शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आधुनिकतेच्या जमान्यातही डालगं, कणगीची विण घट्ट, संसारोपयोगी वस्तू तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:14 IST

आधुनिकतेच्या जमान्यात अनेक संसारोपयोगी वस्तू प्लास्टिकपासून मिळत आहेत. त्यातही सातारा तालुक्यातील कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात बहुतांशी ठिकाणी पारंपरिक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप अशा अनेकविध वस्तू तयार करत पारंपरिकतेची विण घट्ट केली आहे.

ठळक मुद्देआधुनिकतेच्या जमान्यातही डालगं, कणगीची विण घट्ट, संसारोपयोगी वस्तू तयार डोंगरमाथ्यावरील दुर्गम भागातील कारागिरांना मिळतोय रोजगार

पेट्री/सातारा : आधुनिकतेच्या जमान्यात अनेक संसारोपयोगी वस्तू प्लास्टिकपासून मिळत आहेत. त्यातही सातारा तालुक्यातील कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात बहुतांशी ठिकाणी पारंपरिक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप अशा अनेकविध वस्तू तयार करत पारंपरिकतेची विण घट्ट केली आहे.सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावात शेती, घरकाम, व्यवसायासंदर्भात अनेकविध पारंपरिक पद्धती आजही जोपासल्या जात आहेत. हा सर्व पारंपरिक वारसा जतन होत असल्याचे चित्र प्रकर्षाने अनुभवास मिळत आहे.आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठाराच्या परिसरातील अतिदुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण मोठ्या स्वरुपात असते. या परिसरातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असल्याने येथील शेतकरी प्रामुख्याने भात, नाचणी, वरी ही पिके घेतात.निसर्गाचे बदलते ऋतुचक्र तसेच हातातोंडाशी आलेल्या पिकांचे वन्य पशुपक्ष्यांकडून होत असलेली नासधुस यामुळे शेती करण्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे. अनेकजण उदरनिवार्हासाठी तसेच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पुणे, मुंबई शहराचा मार्ग स्वीकारतात. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊनपूर्वीच अनेक चाकरमानी कुटुंबासमवेत आपापल्या गावात दाखल झाली होती.

अनेक चाकरमानीचा गावात शेती करण्याचा कल वाढला आहे. यंदा शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. गावाकडे असणारे शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर गाई, म्हशी, जनावरांचे पालन करतात. या भागात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कौलारू घरं पाहायला मिळतात. या शेती तसेच घरबांधकाम, बांबुकाम, व्यवसायासंदर्भात अनेकविध पारंपरिक पद्धती जोपाासल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप बनविणे कलाकुसर असणाºया व्यक्तींनाच जमते. यासाठी मेहनत खूप घ्यावी लागते. परंतु खर्च नाही. शेतीकाम तसेच अन्नधान्याच्या साठ्यासाठी लागणाऱ्या वस्तू सहजपणे बनविल्या जात आहेत. शहरी भागात प्लास्टिक टब, ड्रमचा वापर होत असला तरी अद्यापही ग्रामीण भागात याचे प्रमाण तुरळक असून, बहुसंख्य प्रमाणात बांबू कामाच्याच वस्तूंना प्राधान्य दिले जात आहे.

वेळ मिळेल तसे बांबू कामापासून अनेक प्रकारच्या वस्तू बनविल्या जातात. या कामात मेहनत खूप घ्यावी लागते. परंतु खर्च वाचला जातो.-बाबूराव आखाडे, कुसुंबीमुरा ता. जावळी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRural Developmentग्रामीण विकास