शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

बावधनकरांच्या सहनशीलतेचा अंत !

By admin | Updated: March 16, 2016 23:48 IST

यात्रेपूर्वी बसस्थानक स्वच्छ व्हावे : नागरिकांची अपेक्षा; अन्यथा ‘साफ’ आंदोलन करण्याचा इशारा--एसटीला हवायधक्का - तीन

तानाजी कचरे -- बावधन -संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या बावधन, ता. वाई येथील बगाड यात्रा होळी पौर्णिमेपासून (दि. २३) सुरू होत आहे. गेली काही वर्षे कर्नाटकातूनही भाविक या यात्रेला येतात. यात्रेपूर्वी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला एसटी बसस्थानक परिसर पूर्णत: स्वच्छ व्हावा, यासाठी ग्रामस्थ व परिसरातील मंडळींचा दबाव वाढत आहे. यात्रेच्या मीटिंगमध्येही याचे पडसाद उमटले. यात्रेपूर्वी हा परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने परिवहन खात्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेता एसटी प्रशासनाने तत्परतेने बसस्थानक परिसर मोकळा करावा, यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. मात्र एसटी प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास ग्रामस्थ ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. गावच्या आरोग्याबरोबरच हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला आहे. यामुळे एसटी प्रशासन काय भूमिका घेते यावर अवलंबून आहे. यात्रेपूर्वी काहीच हालचाल न झाल्यास तरुणाईचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत एसटी प्रशासन ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत गावात एसटी येऊ द्यायची नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हे आंदोलन होऊ नये आणि सुसंवादाने हा प्रश्न मार्गी लावावा, असेही प्रयत्न होत आहेत. एसटी प्रशासनाने याकडे काणाडोळा केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहणार आहे. एसटी प्रशासनाची उदासीनता आणि ग्रामस्थांची आग्रही मागणी याचा मेळ बसणार का? ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी सुसज्ज बसस्थानकासाठी निधीच्या मन:स्थितीत असतानाही प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास यात्रेपूर्वी लोक आंदोलनातून हा परिसर ‘साफ’ झाल्यास आश्चर्य वाटू नये. (समाप्त)बसस्थानकाचा परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे ठराव परिवहन खात्याकडे देऊन सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व एसटी प्रशासनाने लक्ष घालावे; अन्यथा लोकांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- अरुणादेवी पिसाळ, माजी जि. प. अध्यक्षा.एसटी प्रशासन याकडे काणाडोळा करत आहे. परिवहन विभागाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र जनआंदोलन होण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण ? यात्रेच्या अगोदर हा परिसर स्वच्छ व्हावा. बगाड यात्रेला बावधन गावात राज्यातून लाखो भाविक येत असतात. त्यासाठी स्वच्छता गरजेचे आहे.- सतीश पिसाळ, बावधन सरपंच