शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

थकीत बिलामुळे फलटण ‘भूमी अभिलेख’ची वीज तोडली, महावितरणने केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 18:27 IST

महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासकीय तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या उपअधीक्षक तालुका भूमी निरीक्षक, फलटण या कार्यालयाची वीज महावितरण कंपनीने थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडले असून, वीज बिलाच्या रकमेचा भरणा करण्यास रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे या कार्यालयावर ही नामुश्की ओढवली आहे.

ठळक मुद्देरकमेचा भरणा करण्यास रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे नामुश्की कर्मचारी वीज नसल्याने विनाकाम बसून नागरिकांना विनाकारण मनस्ताप

फलटण, दि. ०१ :  महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासकीय तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या उपअधीक्षक तालुका भूमी निरीक्षक, फलटण या कार्यालयाची वीज महावितरण कंपनीने थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडले असून, वीज बिलाच्या रकमेचा भरणा करण्यास रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे या कार्यालयावर ही नामुश्की ओढवली आहे.

लाखोंचा महसूल मोजणी व नक्कल सेवामधून महसूल विभागास मिळूनही काही हजार थकीत बिल भरायला या कार्यालयाकडे पैसे नाहीत, हे आज स्पष्ट झाले. त्यामुळे कर्मचाऱ्याना अंधारात बसून काम करावे लागत असून, अनेक कर्मचारी वीज नसल्याने विनाकाम बसून दिवस काढत आहेत. वीज नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून, विनाकारण नागरिकांना मनस्ताप होत आहे.

सध्या महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीची मोहीम अधिक व्यापक केली आहे. महावितरण कार्यालयाने थकीत वीज बिलाबाबत वारंवार सूचना देऊनही कार्यालयातील जबाबदार अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कार्यालयात अंधारात बसण्याची वेळ कर्मचाऱ्यावर आली आहे. महावितरण कार्यालयाने वीज तोडण्यापूर्वी आगाऊ नोटीस देणे बंधनकारक आहे, असे असताना नोटीस न देता वीज तोडली गेली का? हे ही महत्त्वाचे आहे.

भूमी अभिलेख कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची गर्दी अधिक असते. त्यात मोजणी फी, नक्कल अर्ज, मोजणीची कामे ही संगणकातून केली जातात. दरम्यानच्या दोन दिवसांत वीजपुरवठा खंडित झाल्याने कार्यालयाचे काम ठप्प झाले असून, वीज कनेक्शन तत्काळ सुरू झाल्याशिवाय कार्यालयीन काम करणे अवघड होणार आहे. त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत चालू होत नाही तोपर्यंत नागरिकांच्या कामास दिरंगाई होणार, हे निश्चित आहे.

अनेक मोजणी अर्जांची चलने काढण्यास विलंब होत असल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. यापूर्वी नगर भूमापन कार्यालय फलटण यांचाही वीज पुरवठा अनेक महिने बंद होता, तो मागील महिन्यापासून वीज बिल भरल्यानंतर सुरू झाला आहे.

भूमी अभिलेख कार्यालयाची सतत वीज तोडली जात असून, ही परंपरा खंडित होऊन विना अडथळा नागरिकांना सेवा मिळावी, अशी नागरिकांची मागणी आहे. महसूल विभागाने यात लक्ष घालावे व वीज भरणाबाबत वेळच्या वेळी संबधित विभागाकडून निधी मिळावा, जेणेकरून शासकीय कार्यालयातील कर्मचाºयांवर अशी अंधारात बसण्याची वेळ येणार नाही.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारmahavitaranमहावितरण