शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पश्चिमेकडील गावांमध्ये जाण्यासाठी बहुतांश मार्ग बंद; कोरोनावर गावबंदीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 16:44 IST

तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांमध्ये जाण्यासाठी बहुतांश मार्ग बंद झाल्याने उडतारे येथील रस्त्यावर वर्दळ वाढलेली होती. उडतारे येथून कुडाळ मार्गे हुमगाव, मेढ्याकडे एक रस्ता जातो तर दुसरा एक रस्ता कुडाळमार्गे पाचगणी, महाबळेश्वरकडे जातो.

ठळक मुद्देगावात भुर्इंज पोलीस ठाण्याचे वाहने ही फिरत असल्याने लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे.

सातारा : कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक गाव, शहर वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. वाई तालुक्यातील उडतारे ग्रामस्थांनी कोरोनाला रोखण्यासाठी गावबंदीचा उतारा केला आहे.

तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांमध्ये जाण्यासाठी बहुतांश मार्ग बंद झाल्याने उडतारे येथील रस्त्यावर वर्दळ वाढलेली होती. उडतारे येथून कुडाळ मार्गे हुमगाव, मेढ्याकडे एक रस्ता जातो तर दुसरा एक रस्ता कुडाळमार्गे पाचगणी, महाबळेश्वरकडे जातो. सहाजिकच इतर सर्व मार्ग बंद असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. दुचाकी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर त्या रस्त्यावरून जात आहेत.

या पार्श्वभूमीवर गावातील युवकांनी वाहनबंदीचा प्रस्ताव ग्रामपंचायती पुढे ठेवला. त्यानुसार महामार्गालगत शहीद जवान अशोक बाबर स्मृती प्रवेशद्वारावर रेल्वे गेटप्रमाणे गेट तयार केले आहे. संपूर्ण दिवस गेट बंद ठेवण्यात येते. अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच शेतामध्ये बैलगाडी घेऊन जाणाºया शेतकऱ्यांना, डेअरीसाठी दूध घालण्यासाठी येणाºया वाहनांसाठी इथून प्रवेश दिला जातो.

पुण्या-मुंबईतून दाखल होणाºया लोकांची नावनोंदणी ग्रामपंचायतीच्यावतीने या प्रवेशद्वारावरच केली जाते. सहाजिकच उडतारेसह सर्जापूर, कळंबे, कुडाळ, हुमगाव, सोनगाव या गावांमध्ये बाहेरून येणाºया लोकांची माहिती एकत्रितपणे या ठिकाणी मिळत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा हातभार लागलेला आहे. दरम्यान, जिल्हा बाहेरून जे लोक गावात दाखल होतात, त्यांच्यासाठी बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे या ठिकाणी क्वॉरंटाईन कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. सावधगिरीची उपाययोजना म्हणून बाहेरून येणाºया लोकांना थेट क्वॉरंटाईन कक्षात धाडले जात आहे. याठिकाणी १४ दिवस ठेवल्यानंतर त्यांना घरी पाठवले जाते.

ग्रामपंचायतीच्यावतीने संपूर्ण गावात कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. जे लोक सांगूनही ऐकत नाहीत, अशा लोकांची नावे पोलिसांना कळवली जात आहेत. गावात भुर्इंज पोलीस ठाण्याचे वाहने ही फिरत असल्याने लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे. उडतारेच्या सरपंच माधुरी पवार, उपसरपंच हेमलता बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी तसेच सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते कोरोनाशी लढा देण्याच्या मोहिमेत उत्साहाने काम करताना दिसत आहेत.बाहेर फिरणाºयाला पाचशे रुपये दंडगावातील रस्त्यावर विनाकारण फिरणाºया लोकांना ग्रामपंचायतीने तंबी दिलेली आहे. तरीदेखील जे लोक विनाकारण फिरतील त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड आकारण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस