शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

जिल्ह्यात लसीकरणावर भर द्या : संजोग कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:41 IST

जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ...

जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. ज्ञानेश्वर हिरास, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा चव्हाण व कार्यालयीन अधिकारीवर्ग उपस्थित होता. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे गेले अनेक वर्षे प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून प्रश्नाबाबत टोलवाटोलवी केली जात असल्याचे सुरेखा चव्हाण यांनी सांगितले. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न मार्गी लागले आहेत, तर काही प्रश्नांत काही त्रुटी असल्याने त्याला विलंब होत असल्याचे सांगितले.

यावर डॉ. संजोग कदम म्हणाले, जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खोल्यात निवृत्त झालेले, बदली झालेले कर्मचारी अद्यापही राहत आहेत त्या लवकरात लवकर खोल्या रिकाम्या झाल्या पाहिजेत.

अनुकंपा भरती प्रश्न मार्गी लावा, पुण्याच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आढळत आहेत. टेस्टिंग पण जास्त आहे. जिल्हयातील लसीकरण कसे जास्त होईल यावर भर द्या, लसीचा साठा जास्त देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले, तर नुसत्या माना डुलवू नका, कागदपत्रे हलवा अशा सूचना देत पुढील १५ दिवसांनंतर अचानक पुणे उपसंचालक कार्यालयाची टीम भेट देऊन किती कामे मार्गी लागली याची पाहणी करणार आहे. त्यावेळी कोणाच्या कामात हलगर्जीपणा आढळल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.