शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

पावसाळा सुरू होऊनही १४ गावे अन् २६ वाड्या तहानलेल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST

सातारा : जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊनही अद्याप मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे ४ तालुक्यांत अजूनही टंचाई आहे. सध्यस्थितीत ...

सातारा : जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊनही अद्याप मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे ४ तालुक्यांत अजूनही टंचाई आहे. सध्यस्थितीत १४ गावे आणि २६ वाड्या तहानलेल्या आहेत. या तालुक्यांत ११ टँकर सुरू असून १३ हजार नागरिकांना आधार मिळाला आहे.

जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस होऊनही माण, खटावसारख्या तालुक्यांत डिसेंबर, जानेवारी महिना उजाडताच टँकर सुरू करावे लागायचे. पण, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदललंय. याला कारण म्हणजे जलसंधारणाची झालेली कामे. त्याचबरोबर वॉटरकप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचं तुफान आलेलं. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांत जलसंधारणाची मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे पावसाचं पडलेलं पाणी अडून राहिलं व त्याचा फायदाही टंचाई निवारणासाठी झाला आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे या वर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहिली. याबाबत जिल्हा प्रशासनानेही संभाव्य टंचाई आराखडा तयार केला होता. त्यानुसार ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील १६९ गावांना आणि २२६ वाड्यांत टंचाई भासू शकते असा अंदाज होता. तर यामधील १३८ गावांनाच टंचाईचा सामना करावा लागण्याची स्थिती होती. त्यासाठी ४६ टँकर लागू शकतात, असे अनुमान होते. जवळपास अडीच कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, उन्हाळा संपला तरी मोठ्या प्रमाणात टँकर लागले नाहीत.

जिल्ह्यात सध्या पावसाळा सुरू झाला आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस होत आहे. काही भागांत पावसाने चांगली हजेरी लावली, तर काही भागांत पाऊसच झालेला नाही. त्यामुळे टंचाई कमी झाली असली तरी टँकरग्रस्त गावे अजूनही आहेत. सध्यस्थितीत जिल्ह्यात १४ गावे आणि २६ वाड्यांसाठी ११ टँकर सुरू आहेत. यामध्ये ९ शासकीय आणि २ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या टँकरवर १३१५४ नागरिक आणि ३०२३ पशुधन अवलंबून आहे. यामध्ये माण तालुक्यात टंचाईची स्थिती अधिक आहे.

जिल्ह्यात सध्या माण तालुक्यात ७ गावे आणि १४ वाड्यांसाठी ४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर ५७१३ नागरिक अवलंबून आहेत. खटाव तालुक्यातील २ गावे व एका वाडीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे. तर वाई तालुक्यात ३ गावे आणि ५ वाड्या तहानलेल्या आहेत. वाईत ३६२६ नागरिक आणि १४८० पशुधन टँकरवर अवलंबून आहे. सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यांतील २ गावे व ४ वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

चौकट :

१९ विहिरींचे अधिग्रहण...

जिल्ह्यात टंचाई असणाऱ्या गाव परिसरातील १९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माण तालुक्यात ३, खटावमध्ये ७, फलटण २, खंडाळा तालुक्यात १ तर वाई तालुक्यात ५ आणि सातारा तालुक्यात एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

...........

२० दिवसांपूर्वी २१ गावे तहानलेली...

जिल्ह्यात २० दिवसांपूर्वी २१ गावे आणि २८ वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर १८ हजार नागरिक आणि ५ हजारांवर पशुधन अवलंबून होते. मात्र, मागील १५ दिवसांत काही भागांत पाऊस झाल्याने टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे.

..................................................................