शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

खाद्यतेलाचा दर स्थिर; वाटाणा १२० रुपये किलोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:24 IST

सातारा : जिल्ह्यात कोबी अन् टोमॅटोचा दर कमी असला तरी इतर भाज्यांचा भाव मात्र वाढलेला आहे. सध्या वांग्याचा दर ...

सातारा : जिल्ह्यात कोबी अन् टोमॅटोचा दर कमी असला तरी इतर भाज्यांचा भाव मात्र वाढलेला आहे. सध्या वांग्याचा दर थोडा कमी झाला असून वाटाणा १२० रुपये किलोवर पोहोचला आहे. त्याचबरोबर मागील आठवड्यातही खाद्यतेलाचे दर स्थिर राहिल्याचे दिसून आले.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ३६८ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. कांद्याची अधिक आवक झाली नसली तरी क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळाला, तर वांग्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ४० ते ६० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला २५० ते ३०० रुपये भाव आला. आल्याला क्विंटलला १७०० पर्यंत तर लसणाला ७ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर वाटाण्याला ९ ते १० हजारांपर्यंत भाव मिळाला. वाटाण्याला क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ झालेली आहे. बाजार समितीत भुईमूग शेंगाचीही आवक होत आहे.

खाद्यतेल भाव...

मागील महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचा सूर्यफूल डबा २३०० ते २४०० पर्यंत मिळत आहे. तर पामतेलचा १८५०, शेंगदाणा तेल डबा २२५० ते २४०० आणि सोयाबीनचा २१०० ते २२५० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर सोयाबीन तेल पाऊच १३५ ते १५०, सूर्यफूलचा १७० रुपयांना मिळत आहे.

डाळिंबाची आवक...

बाजार समितीत आंब्याची आवक पूर्णपणे बंद झाली. तर संत्री, डाळिंब आणि पपई आली होती. डाळिंबाची २६ व पपईची फक्त ४ क्विंटलची आवक झाली.

बटाटा दर स्थिर...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत; पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १४०० ते १६०० रुपये दर मिळाला. तर दोडक्याला १० किलोला ३०० ते ३५०, ढबू ३०० ते ३५०, शेवगा शेंग ३०० ते ४००, गवारला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया...

मागील एक महिन्यापासून खाद्यतेल दरात उतार आला आहे. सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन तेल डबा सरासरी ३०० ते ३५० रुपयांनी कमी झाला आहे. पाऊचचेही दर उतरले आहेत.

- संभाजी आगुंडे,

विक्री प्रतिनिधी

दोन महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे कोणतीही भाजी ही ४० रुपयांवर किलो मिळत आहे. त्यातच लॉकडाऊन असल्याने अधिक दराने भाजीपाला घ्यावा लागतो.

- शांताराम जाधव,

विक्री प्रतिनिधी

सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला १० हजारापर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. मात्र, कोबी व टोमॅटोला अजूनही एकदमच कमी भाव मिळत आहे. यामुळे खर्चही निघत नाही.

- तातोबा काळे, शेतकरी