शहरं
Join us  
Trending Stories
1
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
2
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
3
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
4
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
6
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
7
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
8
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
9
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
11
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
12
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
13
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
14
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
15
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
16
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोललो..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
17
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
18
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
19
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
20
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक

मोबाईलच्या अतिवापराने मेंदू झाला आळशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने प्रचंड मोठी क्रांती आणली आहे. मोबाईल सामान्यांच्या आवाक्यात आल्यानंतर प्रत्येकालाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने प्रचंड मोठी क्रांती आणली आहे. मोबाईल सामान्यांच्या आवाक्यात आल्यानंतर प्रत्येकालाच त्याने गुलाम करून टाकलं. पूर्वी शेकडो नंबर तोंडपाठ असलेल्यांना आता नंबर आठवत नाहीत. डायल केलं की लगेच कॉल लागतो. त्यामुळे बहुतांश जणांचा मेंदू आळशी बनला आहे.

लोकांच्या आयुष्यात मोबाईल येण्याआधी प्रत्येकाला इतरांचे फोन क्रमांक तोंड पाठ असायचे. आता मोबाईल मेमरीमुळे स्वत:चा पहिला नंबर सोडला तर कोणाचाच नंबर लक्षात राहत नसल्याचे समोर आले आहे. गणकयंत्र अर्थात कॅलक्युलेटर आल्यानंतर यंत्रावर इतकं अवलंबत्व झालं की लाखोंचे व्यवहार तोंडी करणारी माणसं अक्षरश: इतिहासजमा झाली. मोबाईल अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. अगदी सहज लक्षात ठेवण्याच्या गोष्टींसाठीही मोबाईलचा वापर केला जाऊ लागला आहे. जी मुले किंवा ज्येष्ठ व्यक्ती मोबाईलचा वापर अगदी मोजका करतात किंवा अजिबात करत नाहीत त्यांची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती चांगली असल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

१. असे का होते?

विचार करण्याची प्रक्रिया न करणे

आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष करणे

पाठांतराची सवय मोडीत निघणे

कोणत्याही गोष्टीत थेट सोपी पध्दत वापरणे

नैसर्गिक बुद्धिमत्तेचा वापर करणं टाळणे

अस्थिरता, अस्वस्थता आणि चंचलता वाढणे

२. हे टाळण्यासाठी...!

गॅझेटमु्क्त आठवडा पाळण्यासाठी प्रयत्न

पुरेशी झोप घेण्यासाठी मोबाईल लांब ठेवून झोपा

बुद्धिबळ, कॅरम, स्मरणशक्तीचे खेळ खेळणे

स्तोत्र मंत्र, कविता, भाषण, संवाद कला जोपासणे

चिंतन, मनन, प्राणायाम, योग व्यायाम नियमित करणे

कोट

मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे घरातील संवाद संपला आहे. मोबाईलवरील अवलंबित्व वाढले आहे. त्यामुळे सगळे सक्रिय जिवंत स्मृतींमध्ये साठवावे याचे भान राहिलेले नाही. यासाठी निर्जीव यंत्राचा आधार घ्यावा लागत आहे. आठवड्यातून एक दिवस झिरो स्क्रिन डे पाळणं उपयुक्त ठरेल. बुद्धिकौशल्य पणाला लावणाऱ्या खेळांना प्राधान्य, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बुद्धीचा वापर करणे, योग्य झोप व व्यायाम अत्यावश्यक आहे.

- डॉ. अनिमिष चव्हाण, मानसोपचारतज्ज्ञ

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या जीवनाचाही अविभाज्य घटक बनला आहे. कुटुंबातील सर्वांचे नंबर मुलांना पाठ व्हावेत म्हणून आम्ही त्यांना लँडलाईनवरून फोन करण्याची सक्ती केली होती. गॅझेटवर भरवसा ठेवून चालणार नाही, हे माझ्या लक्षात असल्याने बरेच नंबर पाठ केलेत.

- बाळासाहेब ठक्कर, पालक

पूर्वी लँडलाईनचे ५ आकडी नंबर पाठ होते, मोबाईल आल्यावरही पाच पाच अंक लक्षात ठेवले. जवळच्या प्रत्येकाचे नंबर मला पाठ आहेत. आधुनिक युगाबरोबर चालताना सुना नातवंडे यांच्याबरोबरचं मी पण सोशल मीडियावर आहे. पण स्मरणात असलेले नंबर मी डायल करून मगच लावते. मोबाईलमुळे मेंदूचा वापर कमी केला नाही.

- मंजुळा ठक्कर, ज्येष्ठ नागरिक

ऑनलाइन क्लाससाठी मला मोबाईल लागतो. याशिवाय मोबाईल वापराची परवानगी नसल्याने दिवसभर अन्य गोष्टींमध्ये वेळ जातो. मोबाईल दिल्यानंतरही किमान दोन महिने कोणाचेही नंबर त्यात सेव्ह करायची परवानगी मम्मी डॅडींनी दिली नव्हती. नंबर पाठ झाल्यावरच नंबर सेव्ह करा, असा कुटुंबाचा शिरस्ता होता.

- दानिश ठक्कर, विद्यार्थी

.......................