शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार, कोयनेत ९९ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:02 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊसाचा हाहाकार सुरू आहे. बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा, कोयनासह अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देपावसामुळे जिल्ह्यात हाहाकार, कोयनेत ९९ टीएमसी पाणीसाठा सातारा जिल्ह्यातील सहा धरणातून अडीच लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊसाचा हाहाकार सुरू आहे. बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा, कोयनासह अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना, नवजासह सातारा, वाई, पाटण, जावळी कऱ्हाड  तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना, वीर, धोम, उरमोडी, तारळी, कण्हेर धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामध्ये कोयना धरणात ९९.३२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरणातील पाणीपातळी नियंत्रणात आणण्यासाठी १ लाख, ३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वीर धरणातून १ लाख ३ हजार ८०५ क्युसेक तसेच धोममधून १८ हजार, उरमोडीतून ८०००, तारळीतून ८ हजार ९४३, तर कण्हेरमधून १६ हजार ६४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, तारळी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तांबवे-कऱ्हाड  पूल पाण्याखाली गेल्यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला आहे.

तांबवे गावाला बेटाचे स्वरुप.

गावातील व्यापारी संकुला पाणी लागले व्यापारी माल बाहेर काढत आहेत. येराड-चिपळूण मार्गावर पाणी आले आले असून ज्योतिबानगरमधील दरड कोसळली आहे. तेथून पन्नास फुटांवरच असलेले घरही खचण्याची शक्यता असल्याने जगन्नाथ धोंडी साळुंखे यांच्या कुटुंब अंगणवाडीत हलविले आहे. साजूर गावाशेजारील डोंगरही खचला आहे.

कोयनेतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावरील कृष्णाबाई, साई मंदिरात पाणी शिरले आहे. पाटण शहरासह नवीन बसस्थानकात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पूर परिस्थिती असली तरी जिल्हा प्रशाासनाने आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.

वाईच्या महागणपती मंदिरात सहा फूट पाणीकृष्णानदीला आलेल्या पुराचे पाणी वाईमधील महागणपती मंदिरात शिरले. मंदिरात सहा फूट पाणी साठले आहे. सुरक्षेसाठी मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे.प्रमुख मुद्दे१. कोयना, कृष्णा दुथडी भरुन२. तांबवेतील दहा गावे संपर्कहिन३. प्रतिसंगमावरील मंदिरात पाणी४. पाटण तालुक्यातील येराड येथील वीज खांब पाण्याच्या प्रवाहाने हालत आहे.५. येराडमध्ये दरड पडली, घराला धोका; दोन कुटुंबांचे स्थलांतरलोकांच्या स्थलांतराला प्राधान्यपाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यातील सुमारे ७०० कुटुंबे स्थलांतरीत करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्याबरोबरच रहिमतपूर - सातारा आणि कोरेगाव - सातारा हे रस्तेही वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर