शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

जिल्ह्यात लसीकरणावर भर द्या : संजोग कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:41 IST

जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ...

जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. ज्ञानेश्वर हिरास, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा चव्हाण व कार्यालयीन अधिकारीवर्ग उपस्थित होता. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे गेले अनेक वर्षे प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून प्रश्नाबाबत टोलवाटोलवी केली जात असल्याचे सुरेखा चव्हाण यांनी सांगितले. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न मार्गी लागले आहेत, तर काही प्रश्नांत काही त्रुटी असल्याने त्याला विलंब होत असल्याचे सांगितले.

यावर डॉ. संजोग कदम म्हणाले, जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खोल्यात निवृत्त झालेले, बदली झालेले कर्मचारी अद्यापही राहत आहेत त्या लवकरात लवकर खोल्या रिकाम्या झाल्या पाहिजेत.

अनुकंपा भरती प्रश्न मार्गी लावा, पुण्याच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आढळत आहेत. टेस्टिंग पण जास्त आहे. जिल्हयातील लसीकरण कसे जास्त होईल यावर भर द्या, लसीचा साठा जास्त देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले, तर नुसत्या माना डुलवू नका, कागदपत्रे हलवा अशा सूचना देत पुढील १५ दिवसांनंतर अचानक पुणे उपसंचालक कार्यालयाची टीम भेट देऊन किती कामे मार्गी लागली याची पाहणी करणार आहे. त्यावेळी कोणाच्या कामात हलगर्जीपणा आढळल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.