शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

अतिवृष्टीतील नुकसानीची कामे तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

महाबळेश्वर : ‘तालुक्यातील पश्चिम भागातील विविध रस्त्यांचे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या दुरुस्तीचे काम ...

महाबळेश्वर : ‘तालुक्यातील पश्चिम भागातील विविध रस्त्यांचे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे,’ अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे उपस्थित होते.

महाबळेश्वर तालुक्यात १६, १७ जून रोजी मोठी अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर, तापोळा, कोटोशी तापोळा व कुंभरोशी तापोळा या रस्त्यांवर जागोजागी दरडी कोसळून मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी रस्ते तुटून ते दरीत कोसळले आहेत, तर अनेक ठिकाणी डोंगर उतारावरून वाहत येणाऱ्या पाण्याबरोबर दगड, माती आली. ती रस्त्यांच्या खाली असलेल्या जलवाहिनी मोरीमध्येच अडकली. त्यामुळे डोंगरावरून येणारे पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागल्याने रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी संरक्षक भिंती व रस्त्यांचे भराव वाहून गेले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे साधारण एक कोटींचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले आहे. त्या-त्या ठिकाणी भेट देऊन नुकसानीची आमदार मकरंद पाटील यांनी मंगळवारी केली.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी, शाखा अभियंता दिनेश पवार, प्रवीण भिलारे, सुभाष कदम, डाॅ.प्रमोद शेलार उपस्थित होते.

काही ठिकाणी लहान पूल

अतिवृष्टीमुळे या भागात दरडी कोसळून दरवर्षी रस्त्यांचे मोठे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ज्या ठिकाणी जलवाहिनीच्या मोऱ्या आहेत, अशा महत्त्वाच्या आठ ते दहा ठिकाणी छोट-छोटे पूल बांधण्याची सूचना पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांनी केली होती. त्याप्रमाणे, छोटे-छोटे पूल बांधण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे. अशा पुलांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार केले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासाठी, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून या कामाला लागणारी निधी सार्वजनिक विभागाकडे वर्ग करण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार मकरंद पाटील यांनी दिले.