शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईमुळे ग्रामसेवकांचं मुक्काम पोस्ट कार्यक्षेत्र, सीईओंची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 14:05 IST

सातारा जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईची स्थिती वाढत असल्याने समस्या व तक्रारी निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना संबंधित गावांच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यापुढे टंचाईच्या गावांतील अपडेट माहिती व तक्रार निवारण ग्रामसेवकांना तेथेच थांबून करावी लागणार आहे.

ठळक मुद्देटंचाईमुळे ग्रामसेवकांचं मुक्काम पोस्ट कार्यक्षेत्र, सीईओंची सूचना  समस्या निवारणासाठी उचलले पाऊल; दररोज माहिती ठेवावी लागणार

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईची स्थिती वाढत असल्याने समस्या व तक्रारी निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना संबंधित गावांच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यापुढे टंचाईच्या गावांतील अपडेट माहिती व तक्रार निवारण ग्रामसेवकांना तेथेच थांबून करावी लागणार आहे.जिल्ह्यात गतवर्षी पूर्व भागात अपुरा पाऊस पडला. तर पश्चिम भागात धो-धो कोसळूनही सध्या टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील १८० गावे आणि ७६० वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर हजारो पशुधनासाठीही टँकरच्याच पाण्याचा आधार आहे.

असे असतानाच मोठी जनावरे चारा छावणीत असून त्यांच्याबरोबर शेतकरीही घर सोडून राहिला आहे. त्यातच उन्हाच्या तीव्रतेबरोबर समस्याही वाढू लागल्या आहेत. टँकरच्या खेपा वेळेवर येत नाहीत, लोकांना वेळेत पाणी मिळत नाही अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. तसेच ग्रामस्थांकडून पाण्याबाबत सतत मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी टंचाईच्या काळात ग्रामसेवकांनी काम करत असणारे गाव सोडू नये. गावातच मुक्काम करावा, असा आदेश काढला आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंततरी ग्रामसेवकांना संबंधित गावांतच मुक्काम करणे कमप्राप्त झाले.जिल्ह्यात आज एक हजाराच्या वर ग्रामसेवक कार्यरत आहेत. अनेकांकडे दोन-तीन गावांचा कारभार आहे. तरीही या ग्रामसेवकांना तेथील माहिती ठेवावी लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे यांच्या या सूचनेने ग्रामसेवकांना पाण्याचा टँकर कधी येतो, जातो केव्हा, किती पाणी येते, किती लोकांना मिळाले. पाणी कोठे मिळाले नाही. चांगले पाणी आले आहे का ? अशी सर्व माहिती ठेवावी लागणार आहे.ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांना अतिशय निकडीची रजा सोडून इतर कोणत्याही रजा मंजूर करण्यात येणार नाहीत. याबाबत गटविकास अधिकाºयांना दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. जे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सूचनांचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर तत्काळ प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

जिल्ह्यात टंचाईची स्थिती वाढत आहे. लोकांना वेळेत व चांगले पाणी मिळणे आवश्यक ठरले असून त्यासाठी ग्रामसेवकांना संबंधित गावांतच थांबण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे पाण्याबाबतच्या काही समस्या असतील तर त्या त्वरीत सोडण्यास मदत होणार आहे.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर