शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

बावधनकरांच्या सहनशीलतेचा अंत !

By admin | Updated: March 16, 2016 23:48 IST

यात्रेपूर्वी बसस्थानक स्वच्छ व्हावे : नागरिकांची अपेक्षा; अन्यथा ‘साफ’ आंदोलन करण्याचा इशारा--एसटीला हवायधक्का - तीन

तानाजी कचरे -- बावधन -संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या बावधन, ता. वाई येथील बगाड यात्रा होळी पौर्णिमेपासून (दि. २३) सुरू होत आहे. गेली काही वर्षे कर्नाटकातूनही भाविक या यात्रेला येतात. यात्रेपूर्वी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला एसटी बसस्थानक परिसर पूर्णत: स्वच्छ व्हावा, यासाठी ग्रामस्थ व परिसरातील मंडळींचा दबाव वाढत आहे. यात्रेच्या मीटिंगमध्येही याचे पडसाद उमटले. यात्रेपूर्वी हा परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने परिवहन खात्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेता एसटी प्रशासनाने तत्परतेने बसस्थानक परिसर मोकळा करावा, यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. मात्र एसटी प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास ग्रामस्थ ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. गावच्या आरोग्याबरोबरच हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला आहे. यामुळे एसटी प्रशासन काय भूमिका घेते यावर अवलंबून आहे. यात्रेपूर्वी काहीच हालचाल न झाल्यास तरुणाईचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत एसटी प्रशासन ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत गावात एसटी येऊ द्यायची नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हे आंदोलन होऊ नये आणि सुसंवादाने हा प्रश्न मार्गी लावावा, असेही प्रयत्न होत आहेत. एसटी प्रशासनाने याकडे काणाडोळा केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहणार आहे. एसटी प्रशासनाची उदासीनता आणि ग्रामस्थांची आग्रही मागणी याचा मेळ बसणार का? ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी सुसज्ज बसस्थानकासाठी निधीच्या मन:स्थितीत असतानाही प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास यात्रेपूर्वी लोक आंदोलनातून हा परिसर ‘साफ’ झाल्यास आश्चर्य वाटू नये. (समाप्त)बसस्थानकाचा परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे ठराव परिवहन खात्याकडे देऊन सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व एसटी प्रशासनाने लक्ष घालावे; अन्यथा लोकांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- अरुणादेवी पिसाळ, माजी जि. प. अध्यक्षा.एसटी प्रशासन याकडे काणाडोळा करत आहे. परिवहन विभागाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र जनआंदोलन होण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण ? यात्रेच्या अगोदर हा परिसर स्वच्छ व्हावा. बगाड यात्रेला बावधन गावात राज्यातून लाखो भाविक येत असतात. त्यासाठी स्वच्छता गरजेचे आहे.- सतीश पिसाळ, बावधन सरपंच