शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

थकीत बिलामुळे फलटण ‘भूमी अभिलेख’ची वीज तोडली, महावितरणने केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 18:27 IST

महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासकीय तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या उपअधीक्षक तालुका भूमी निरीक्षक, फलटण या कार्यालयाची वीज महावितरण कंपनीने थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडले असून, वीज बिलाच्या रकमेचा भरणा करण्यास रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे या कार्यालयावर ही नामुश्की ओढवली आहे.

ठळक मुद्देरकमेचा भरणा करण्यास रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे नामुश्की कर्मचारी वीज नसल्याने विनाकाम बसून नागरिकांना विनाकारण मनस्ताप

फलटण, दि. ०१ :  महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासकीय तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या उपअधीक्षक तालुका भूमी निरीक्षक, फलटण या कार्यालयाची वीज महावितरण कंपनीने थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडले असून, वीज बिलाच्या रकमेचा भरणा करण्यास रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे या कार्यालयावर ही नामुश्की ओढवली आहे.

लाखोंचा महसूल मोजणी व नक्कल सेवामधून महसूल विभागास मिळूनही काही हजार थकीत बिल भरायला या कार्यालयाकडे पैसे नाहीत, हे आज स्पष्ट झाले. त्यामुळे कर्मचाऱ्याना अंधारात बसून काम करावे लागत असून, अनेक कर्मचारी वीज नसल्याने विनाकाम बसून दिवस काढत आहेत. वीज नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून, विनाकारण नागरिकांना मनस्ताप होत आहे.

सध्या महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीची मोहीम अधिक व्यापक केली आहे. महावितरण कार्यालयाने थकीत वीज बिलाबाबत वारंवार सूचना देऊनही कार्यालयातील जबाबदार अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कार्यालयात अंधारात बसण्याची वेळ कर्मचाऱ्यावर आली आहे. महावितरण कार्यालयाने वीज तोडण्यापूर्वी आगाऊ नोटीस देणे बंधनकारक आहे, असे असताना नोटीस न देता वीज तोडली गेली का? हे ही महत्त्वाचे आहे.

भूमी अभिलेख कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची गर्दी अधिक असते. त्यात मोजणी फी, नक्कल अर्ज, मोजणीची कामे ही संगणकातून केली जातात. दरम्यानच्या दोन दिवसांत वीजपुरवठा खंडित झाल्याने कार्यालयाचे काम ठप्प झाले असून, वीज कनेक्शन तत्काळ सुरू झाल्याशिवाय कार्यालयीन काम करणे अवघड होणार आहे. त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत चालू होत नाही तोपर्यंत नागरिकांच्या कामास दिरंगाई होणार, हे निश्चित आहे.

अनेक मोजणी अर्जांची चलने काढण्यास विलंब होत असल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. यापूर्वी नगर भूमापन कार्यालय फलटण यांचाही वीज पुरवठा अनेक महिने बंद होता, तो मागील महिन्यापासून वीज बिल भरल्यानंतर सुरू झाला आहे.

भूमी अभिलेख कार्यालयाची सतत वीज तोडली जात असून, ही परंपरा खंडित होऊन विना अडथळा नागरिकांना सेवा मिळावी, अशी नागरिकांची मागणी आहे. महसूल विभागाने यात लक्ष घालावे व वीज भरणाबाबत वेळच्या वेळी संबधित विभागाकडून निधी मिळावा, जेणेकरून शासकीय कार्यालयातील कर्मचाºयांवर अशी अंधारात बसण्याची वेळ येणार नाही.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारmahavitaranमहावितरण