शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

टंचाईमुळे ग्रामसेवकांचं मुक्काम पोस्ट कार्यक्षेत्र, सीईओंची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 14:05 IST

सातारा जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईची स्थिती वाढत असल्याने समस्या व तक्रारी निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना संबंधित गावांच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यापुढे टंचाईच्या गावांतील अपडेट माहिती व तक्रार निवारण ग्रामसेवकांना तेथेच थांबून करावी लागणार आहे.

ठळक मुद्देटंचाईमुळे ग्रामसेवकांचं मुक्काम पोस्ट कार्यक्षेत्र, सीईओंची सूचना  समस्या निवारणासाठी उचलले पाऊल; दररोज माहिती ठेवावी लागणार

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईची स्थिती वाढत असल्याने समस्या व तक्रारी निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना संबंधित गावांच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यापुढे टंचाईच्या गावांतील अपडेट माहिती व तक्रार निवारण ग्रामसेवकांना तेथेच थांबून करावी लागणार आहे.जिल्ह्यात गतवर्षी पूर्व भागात अपुरा पाऊस पडला. तर पश्चिम भागात धो-धो कोसळूनही सध्या टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील १८० गावे आणि ७६० वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर हजारो पशुधनासाठीही टँकरच्याच पाण्याचा आधार आहे.

असे असतानाच मोठी जनावरे चारा छावणीत असून त्यांच्याबरोबर शेतकरीही घर सोडून राहिला आहे. त्यातच उन्हाच्या तीव्रतेबरोबर समस्याही वाढू लागल्या आहेत. टँकरच्या खेपा वेळेवर येत नाहीत, लोकांना वेळेत पाणी मिळत नाही अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. तसेच ग्रामस्थांकडून पाण्याबाबत सतत मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी टंचाईच्या काळात ग्रामसेवकांनी काम करत असणारे गाव सोडू नये. गावातच मुक्काम करावा, असा आदेश काढला आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंततरी ग्रामसेवकांना संबंधित गावांतच मुक्काम करणे कमप्राप्त झाले.जिल्ह्यात आज एक हजाराच्या वर ग्रामसेवक कार्यरत आहेत. अनेकांकडे दोन-तीन गावांचा कारभार आहे. तरीही या ग्रामसेवकांना तेथील माहिती ठेवावी लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे यांच्या या सूचनेने ग्रामसेवकांना पाण्याचा टँकर कधी येतो, जातो केव्हा, किती पाणी येते, किती लोकांना मिळाले. पाणी कोठे मिळाले नाही. चांगले पाणी आले आहे का ? अशी सर्व माहिती ठेवावी लागणार आहे.ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांना अतिशय निकडीची रजा सोडून इतर कोणत्याही रजा मंजूर करण्यात येणार नाहीत. याबाबत गटविकास अधिकाºयांना दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. जे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सूचनांचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर तत्काळ प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

जिल्ह्यात टंचाईची स्थिती वाढत आहे. लोकांना वेळेत व चांगले पाणी मिळणे आवश्यक ठरले असून त्यासाठी ग्रामसेवकांना संबंधित गावांतच थांबण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे पाण्याबाबतच्या काही समस्या असतील तर त्या त्वरीत सोडण्यास मदत होणार आहे.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर