शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

शिक्षण हेच जीवन जगण्याचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST

येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ...

येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे अध्यक्षस्थानी होते. बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्या. सरोदे म्हणाले, युवकांचे प्रेरणास्थान म्हणून स्वामी विवेकानंद ओळखले जातात. तर राजमाता जिजाऊ या खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या जीवनाचा आदर्श आहेत. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या उभारणीचे स्वप्न त्यांनी पाहिले होते आणि त्यांनी ते पूर्ण केले. स्वामी विवेकानंद यांचे जीवन म्हणजे युवकांना जगण्याचा संदेश आहे. देशाच्या संस्कृतीची पताका आपल्या विचारातून त्यांनी जगभर पसरवली.

प्राचार्य डॉ. सतीश घाटगे म्हणाले, राजमाता जिजाऊंनी रचलेल्या पायावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभे राहिले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अंगार भरला आणि अन्याय-अत्याचार यापासून रयतेची सुटका केली. स्वामी विवेकानंद म्हणजे एक ज्ञानतपस्वी होत. त्यांच्या ज्ञानतेजाने संपूर्ण विश्व अवाक् झाले. या आदर्शांना समोर ठेवूनच आपल्या राष्ट्राची सेवा सर्वांनी करावी.

संस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुरेश यादव यांनी आभार मानले. उपप्राचार्य मोहन पाटील, पर्यवेक्षक पिलोबा पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.