शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

अतिवृष्टीतील नुकसानीची कामे तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

महाबळेश्वर : ‘तालुक्यातील पश्चिम भागातील विविध रस्त्यांचे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या दुरुस्तीचे काम ...

महाबळेश्वर : ‘तालुक्यातील पश्चिम भागातील विविध रस्त्यांचे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे,’ अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे उपस्थित होते.

महाबळेश्वर तालुक्यात १६, १७ जून रोजी मोठी अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर, तापोळा, कोटोशी तापोळा व कुंभरोशी तापोळा या रस्त्यांवर जागोजागी दरडी कोसळून मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी रस्ते तुटून ते दरीत कोसळले आहेत, तर अनेक ठिकाणी डोंगर उतारावरून वाहत येणाऱ्या पाण्याबरोबर दगड, माती आली. ती रस्त्यांच्या खाली असलेल्या जलवाहिनी मोरीमध्येच अडकली. त्यामुळे डोंगरावरून येणारे पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागल्याने रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी संरक्षक भिंती व रस्त्यांचे भराव वाहून गेले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे साधारण एक कोटींचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले आहे. त्या-त्या ठिकाणी भेट देऊन नुकसानीची आमदार मकरंद पाटील यांनी मंगळवारी केली.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी, शाखा अभियंता दिनेश पवार, प्रवीण भिलारे, सुभाष कदम, डाॅ.प्रमोद शेलार उपस्थित होते.

काही ठिकाणी लहान पूल

अतिवृष्टीमुळे या भागात दरडी कोसळून दरवर्षी रस्त्यांचे मोठे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ज्या ठिकाणी जलवाहिनीच्या मोऱ्या आहेत, अशा महत्त्वाच्या आठ ते दहा ठिकाणी छोट-छोटे पूल बांधण्याची सूचना पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांनी केली होती. त्याप्रमाणे, छोटे-छोटे पूल बांधण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे. अशा पुलांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार केले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासाठी, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून या कामाला लागणारी निधी सार्वजनिक विभागाकडे वर्ग करण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार मकरंद पाटील यांनी दिले.