शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलच्या अतिवापराने मेंदू झाला आळशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने प्रचंड मोठी क्रांती आणली आहे. मोबाईल सामान्यांच्या आवाक्यात आल्यानंतर प्रत्येकालाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने प्रचंड मोठी क्रांती आणली आहे. मोबाईल सामान्यांच्या आवाक्यात आल्यानंतर प्रत्येकालाच त्याने गुलाम करून टाकलं. पूर्वी शेकडो नंबर तोंडपाठ असलेल्यांना आता नंबर आठवत नाहीत. डायल केलं की लगेच कॉल लागतो. त्यामुळे बहुतांश जणांचा मेंदू आळशी बनला आहे.

लोकांच्या आयुष्यात मोबाईल येण्याआधी प्रत्येकाला इतरांचे फोन क्रमांक तोंड पाठ असायचे. आता मोबाईल मेमरीमुळे स्वत:चा पहिला नंबर सोडला तर कोणाचाच नंबर लक्षात राहत नसल्याचे समोर आले आहे. गणकयंत्र अर्थात कॅलक्युलेटर आल्यानंतर यंत्रावर इतकं अवलंबत्व झालं की लाखोंचे व्यवहार तोंडी करणारी माणसं अक्षरश: इतिहासजमा झाली. मोबाईल अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. अगदी सहज लक्षात ठेवण्याच्या गोष्टींसाठीही मोबाईलचा वापर केला जाऊ लागला आहे. जी मुले किंवा ज्येष्ठ व्यक्ती मोबाईलचा वापर अगदी मोजका करतात किंवा अजिबात करत नाहीत त्यांची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती चांगली असल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

१. असे का होते?

विचार करण्याची प्रक्रिया न करणे

आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष करणे

पाठांतराची सवय मोडीत निघणे

कोणत्याही गोष्टीत थेट सोपी पध्दत वापरणे

नैसर्गिक बुद्धिमत्तेचा वापर करणं टाळणे

अस्थिरता, अस्वस्थता आणि चंचलता वाढणे

२. हे टाळण्यासाठी...!

गॅझेटमु्क्त आठवडा पाळण्यासाठी प्रयत्न

पुरेशी झोप घेण्यासाठी मोबाईल लांब ठेवून झोपा

बुद्धिबळ, कॅरम, स्मरणशक्तीचे खेळ खेळणे

स्तोत्र मंत्र, कविता, भाषण, संवाद कला जोपासणे

चिंतन, मनन, प्राणायाम, योग व्यायाम नियमित करणे

कोट

मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे घरातील संवाद संपला आहे. मोबाईलवरील अवलंबित्व वाढले आहे. त्यामुळे सगळे सक्रिय जिवंत स्मृतींमध्ये साठवावे याचे भान राहिलेले नाही. यासाठी निर्जीव यंत्राचा आधार घ्यावा लागत आहे. आठवड्यातून एक दिवस झिरो स्क्रिन डे पाळणं उपयुक्त ठरेल. बुद्धिकौशल्य पणाला लावणाऱ्या खेळांना प्राधान्य, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बुद्धीचा वापर करणे, योग्य झोप व व्यायाम अत्यावश्यक आहे.

- डॉ. अनिमिष चव्हाण, मानसोपचारतज्ज्ञ

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या जीवनाचाही अविभाज्य घटक बनला आहे. कुटुंबातील सर्वांचे नंबर मुलांना पाठ व्हावेत म्हणून आम्ही त्यांना लँडलाईनवरून फोन करण्याची सक्ती केली होती. गॅझेटवर भरवसा ठेवून चालणार नाही, हे माझ्या लक्षात असल्याने बरेच नंबर पाठ केलेत.

- बाळासाहेब ठक्कर, पालक

पूर्वी लँडलाईनचे ५ आकडी नंबर पाठ होते, मोबाईल आल्यावरही पाच पाच अंक लक्षात ठेवले. जवळच्या प्रत्येकाचे नंबर मला पाठ आहेत. आधुनिक युगाबरोबर चालताना सुना नातवंडे यांच्याबरोबरचं मी पण सोशल मीडियावर आहे. पण स्मरणात असलेले नंबर मी डायल करून मगच लावते. मोबाईलमुळे मेंदूचा वापर कमी केला नाही.

- मंजुळा ठक्कर, ज्येष्ठ नागरिक

ऑनलाइन क्लाससाठी मला मोबाईल लागतो. याशिवाय मोबाईल वापराची परवानगी नसल्याने दिवसभर अन्य गोष्टींमध्ये वेळ जातो. मोबाईल दिल्यानंतरही किमान दोन महिने कोणाचेही नंबर त्यात सेव्ह करायची परवानगी मम्मी डॅडींनी दिली नव्हती. नंबर पाठ झाल्यावरच नंबर सेव्ह करा, असा कुटुंबाचा शिरस्ता होता.

- दानिश ठक्कर, विद्यार्थी

.......................