शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आधुनिकतेच्या जमान्यातही डालगं, कणगीची विण घट्ट, संसारोपयोगी वस्तू तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:14 IST

आधुनिकतेच्या जमान्यात अनेक संसारोपयोगी वस्तू प्लास्टिकपासून मिळत आहेत. त्यातही सातारा तालुक्यातील कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात बहुतांशी ठिकाणी पारंपरिक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप अशा अनेकविध वस्तू तयार करत पारंपरिकतेची विण घट्ट केली आहे.

ठळक मुद्देआधुनिकतेच्या जमान्यातही डालगं, कणगीची विण घट्ट, संसारोपयोगी वस्तू तयार डोंगरमाथ्यावरील दुर्गम भागातील कारागिरांना मिळतोय रोजगार

पेट्री/सातारा : आधुनिकतेच्या जमान्यात अनेक संसारोपयोगी वस्तू प्लास्टिकपासून मिळत आहेत. त्यातही सातारा तालुक्यातील कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात बहुतांशी ठिकाणी पारंपरिक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप अशा अनेकविध वस्तू तयार करत पारंपरिकतेची विण घट्ट केली आहे.सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावात शेती, घरकाम, व्यवसायासंदर्भात अनेकविध पारंपरिक पद्धती आजही जोपासल्या जात आहेत. हा सर्व पारंपरिक वारसा जतन होत असल्याचे चित्र प्रकर्षाने अनुभवास मिळत आहे.आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठाराच्या परिसरातील अतिदुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण मोठ्या स्वरुपात असते. या परिसरातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असल्याने येथील शेतकरी प्रामुख्याने भात, नाचणी, वरी ही पिके घेतात.निसर्गाचे बदलते ऋतुचक्र तसेच हातातोंडाशी आलेल्या पिकांचे वन्य पशुपक्ष्यांकडून होत असलेली नासधुस यामुळे शेती करण्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे. अनेकजण उदरनिवार्हासाठी तसेच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पुणे, मुंबई शहराचा मार्ग स्वीकारतात. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊनपूर्वीच अनेक चाकरमानी कुटुंबासमवेत आपापल्या गावात दाखल झाली होती.

अनेक चाकरमानीचा गावात शेती करण्याचा कल वाढला आहे. यंदा शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. गावाकडे असणारे शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर गाई, म्हशी, जनावरांचे पालन करतात. या भागात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कौलारू घरं पाहायला मिळतात. या शेती तसेच घरबांधकाम, बांबुकाम, व्यवसायासंदर्भात अनेकविध पारंपरिक पद्धती जोपाासल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप बनविणे कलाकुसर असणाºया व्यक्तींनाच जमते. यासाठी मेहनत खूप घ्यावी लागते. परंतु खर्च नाही. शेतीकाम तसेच अन्नधान्याच्या साठ्यासाठी लागणाऱ्या वस्तू सहजपणे बनविल्या जात आहेत. शहरी भागात प्लास्टिक टब, ड्रमचा वापर होत असला तरी अद्यापही ग्रामीण भागात याचे प्रमाण तुरळक असून, बहुसंख्य प्रमाणात बांबू कामाच्याच वस्तूंना प्राधान्य दिले जात आहे.

वेळ मिळेल तसे बांबू कामापासून अनेक प्रकारच्या वस्तू बनविल्या जातात. या कामात मेहनत खूप घ्यावी लागते. परंतु खर्च वाचला जातो.-बाबूराव आखाडे, कुसुंबीमुरा ता. जावळी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRural Developmentग्रामीण विकास