शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

पाडव्या दिनीही अजिंक्यतारा पेटला! अनेकांचा गैरसमज आग लावून जातो...

By प्रगती पाटील | Updated: April 9, 2024 20:11 IST

अजिंक्यताऱ्यासह यवतेश्वर, महादरे आणि भैरोबाचा पायथा या डोंगरांनी सातारा शहराला वेढले आहे. या परिसरात आढळणारी जैवविविधताही खास अशीच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मराठी नवीन वर्ष म्हणून एकीकडे शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा समाजकंटकांनी अजिंक्यतारा पेटवला. सायंकाळी चारच्या सुमारास अजिंक्यतारा डोंगराच्या पुर्वेस वणवा लागला आणि काही तासांतच तो वाढत दुसऱ्या टोकापर्यंत गेला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

अजिंक्यताऱ्यासह यवतेश्वर, महादरे आणि भैरोबाचा पायथा या डोंगरांनी सातारा शहराला वेढले आहे. या परिसरात आढळणारी जैवविविधताही खास अशीच आहे. पण अंधश्रध्देतून डोंगरला आग लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. डोंगर जाळले तर जनावरांसाठी उत्तम प्रतीचे गवत पुढच्या वर्षी येते असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे दिवाळीनंतर जरा उन पडू लागले की लोकं डोंगरात येऊन गवत कापून नेतात. आपल्या जनावरांसाठी पुरेशा गवताची तजवीज झाली की उर्वरित डोंगर जाळून टाकण्याची पध्दत गेल्या अनेक वर्षांपासून रूढ झाली आहे. याबाबत वनविभागाच्यावतीने वारंवार प्रबोधन करूनही नागरिकांची मानसिकता बदलत नाही. 

शहराच्या लगत असलेल्या डोंगरांमध्ये मात्र केवळ गंमतीचा भाग म्हणून वणवा लावला जातो. सहज फिरायला गेलेल्या युवांच्या टोळक्याकडून गंमत म्हणून गवत पेटवले जाते. काही जणांना रात्रीच्यावेळी हा नजारा पहायला आवडत असल्याचेही ते खासगीत सांगतात. युवांच्या या गंमतीचा दुरगामी परिणाम पर्यावरण आणि इथल्या जैवविविधतेवर होत असल्याने इथली जैव साखळीही अडचणीत येणयाची शक्यता वर्तवली जात आहे.

१. जनावरे तरी आहेत का?ग्रामीण भागात वणवा लावणाऱ्यांकडे चाैकशी केली की ते सर्रास जनावरांच्या चांगल्या चाऱ्यासाठी वणवा लावला असल्याचे नमुद करतात. गायी म्हशींसह बैलांसाठी वर्षभराचा चारा डोंगरावरूनच आणावा लागतो. त्यामुळे चांगल्या दर्जाचा चारा पाहिजे असेल तर डोंगर पेटवले पाहिजेत अशी सबब दिली जाते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातूनही पशुधन लुप्त होऊ लागले आहे. ज्यांच्यासाठी डोंगर जाळला जातोय त्या पशुधनाची संख्या गावाकडेही रोडावली आहे. त्यामुळे डोंगरावर सध्या अस्तित्वात असलेले गवतही त्यांना पुरून उरतेय, अशी परिस्थिती आहे.

वणवा लावल्याने गवताबरोबरच अनेक छोटे जीव, किडे मुंग्या, पक्षी, त्यांची अंडी आणि सरपटणारे प्राणी जिवानीशी जातात. आग लागल्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही कमी होते. परिणामी डोंगर निसटणे, पाणी पूर्ण वाहून येणे हे धोके निर्माण होतात. यातून मातीचे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे असे आहे.- सुनिल भोइटे, मानद वन्यजीव रक्षक

टॅग्स :fireआग