शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार, कोयनेत ९९ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:02 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊसाचा हाहाकार सुरू आहे. बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा, कोयनासह अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देपावसामुळे जिल्ह्यात हाहाकार, कोयनेत ९९ टीएमसी पाणीसाठा सातारा जिल्ह्यातील सहा धरणातून अडीच लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊसाचा हाहाकार सुरू आहे. बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा, कोयनासह अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना, नवजासह सातारा, वाई, पाटण, जावळी कऱ्हाड  तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना, वीर, धोम, उरमोडी, तारळी, कण्हेर धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामध्ये कोयना धरणात ९९.३२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरणातील पाणीपातळी नियंत्रणात आणण्यासाठी १ लाख, ३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वीर धरणातून १ लाख ३ हजार ८०५ क्युसेक तसेच धोममधून १८ हजार, उरमोडीतून ८०००, तारळीतून ८ हजार ९४३, तर कण्हेरमधून १६ हजार ६४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, तारळी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तांबवे-कऱ्हाड  पूल पाण्याखाली गेल्यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला आहे.

तांबवे गावाला बेटाचे स्वरुप.

गावातील व्यापारी संकुला पाणी लागले व्यापारी माल बाहेर काढत आहेत. येराड-चिपळूण मार्गावर पाणी आले आले असून ज्योतिबानगरमधील दरड कोसळली आहे. तेथून पन्नास फुटांवरच असलेले घरही खचण्याची शक्यता असल्याने जगन्नाथ धोंडी साळुंखे यांच्या कुटुंब अंगणवाडीत हलविले आहे. साजूर गावाशेजारील डोंगरही खचला आहे.

कोयनेतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावरील कृष्णाबाई, साई मंदिरात पाणी शिरले आहे. पाटण शहरासह नवीन बसस्थानकात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पूर परिस्थिती असली तरी जिल्हा प्रशाासनाने आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.

वाईच्या महागणपती मंदिरात सहा फूट पाणीकृष्णानदीला आलेल्या पुराचे पाणी वाईमधील महागणपती मंदिरात शिरले. मंदिरात सहा फूट पाणी साठले आहे. सुरक्षेसाठी मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे.प्रमुख मुद्दे१. कोयना, कृष्णा दुथडी भरुन२. तांबवेतील दहा गावे संपर्कहिन३. प्रतिसंगमावरील मंदिरात पाणी४. पाटण तालुक्यातील येराड येथील वीज खांब पाण्याच्या प्रवाहाने हालत आहे.५. येराडमध्ये दरड पडली, घराला धोका; दोन कुटुंबांचे स्थलांतरलोकांच्या स्थलांतराला प्राधान्यपाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यातील सुमारे ७०० कुटुंबे स्थलांतरीत करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्याबरोबरच रहिमतपूर - सातारा आणि कोरेगाव - सातारा हे रस्तेही वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर