शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:07 IST

सर्जा-राजाचा सण म्हणून ओळखला जाणाºया पोळा सणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. निसर्गाचा अवकृपा यावर्षी बळीराजाचे टेंशन वाढवित आहे.

ठळक मुद्देपाऊस मुबलक बरसेना : बाजारपेठेतील उलाढाल असमाधानकारक, उत्साह कमी

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्जा-राजाचा सण म्हणून ओळखला जाणाºया पोळा सणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. निसर्गाचा अवकृपा यावर्षी बळीराजाचे टेंशन वाढवित आहे. बैलांचा साज घ्यायलाही पैसा नसल्याने सणाच्या तोंडावरही बाजारात समाधानकारक उलाढाल झालेली नाही.बळीराजाचा खरा मित्र अशी ओळख म्हणून सण पोळा हा साजरा केला जातो. उल्लेखनिय म्हणजे ग्रामीण भागात बैलांच्या पोळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र सततची नापिकी व पावसाची पाठ या दोन बाबींमुळे पोळा सणावर दुष्काळाचे स्पष्ट सावट दिसुन येत आहे. याउपरही जीएसटीमुळे बैलांचा साज घेणाºया साहित्यांमध्ये वाढ झाल्याने बळीराजा पुन्हा चिंतेत आहे. सण साजरा करायचाच पण पैशाविना कसा असा प्रश्न तो स्वत:लाच विचारित आहे.जिल्ह्यात बºयाच ठिकाणी मोठा पोळा भरविला जातो. मात्र पुर्वीपेक्षा बैल जोड्यांची संख्या कमी झाल्याने पोळा भरणाºया ठिकाणी मनोरंजनात्मक साहित्य जास्त व बैल जोड्यांची संख्या कमी असे दृष्य दिसून येत आहे.बैलांचा साज महागलामागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारपेठेत उलाढाल कमी होत असल्याचे दिसून येत आहे. बैलांचा साज घेण्यात येणाºया साहित्यांमध्ये येसण ५० रुपये जोडी, चौरंग ४० रुपये जोडी, बैलांचा ढुल १३५० ते २००० रुपये जोडी, मटाटी ४० रुपये जोडी, माला १०० रुपये जोडी, पेंट ३० रुपये (५० ग्रॅम), रंग-बेगड १० रुपये, गोप ५ रुपये, कासरा १०० रुपये जोडी, मोरखी १०० रुपये जोडी या भावाने साहित्य मिळत आहेत. हेच साहित्य मागील वर्षी कमी दरात उपलब्ध होते. अपेक्षेनुरुप पाऊस न बरसल्याने शेतात पेरलेले धान्यही उगवले नाही. कुठे उगवले तर रोवणीसाठी पाणी नाही. अशा दुविधा स्थितीत सापडलेल्या बळीराजासमोर आर्थिक चणचण असतांना पोळा सण साजरा तरी कसा करावा असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे बाजारपेठेतही समाधानकारक उलाढाल होत नसल्याची प्रतिक्रिया बैलांचा साज विकणारे शब्बीर खान यांनी दिली. पोळा सण असतानाही या व्यवसायात घट दिसून आल्याचीही म्हणण्यात येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी खरेदीदारांची संख्या कमी आहे. दुसरीकडे बैलजोड्यांची संख्याही घटत असल्याने ही समस्या वाढली आहे. पैशाअभावी बैलांच्या सजावटीकरिता लागणाºया खरेदीबाबतही शेतकºयांनी हात आखडता घेतला आहे.संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी राजकारण बाजूला सोडून सर्वांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याची व शासन दरबारी व्यथा मांडण्याची शक्यता आहे. अधिकाºयानीही उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार न करता नियोजन व प्रत्यक्ष चौकशीचे निर्देश देण्याची आवश्यकता आहे. करीडी परिसरात मंगळवारला काही कालावधीसाठी दमदार पाऊस झाला असला तरी पावसाचे पाणी शेतीला पडलेल्या भेगांमध्ये जिरले आहे.उमेश तुमसरे शेतकरी पालोरा