शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा दर स्थिर; वाटाणा १२० रुपये किलोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:24 IST

सातारा : जिल्ह्यात कोबी अन् टोमॅटोचा दर कमी असला तरी इतर भाज्यांचा भाव मात्र वाढलेला आहे. सध्या वांग्याचा दर ...

सातारा : जिल्ह्यात कोबी अन् टोमॅटोचा दर कमी असला तरी इतर भाज्यांचा भाव मात्र वाढलेला आहे. सध्या वांग्याचा दर थोडा कमी झाला असून वाटाणा १२० रुपये किलोवर पोहोचला आहे. त्याचबरोबर मागील आठवड्यातही खाद्यतेलाचे दर स्थिर राहिल्याचे दिसून आले.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ३६८ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. कांद्याची अधिक आवक झाली नसली तरी क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळाला, तर वांग्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ४० ते ६० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला २५० ते ३०० रुपये भाव आला. आल्याला क्विंटलला १७०० पर्यंत तर लसणाला ७ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर वाटाण्याला ९ ते १० हजारांपर्यंत भाव मिळाला. वाटाण्याला क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ झालेली आहे. बाजार समितीत भुईमूग शेंगाचीही आवक होत आहे.

खाद्यतेल भाव...

मागील महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचा सूर्यफूल डबा २३०० ते २४०० पर्यंत मिळत आहे. तर पामतेलचा १८५०, शेंगदाणा तेल डबा २२५० ते २४०० आणि सोयाबीनचा २१०० ते २२५० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर सोयाबीन तेल पाऊच १३५ ते १५०, सूर्यफूलचा १७० रुपयांना मिळत आहे.

डाळिंबाची आवक...

बाजार समितीत आंब्याची आवक पूर्णपणे बंद झाली. तर संत्री, डाळिंब आणि पपई आली होती. डाळिंबाची २६ व पपईची फक्त ४ क्विंटलची आवक झाली.

बटाटा दर स्थिर...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत; पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १४०० ते १६०० रुपये दर मिळाला. तर दोडक्याला १० किलोला ३०० ते ३५०, ढबू ३०० ते ३५०, शेवगा शेंग ३०० ते ४००, गवारला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया...

मागील एक महिन्यापासून खाद्यतेल दरात उतार आला आहे. सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन तेल डबा सरासरी ३०० ते ३५० रुपयांनी कमी झाला आहे. पाऊचचेही दर उतरले आहेत.

- संभाजी आगुंडे,

विक्री प्रतिनिधी

दोन महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे कोणतीही भाजी ही ४० रुपयांवर किलो मिळत आहे. त्यातच लॉकडाऊन असल्याने अधिक दराने भाजीपाला घ्यावा लागतो.

- शांताराम जाधव,

विक्री प्रतिनिधी

सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला १० हजारापर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. मात्र, कोबी व टोमॅटोला अजूनही एकदमच कमी भाव मिळत आहे. यामुळे खर्चही निघत नाही.

- तातोबा काळे, शेतकरी