शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक घरात स्वावलंबी कुटुंब संकल्पना रुजणे गरजेचे

By admin | Updated: July 9, 2015 22:52 IST

कामाचे विभाजन आवश्यकच : कुटुंबीयांनी घ्यावा सक्रिय सहभाग; ज्येष्ठांची जबाबदारी महत्त्वाची

प्रगती जाधव-पाटील -सातारा  : माझ्याशिवाय घराचं पान हालत नाही, हे अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही. याचा दुसरा अर्थ कुटुंबीयांना स्वावलंबी बनविण्यात अयशस्वी झाल्याचे भान महिलांनी ठेवले पाहिजे. ‘सुपर वुमन सिंड्रोम’ पासून दूर यायचं असेल तर ‘स्वावलंबी कुटुंब’ ही संकल्पना सत्यात उतरविणे आवश्यक आहे.घरातील पुरूषांनी किंवा मुलांनी महिलांच्या चौकटीतील कोणतेही काम केले की ते समाजाच्या दृष्टीने वर्ज्य असते. मित्र-मैत्रिणी कोणाच्याही आल्या तरी त्यांना काय हवे नको ते पाहणे हे काम केवळ स्त्रियांचेच असते, असा समज दृढ आहे. जोपर्यंत महिलांना मनुष्य म्हणून स्थान मिळणार नाही, तोपर्यंत त्यांच्यातील हा आजार हद्दपार होणार नाही.पती-पत्नी यांच्या सहचर्याने संसार सुरू होतो. निसर्गाने स्त्री-पुरूषाची निर्मिती करताना काही फरक केला नाही. पण लहान वयातच ‘मुलीसारखं रडायचं नाही’ ही शिकवण मुलांना मिळत असल्यामुळे रडण्याचं काम मुलींचेच असते, अशी मुलांची समजूत होते. अशाच गोष्टी मग पुढे आचरणात आल्यामुळे महिला आणि मुलींवर घरातील कामांची जबाबदारी पडते व मुलांना या कामांपासून दूर ठेवले जाते.सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलं, पती आणि घरातील ज्येष्ठांना जमेल ती कामे विभागून द्या. दुसरी, तिसरीतील मुलांना स्वत:चे स्वत: आवरायला सांगा. पतीलाही सगळ्या गोष्टी हातात देण्यापेक्षा वस्तू ठेवण्याची ठिकाणे दाखवून ठेवा. चहा आणि नाष्टा यांची जबाबदारी घरातील ज्येष्ठांना द्या. अशा जबाबदारी वाटण्यामुळे प्रत्येकजण स्वावलंबी होईल आणि कामाचा अतिरिक्त ताण कोणा एकावर पडणार नाही. कुटुंबीयांनीही एखाद्या दिवशी मिळून गृहिणीला सक्तीने विश्रांती घेऊ द्यावी. घरातील स्त्री जोपर्यंत अंथरूणाला खिळत नाही, तोपर्यंत तिच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. सौजन्याने सर्व कामे स्वत:च्या खांद्यावर घेणाऱ्या महिलांनाही कधीतरी ‘ब्रेक’ हवा असतो याची जाणीव प्रत्येकानेच ठेवावी.आठवड्यातून तीन तास फक्त स्वत:साठीच!घर आणि नोकरी यांच्यात अडकलेल्या महिलांना आठवड्याची सुट्टीही मिळत नाही. त्यांच्या सुट्टीच्या दिवशी हमखास येणारे पाहुणे हे सुट्टीच्या आनंदावर विरजन टाकणारेच असतात. गृहिणी आणि नोकरदार महिलांनी आठवड्यातून किमान तीन तास तरी मनस्वी जगण्याचा आनंद घ्यावा. व्यक्ती म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या झुगारून देऊन मनाला समाधान होईल असे काही तरी करावे. यात त्यांनी कोणताही अपराधीपणाचा भाव ठेवू नये.बालवयातच भेदभावाला सुरुवातनवजात अर्भकाला कापडात गुंडाळून ठेवले तर मुलगा का मुलगी हे कोणीच सांगू शकत नाही. पण जसे ते मोठे होतात, तसे त्यांच्या पेहरावावरून त्यांच्यात फरक करायला सुरूवात होते. गुलाबी, पिवळा हे रंग मुलींचे होतात, तर काळा आणि लाल रंगांवर मुलांची मक्तेदारी येते. मुलींसाठी फ्रॉक आणि मुलांना पॅन्ट शर्ट हे अघोषितच होते. खेळण्यांच्या दुकानातही मुलींसाठी भातुकली आणि मुलांसाठी जेसीबी हा फरक पहायला मिळतो. चुकून एखादा मुलगा भातुकली खेळू लागला तर त्याच्यात काहीतरी दोष आहे, असा शिक्का मारून समाज रिकामा होतो. स्त्री-पुरूष भेदभाव बालवयात या पध्दतीने रूजविणे चुकीचे आहे.स्त्री-पुरूष समानतेचे कितीही गोडवे गायले तरीही पुरूषसत्ताक व्यवस्थेचे बळी महिला ठरणार आहेत. आपण कोणाकडे जेवायला गेलो तर महिलांनी ताट उचलून ठेवणे रूटीन आहे. पण एखाद्याने पुरूषाने ताट उचलून ठेवले तर हाहाकार माजतो. ए. ल. शारदा, पॉप्युलेशन फर्स्ट संस्था