शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

पर्यावरण दिन विशेष: जाई प्लास्टिक पोटात; पचन बिघडून पशुधन धोक्यात

By जगदीश कोष्टी | Updated: June 5, 2025 12:50 IST

प्लास्टिकचा अतिवापरामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या भेडसावत आहेत

जगदीश कोष्टीसातारा : बदलत्या काळानुसार माणसाची जीवनशैली सुधारली; पण आचारण बिघडत गेेले. घरातील शिळ्या भाकरी, चपाती, भाज्यांची देठे पूर्वी थेट जनावरांसमोर टाकले जात; पण आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्लास्टिकमधून आणून रस्त्याच्या कडेला टाकले जातात. हे अन्न खाताना अनेकदा जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाते. मात्र, त्याचे पचन व्यवस्थित न झाल्याने पुढे पचनसंस्था बिघडते. त्यावर वेळीच उपचार न झाल्यास जनावरे दगावण्याचाही धोका संभवतो.सातारा जिल्ह्याला निसर्गाचे वरदान भरभरून लाभले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा, घनदाट झाडीमुळे विपुल वनसंपदा लाभली आहे. त्यातच कास पुष्प पठार, महाबळेश्वरचा निसर्ग जगभरातील पर्यटकांना साद घालत असतो. त्याचबरोबर हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या खूपच संवेदनशील आहे; पण गेल्या काही वर्षांपासून या पर्यावरणाला गालबोट लावले जात आहे.प्लास्टिकचा अतिवापर हा याला कारणीभूत ठरत आहे. प्लास्टिकचे विघटन होत नाही. कित्येक वर्षे ते तसेच राहते. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या भेडसावत आहेत. त्याचबरोबर सजीवनांही धोका संभवत आहे. तो टाळण्यासाठी प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आणणे आवश्यक आहे.

रवंथ करता येत नाहीजनावरे दिवसभर भराभर चारा खात असतात. हा चारा त्यांच्या मोठ्या जठरात साठते. त्यानंतर रात्रभर ते हाच तोंडात आणून रवंथ करत राहतात. प्लास्टिक वजनाला हलके असल्याने ते जठराच्या खाली बसते. त्यामुळे रवंथ करण्यासाठी तोंडात परत येत नाही.

काही दिवसांत बनतात कडकहे प्लास्टिक वारंवार खाण्यात आले तर काही दिवसांनी मोठ्या जठरात ते दगडासारखे कडक होते. नंतर ते पुढील आतड्याच्या तोंडाला अडकते. त्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते. त्यामुळे जनावर चारा खात नाही. पुढे पचनसंस्था बिघडल्यामुळे जनावर दगावण्याचा धोका असतो.

शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाला फार मोठे स्थान असते. मात्र, माणसांच्या दुर्लक्षामुळे जनावरांच्या खाण्यात प्लास्टिक जात असल्याने ते दगावतात. ही बाब आपणाला परवडणारी नाही. - डॉ. महेश लकडे, पशुधन विकास अधिकारी 

कोकणात फिरायला गेलो असता समुद्रकिनारी एक पक्षी वरखाली जात होता. यावेळी लक्षात आले की, त्या पक्ष्याच्या गळ्यात प्लास्टिक बाटलीचे झाकण अडकले होते. ही घटना पाहून मनात घालमेल सुरू झाली अन् साताऱ्यात आल्यावर सागरमित्र अभियान ही संस्था स्थापन केली. यामध्ये साताऱ्यातील घर, सोसायटीत जाऊन आम्ही प्लास्टिक संकलन करत असतो. - सोहम कुलकर्णी, सातारा. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरणAnimalप्राणी