शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या थैमानामुळे नदी, ओढे फुल्ल, अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 15:15 IST

rian, sataranews सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असलातरी बुधवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत थैमान सुरू होते. यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे फुल्ल भरुन वाहू लागले आहेत. तर रस्त्यावरुन पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. या पावसामुळे पिकांबरोबरच रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच कोयनेसह इतर काही प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपावसाच्या थैमानामुळे नदी, ओढे फुल्ल ! अनेक गावांचा संपर्क तुटला

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असलातरी बुधवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत थैमान सुरू होते. यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे फुल्ल भरुन वाहू लागले आहेत. तर रस्त्यावरुन पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. या पावसामुळे पिकांबरोबरच रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच कोयनेसह इतर काही प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात गुरूवारी सहाव्या दिवशीही परतीचा पाऊस सुरू होता. पण, बुधवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जोर कमी होता. गुरुवारी सकाळपासून कधी उघडीप तर कधी पाऊस पडत होता. त्यातच ढगाळ वातावरण आणि सूर्यदर्शनही होत होते. मात्र, बुधवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूच होता. यामुळे गावोगावचे ओढे खळाळू लागले आहेत. तर माणगंगा नदीला पूर आला आहे.बुधवारच्या पावसामुळे कांदा, भुईमूग, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक भागात तोडणीस आलेला उसही भुईसपाट झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यातच या पावसामुळे खटाव तालुक्यातील मायणी गावाचा संपर्क तुटला. तेथील दोन्ही पुलावर पाणी आले. तर तात्पुरता असणारा एक पूल वाहून गेला. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले.माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील पुलावरही पाणी आले होते. त्यामुळे काहीकाळ वाहतूक बंद पडलेली. जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, बहुतांशी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कोयना, कृष्णा, नीरा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ लागली आहे.कोयनेच्या सहा दरवाजातून विसर्ग...जिल्ह्यात बुधवारी दिवसभर संततधार असल्याने सर्वच प्रमुख धरणांत पाणीसाठा वाढला. त्यामुळे बहुतांशी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. गुरुवारीही विसर्ग सुरूच होता. सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६९ मिलिमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर यावर्षी जूनपासून कोयनानगर येथे ४४५२ आणि नवजाला ५१६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा होता. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह २१०० आणि सहा दरवाजे साडे तीन फुटांनी उचलून त्यातून ३२१११ असा ३४२११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर गुरुवारी सकाळच्या सुमारास धोम धरणातून ३५१५ क्यूसेक, कण्हेर ३५६६, उरमोडी ४००, तारळी ३६४१, भाटघर ३५००, निरा देवघर ७०० आणि वीर धरणातून सर्वाधिक ५३३४७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.महाबळेश्वरला १२६ मिलिमीटर पाऊस...जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत सरासरी ८३.२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये दुष्काळी माण, खटाव तालुक्यात प्रत्येकी ८४, फलटण तालुक्यात ९४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सकाळी ८ पर्यंत तालुकानिहाय झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे.

सातारा - ८३.८५, जावळी - ६८.१२, पाटण - ६९.६४, कºहाड - १००.६९, कोरेगाव - ५७.८९, खटाव - ८४.१७, माण - ८४, फलटण - ९४.३३, खंडाळा - ९२.९५, वाई - ७२.४३ आणि महाबळेश्वर तालुका - १२२.७५. दरम्यान, महाबळेश्वर येथे २४ तासांत १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस हा ठरला.

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर