शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पांडवगडावर ट्रेकर्सची रोमांचक कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:25 IST

बावधन : वाई तालुक्यातील निसर्गसौंदर्य लाभलेल्या व कठीण अशा पांडवगडावर योद्धा प्रतिष्ठान अ‍ॅडव्हेंचर ट्रेकच्या वतीने रॅपलिंग मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३० ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता. गडावरील वाईच्या दिशेकडून दिसणारा १५० फूट उंचीचा चित्तथरारक असा हा कातळकडा रोपच्या साह्याने सर्वांनी रॅपलिंग करत खाली उतरला व ही मोहीम यशस्वी केली.वाई नगरीला अनेक ...

बावधन : वाई तालुक्यातील निसर्गसौंदर्य लाभलेल्या व कठीण अशा पांडवगडावर योद्धा प्रतिष्ठान अ‍ॅडव्हेंचर ट्रेकच्या वतीने रॅपलिंग मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३० ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता. गडावरील वाईच्या दिशेकडून दिसणारा १५० फूट उंचीचा चित्तथरारक असा हा कातळकडा रोपच्या साह्याने सर्वांनी रॅपलिंग करत खाली उतरला व ही मोहीम यशस्वी केली.वाई नगरीला अनेक डोंगरांचा निसर्गरम्य वेढा पडलेला आहे. डोंगराच्या या वेढ्यात पांडवगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड, सोनजाई अशी अनेक दुर्गरत्ने पाहायला मिळतात. वाईच्या जवळ असणारी दुर्गशिखरे माना वर काढून डोकावत असतात. त्यातच विशिष्ठ आकाराने उठून दिसतो तो पांडवगड.या गडाच्या दोन बाजूने असणारा व काळजात धडकी भरवणारा भव्यदिव्य कातळकडा, मधमाशांचे पोळे व सरपटणाºया जीवांचे भय ते वेगळेच. त्यामुळे इकडे फक्त साहसी ट्रेकर्सच येतात.परंतु पांडवगडचा प्रवास कठीण असला तरी मात्र या प्रवासात निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळते. याच पांडवगडावरती योद्धा प्रतिष्ठान अ‍ॅडव्हेंचर ट्रेकचे तज्ज्ञ प्रशिक्षक रणवीर गायकवाड, तुषार घोरपडे, अक्षय पवार यांच्यावतीने नियोजन करण्यात आले होते. गिर्यारोहण क्रीडा प्रकारातील साहसी समजल्या जाणाºया रॅपलिंगची मोहीम घेण्यात आली.यामध्ये योद्धा प्रतिष्ठानचे सदस्य सूरज घोरपडे, प्रसाद भोसले, आनंद पवार, संकेत मराठे, सत्यजित आमराळे, अथर्व यादव, दिलीप रवळेकर, गणेश मराठे, जयदीप कांबळे, रोहित भोसले, सोहम घोरपडे, सचिन पवार यांनी विशेष परिश्रम घेऊन ही मोहीम पूर्ण केली.सातारा, वाई व गंगापुरी या भागातून १२ ते ५२ वर्षांच्या ३० ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता. गडावरील वाईच्या दिशेकडून दिसणाºया १५० फूट उंचीचा चित्तथरारक असा हा कातळकडा रोपच्या साह्याने सर्वांनी रॅपलिंग करत खाली उतरला. काहीजणांसाठी रॅपलिंगचा अनुभव नवीनच होता. तरीही योद्धा प्रतिष्ठानच्या अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इच्छाशक्तीच्या जोरावर तो सर्वांनी यशस्वी करून दाखविला. त्यांचे कौतुक होत आहे.पाच हजार फूट उंचीच्या गडावर मोहीमगेल्या दोन वर्षांत या प्रतिष्ठानच्या माध्यमातून १२५ मोहिमा यशस्वी करण्यात आल्या असून, महाराष्ट्रातील ६५ गडकिल्ले पालथे घातले आहेत. योद्धा प्रतिष्ठानने नाशिकच्या आलंग, मदन, कुलन या महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाºया पाच हजार फूट उंचीच्या गडावर नुकतीच रॅपलिंगची मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. यापुढे ही अशीच उंच-उंच गडांवर योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने मोहिमा राबविण्यात येणार आहेत, असे रणवीर गायकवाड यांनी सांगितले.