ५५७ १७.७जावळी १७९ ५कोरेगाव १९२ ७.१माण १११ ७.५खटाव २४६ १७.५वाई ३१२ १५.३कºहाड ६९१ ३४.९पाटण १९६ ९.४पाचगणी ४० २.१एकूण २,५२४ ११६.५