शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सातारा जिल्हयातील आठ हजार कंत्राटी शिलेदारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड : आज मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 20:04 IST

सातारा : शासनाच्या योजना तितक्याच तत्परतेने यशस्वी करणारे जिल्हयातील ८ हजार ८० कंत्राटी शिलेदार बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याच्या

ठळक मुद्दे शासनाने परिपत्रक मागे घेण्याची मागणी

सातारा : शासनाच्या योजना तितक्याच तत्परतेने यशस्वी करणारे जिल्हयातील ८ हजार ८० कंत्राटी शिलेदार बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याच्या भीतीने प्रचंड तणावाखाली आहेत. शासनाने हे परिपत्रक तत्काळ मागे घ्यावे, या मागणीसाठी बुधवारी (दि. २१ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

शासनाच्या विविध विभागांमध्ये साडेपाच लाख कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर आपली सेवा बजावत आहेत. मानधन तुटपुंजे असले तरी आज, उद्या आपण नोकरीत कायम होऊ, या भाबड्या आशेवर ते गेल्या पंधरा वर्षांपासून शासनाची इमाने इतबारे चाकरी बजावत आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार या कर्मचाºयांना नोकरीत कायम केले जाणार तर नाहीच; परंतु त्याची शासकीय कंत्राटी कर्मचारी अशी ओळखही पुसून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयानुसार ११ महिन्यांच्या तीन नेमणुका मिळाल्यानंतर त्या कर्मचाºयाला त्याच पदासाठी परत एकदा निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. यावेळी त्यांच्या वयाच्या व मानधनवाढीचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.यानुसार खुल्या वर्गातील कर्मचारी केवळ ३६ वयापर्यंत तर प्रवर्गातील उमेदवार केवळ ४१ वयापर्यंतच कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करू शकतो. त्यामुळे पंधरा वर्षांपासून सेवा बजावणाºया अनुभवी कर्मचाºयांना मात्र नोकरी गेल्याने घरी बसावे लागणार आहे. त्याचबरोबर अनुभवी कर्मचाºयांना काढल्यामुळे शासकीय कामकाजावरही याचा नकारात्मक परिणाम होणार आहे.

शासन ज्या अनेक यशस्वी योजनांची उदाहरणे देऊन आपली वारंवार पाट थोपटून घेत असते, त्या शासकीय योजनांच्या यशस्वीतेमागे याच कंत्राटी शिलेदारांचा मोठा वाटा आहे. स्वच्छ भारत अभियान, जलस्वराज्य, पंतप्रधान ग्रामसडक योजना, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण, एड्स नियंत्रण कार्यक्रमासारखे अनेक उपक्रमांची तर राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरही दखल घेतली गेली आहे.हेच का अच्छे दिन?एका बाजूला शासन सत्तर लाख नवीन नोकºया निर्माण करण्याच्या घोषणा करत आहे तर दुसरीकडे साडेपाच लाख कंत्राटी कर्मचाºयांच्या नोकºया अडचणीत आणताना दिसत आहे, हेच का अच्छे दिन? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे शासनाने हे परिपत्रक तत्काळ मागे घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरjobनोकरी