शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

पावसाच्या थैमानामुळे नदी, ओढे फुल्ल, अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 15:15 IST

rian, sataranews सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असलातरी बुधवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत थैमान सुरू होते. यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे फुल्ल भरुन वाहू लागले आहेत. तर रस्त्यावरुन पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. या पावसामुळे पिकांबरोबरच रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच कोयनेसह इतर काही प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपावसाच्या थैमानामुळे नदी, ओढे फुल्ल ! अनेक गावांचा संपर्क तुटला

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असलातरी बुधवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत थैमान सुरू होते. यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे फुल्ल भरुन वाहू लागले आहेत. तर रस्त्यावरुन पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. या पावसामुळे पिकांबरोबरच रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच कोयनेसह इतर काही प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात गुरूवारी सहाव्या दिवशीही परतीचा पाऊस सुरू होता. पण, बुधवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जोर कमी होता. गुरुवारी सकाळपासून कधी उघडीप तर कधी पाऊस पडत होता. त्यातच ढगाळ वातावरण आणि सूर्यदर्शनही होत होते. मात्र, बुधवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूच होता. यामुळे गावोगावचे ओढे खळाळू लागले आहेत. तर माणगंगा नदीला पूर आला आहे.बुधवारच्या पावसामुळे कांदा, भुईमूग, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक भागात तोडणीस आलेला उसही भुईसपाट झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यातच या पावसामुळे खटाव तालुक्यातील मायणी गावाचा संपर्क तुटला. तेथील दोन्ही पुलावर पाणी आले. तर तात्पुरता असणारा एक पूल वाहून गेला. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले.माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील पुलावरही पाणी आले होते. त्यामुळे काहीकाळ वाहतूक बंद पडलेली. जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, बहुतांशी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कोयना, कृष्णा, नीरा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ लागली आहे.कोयनेच्या सहा दरवाजातून विसर्ग...जिल्ह्यात बुधवारी दिवसभर संततधार असल्याने सर्वच प्रमुख धरणांत पाणीसाठा वाढला. त्यामुळे बहुतांशी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. गुरुवारीही विसर्ग सुरूच होता. सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६९ मिलिमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर यावर्षी जूनपासून कोयनानगर येथे ४४५२ आणि नवजाला ५१६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा होता. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह २१०० आणि सहा दरवाजे साडे तीन फुटांनी उचलून त्यातून ३२१११ असा ३४२११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर गुरुवारी सकाळच्या सुमारास धोम धरणातून ३५१५ क्यूसेक, कण्हेर ३५६६, उरमोडी ४००, तारळी ३६४१, भाटघर ३५००, निरा देवघर ७०० आणि वीर धरणातून सर्वाधिक ५३३४७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.महाबळेश्वरला १२६ मिलिमीटर पाऊस...जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत सरासरी ८३.२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये दुष्काळी माण, खटाव तालुक्यात प्रत्येकी ८४, फलटण तालुक्यात ९४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सकाळी ८ पर्यंत तालुकानिहाय झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे.

सातारा - ८३.८५, जावळी - ६८.१२, पाटण - ६९.६४, कºहाड - १००.६९, कोरेगाव - ५७.८९, खटाव - ८४.१७, माण - ८४, फलटण - ९४.३३, खंडाळा - ९२.९५, वाई - ७२.४३ आणि महाबळेश्वर तालुका - १२२.७५. दरम्यान, महाबळेश्वर येथे २४ तासांत १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस हा ठरला.

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर