शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

मोबाईलच्या अतिवापराने मेंदू झाला आळशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने प्रचंड मोठी क्रांती आणली आहे. मोबाईल सामान्यांच्या आवाक्यात आल्यानंतर प्रत्येकालाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने प्रचंड मोठी क्रांती आणली आहे. मोबाईल सामान्यांच्या आवाक्यात आल्यानंतर प्रत्येकालाच त्याने गुलाम करून टाकलं. पूर्वी शेकडो नंबर तोंडपाठ असलेल्यांना आता नंबर आठवत नाहीत. डायल केलं की लगेच कॉल लागतो. त्यामुळे बहुतांश जणांचा मेंदू आळशी बनला आहे.

लोकांच्या आयुष्यात मोबाईल येण्याआधी प्रत्येकाला इतरांचे फोन क्रमांक तोंड पाठ असायचे. आता मोबाईल मेमरीमुळे स्वत:चा पहिला नंबर सोडला तर कोणाचाच नंबर लक्षात राहत नसल्याचे समोर आले आहे. गणकयंत्र अर्थात कॅलक्युलेटर आल्यानंतर यंत्रावर इतकं अवलंबत्व झालं की लाखोंचे व्यवहार तोंडी करणारी माणसं अक्षरश: इतिहासजमा झाली. मोबाईल अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. अगदी सहज लक्षात ठेवण्याच्या गोष्टींसाठीही मोबाईलचा वापर केला जाऊ लागला आहे. जी मुले किंवा ज्येष्ठ व्यक्ती मोबाईलचा वापर अगदी मोजका करतात किंवा अजिबात करत नाहीत त्यांची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती चांगली असल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

१. असे का होते?

विचार करण्याची प्रक्रिया न करणे

आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष करणे

पाठांतराची सवय मोडीत निघणे

कोणत्याही गोष्टीत थेट सोपी पध्दत वापरणे

नैसर्गिक बुद्धिमत्तेचा वापर करणं टाळणे

अस्थिरता, अस्वस्थता आणि चंचलता वाढणे

२. हे टाळण्यासाठी...!

गॅझेटमु्क्त आठवडा पाळण्यासाठी प्रयत्न

पुरेशी झोप घेण्यासाठी मोबाईल लांब ठेवून झोपा

बुद्धिबळ, कॅरम, स्मरणशक्तीचे खेळ खेळणे

स्तोत्र मंत्र, कविता, भाषण, संवाद कला जोपासणे

चिंतन, मनन, प्राणायाम, योग व्यायाम नियमित करणे

कोट

मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे घरातील संवाद संपला आहे. मोबाईलवरील अवलंबित्व वाढले आहे. त्यामुळे सगळे सक्रिय जिवंत स्मृतींमध्ये साठवावे याचे भान राहिलेले नाही. यासाठी निर्जीव यंत्राचा आधार घ्यावा लागत आहे. आठवड्यातून एक दिवस झिरो स्क्रिन डे पाळणं उपयुक्त ठरेल. बुद्धिकौशल्य पणाला लावणाऱ्या खेळांना प्राधान्य, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बुद्धीचा वापर करणे, योग्य झोप व व्यायाम अत्यावश्यक आहे.

- डॉ. अनिमिष चव्हाण, मानसोपचारतज्ज्ञ

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या जीवनाचाही अविभाज्य घटक बनला आहे. कुटुंबातील सर्वांचे नंबर मुलांना पाठ व्हावेत म्हणून आम्ही त्यांना लँडलाईनवरून फोन करण्याची सक्ती केली होती. गॅझेटवर भरवसा ठेवून चालणार नाही, हे माझ्या लक्षात असल्याने बरेच नंबर पाठ केलेत.

- बाळासाहेब ठक्कर, पालक

पूर्वी लँडलाईनचे ५ आकडी नंबर पाठ होते, मोबाईल आल्यावरही पाच पाच अंक लक्षात ठेवले. जवळच्या प्रत्येकाचे नंबर मला पाठ आहेत. आधुनिक युगाबरोबर चालताना सुना नातवंडे यांच्याबरोबरचं मी पण सोशल मीडियावर आहे. पण स्मरणात असलेले नंबर मी डायल करून मगच लावते. मोबाईलमुळे मेंदूचा वापर कमी केला नाही.

- मंजुळा ठक्कर, ज्येष्ठ नागरिक

ऑनलाइन क्लाससाठी मला मोबाईल लागतो. याशिवाय मोबाईल वापराची परवानगी नसल्याने दिवसभर अन्य गोष्टींमध्ये वेळ जातो. मोबाईल दिल्यानंतरही किमान दोन महिने कोणाचेही नंबर त्यात सेव्ह करायची परवानगी मम्मी डॅडींनी दिली नव्हती. नंबर पाठ झाल्यावरच नंबर सेव्ह करा, असा कुटुंबाचा शिरस्ता होता.

- दानिश ठक्कर, विद्यार्थी

.......................