शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

दुष्काळी माळरानातील कूपनलिकांना फुटला पाझर

By admin | Updated: September 6, 2016 23:43 IST

देऊरला चमत्कार : तालुक्याच्या उत्तर भागात झाली जलयुक्तची जलक्रांती

संजय कदम -- वाठार स्टेशन कायम दुष्काळी भाग असा शिक्काच नशिबी बसलेला कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग गेली कित्येक वर्षे हक्काच्या पाण्यासाठी लढतोय या भागासाठी सिंचन योजना घोषित झाल्या मात्र गेली १८ वर्षे झाले तरी त्या अजूनही अपुऱ्याच राहिल्यामुळे ‘पाणी’ या शब्दाचाच विसर पडलेला; परंतु यापैकी देऊर गाव त्याला अपवाद ठरले आहे. दुष्काळाचा अनुभव सहन करत असलेले कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील देऊर हे गाव! या गावच्या पूर्वेस पावसाचे नेहमीच दुर्भिक्ष असल्याने आजही गावच्या पूर्व भागाची परिस्थिती पाण्याअभावी बिकट आहे. मात्र, गावचा पश्चिम भाग व वसना नदी काठ आणि डोंगरालगतचा भाग हा जलयुक्तच्या कामांमुळे जलमय झाला आहे. जलयुक्त, पाणलोट या कामाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत गावच्या पश्चिम भागातील डोंगर भागात अनेक कामे पूर्णत्वास आली, याचा आज लाभ आज या परिसरातील देऊर-भांडेवाडी शिवारात झाला आहे. या भागात अडवलेले पाणी आता कूपनलिकेतून आपोआपच ओसांडून वाहत आहे. गावातील मनोज कदम या शेतकऱ्याने ४ वर्षांपूर्वी शेतीसाठी आपल्या शेतात ३०० फूट खोल कूपनलिका खोदली होती. ही कूपनलिका उन्हाळ्यात अगदी जेमतेम पाणी देत होती, मात्र आज हीच कूपनलिक ा आपोआप वाहू लागली आहे. यामधून जवळपास ५ हॉर्स पॉवरच्या मोटरचे पाणी २४ तास वाहत आहे. यामुळे या बोअरवेल भोवतीच एक तळे साचले आहे. या परिसरातील डोंगरभागात झालेल्या पाणलोट कामांमुळे हे शक्य झाले. मागील दोन वर्षांतील परिस्थिती बघितली तर या भागातला असणारा पाणीसाठाही खालावला गेला होता. सर्वच विहिरी कोरड्या पडल्या होत्या, असणारे पाझर तलावही कोरडेच होते; पण शेती व पिण्याची तहान भागवण्यासाठी ३०० ते ५०० फुटांपर्यंत या भागात कूपनलिका खोदून शेतीची तहान भागवण्याचा मोठा प्रयत्न या भागातल्या शेतकऱ्यांनी केला परंतु जमिनीतच पाणी नसल्याने ते कूपनलिकेत तरी येणार कोठून येणार असाच प्रश्न या भागातल्या शेतकऱ्यांना पडला होता. अशा भयाण दुष्काळात पाण्याविना रोजच जगणेच असाह्य झाल्यामुळे अनेक शेतकरी शेतशिवारातच पाण्याच्या शोधात राहू लागले होते. दुष्काळामुळे कामकाज ठप्प झाले होते, अशी परिस्थिती असताना शासन मात्र गावच्या डोंगरात कुठतरी खड्डे घेत होत काही ठिकाणी चाऱ्या तर काही ठिकाणी मातीच्या ताला टाकत होत अनेकवेळा गावकऱ्यांना या गोष्टीच हसू वाटायचे, यात काय होणार? असा प्रश्न गावकरी या शासकीय अधिकाऱ्यांना विचारत होते. मात्र, शासनाने आपले टार्गेट पूर्ण करीत संपूर्ण डोंगरभागात चर आणि तलाव निर्माण केले. गतवर्षी यामध्ये जलयुक्त शिवार ही नवी संकल्पना शासनाने राबवली यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून अनेक बंधारे गावोगावी निर्माण झाले दुष्काळ हा शब्द पुसण्यासाठी शासनाबरोबरीने दिग्गज कलावंत मंडळीही माळरानातून पाणी चळवळ उभारण्यासाठी समोर आली जलक्रांतीसाठी मोठा उठाव गेल्या वर्षभरात कोरेगाव तालुक्यात झाला. या लढ्यात गावोगावचे शेतकरीही एकोप्याने समोर आले. श्रमदानातून संपूर्ण गावकरी शेतशिवारात वेड्यासारखी राबू लागली अनेक बंधारे निर्माण झाले या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पाणी फांउडेशनसारखी संस्था गावोगावी शासनाला बरोबर घेऊन कार्यरत झाली.शासनाचा एका बाजूने हा खटाटोप सुरू असतानाही जून संपला तरी पाऊस मात्र पडत नसल्याने शेतकऱ्यांनी या वर्षीही पाण्याची आशा सोडली होती; परंतु जुलै महिन्यात अगदी काही दिवसच पडलेल्या पावसाने निर्जीव पाझरतलाव सजीव केले. वसना नदीपात्रात सोळशी ते पळशीपर्यंतचे जलयुक्तमधील २७ बंधारे एकाच दिवसात ओसंडून वाहू लागले या पाण्याने दुष्काळी जनतेचे चैतन्य निर्मान झाले. आज फक्त जिकडेतिकडे या पाण्याचीच चर्चा हे दुष्काळ ग्रस्त करत आहेत ते केवळ जलयुक्त शिवार या संकल्पनेमुळेच.