शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

आधुनिकतेच्या जमान्यातही डालगं, कणगीची विण घट्ट, संसारोपयोगी वस्तू तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:14 IST

आधुनिकतेच्या जमान्यात अनेक संसारोपयोगी वस्तू प्लास्टिकपासून मिळत आहेत. त्यातही सातारा तालुक्यातील कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात बहुतांशी ठिकाणी पारंपरिक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप अशा अनेकविध वस्तू तयार करत पारंपरिकतेची विण घट्ट केली आहे.

ठळक मुद्देआधुनिकतेच्या जमान्यातही डालगं, कणगीची विण घट्ट, संसारोपयोगी वस्तू तयार डोंगरमाथ्यावरील दुर्गम भागातील कारागिरांना मिळतोय रोजगार

पेट्री/सातारा : आधुनिकतेच्या जमान्यात अनेक संसारोपयोगी वस्तू प्लास्टिकपासून मिळत आहेत. त्यातही सातारा तालुक्यातील कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात बहुतांशी ठिकाणी पारंपरिक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप अशा अनेकविध वस्तू तयार करत पारंपरिकतेची विण घट्ट केली आहे.सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावात शेती, घरकाम, व्यवसायासंदर्भात अनेकविध पारंपरिक पद्धती आजही जोपासल्या जात आहेत. हा सर्व पारंपरिक वारसा जतन होत असल्याचे चित्र प्रकर्षाने अनुभवास मिळत आहे.आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठाराच्या परिसरातील अतिदुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण मोठ्या स्वरुपात असते. या परिसरातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असल्याने येथील शेतकरी प्रामुख्याने भात, नाचणी, वरी ही पिके घेतात.निसर्गाचे बदलते ऋतुचक्र तसेच हातातोंडाशी आलेल्या पिकांचे वन्य पशुपक्ष्यांकडून होत असलेली नासधुस यामुळे शेती करण्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे. अनेकजण उदरनिवार्हासाठी तसेच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पुणे, मुंबई शहराचा मार्ग स्वीकारतात. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊनपूर्वीच अनेक चाकरमानी कुटुंबासमवेत आपापल्या गावात दाखल झाली होती.

अनेक चाकरमानीचा गावात शेती करण्याचा कल वाढला आहे. यंदा शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. गावाकडे असणारे शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर गाई, म्हशी, जनावरांचे पालन करतात. या भागात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कौलारू घरं पाहायला मिळतात. या शेती तसेच घरबांधकाम, बांबुकाम, व्यवसायासंदर्भात अनेकविध पारंपरिक पद्धती जोपाासल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप बनविणे कलाकुसर असणाºया व्यक्तींनाच जमते. यासाठी मेहनत खूप घ्यावी लागते. परंतु खर्च नाही. शेतीकाम तसेच अन्नधान्याच्या साठ्यासाठी लागणाऱ्या वस्तू सहजपणे बनविल्या जात आहेत. शहरी भागात प्लास्टिक टब, ड्रमचा वापर होत असला तरी अद्यापही ग्रामीण भागात याचे प्रमाण तुरळक असून, बहुसंख्य प्रमाणात बांबू कामाच्याच वस्तूंना प्राधान्य दिले जात आहे.

वेळ मिळेल तसे बांबू कामापासून अनेक प्रकारच्या वस्तू बनविल्या जातात. या कामात मेहनत खूप घ्यावी लागते. परंतु खर्च वाचला जातो.-बाबूराव आखाडे, कुसुंबीमुरा ता. जावळी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRural Developmentग्रामीण विकास