शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांचे पाणी बंद होणार, अनधिकृत नळजोड तोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:53 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील जनतेने थकबाकीच्या रकमा तत्काळ भराव्यात तसेच अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांना यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे, त्यानंतर थकबाकीदार व अनधिकृत नळजोड तोडून पाणी बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे थकबाकीदारांचे पाणी बंद होणार, अनधिकृत नळजोड तोडणारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून बिले भरण्यासाठी १५ जानेवारीचा अल्टिमेटम

सागर गुजरसातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील जनतेने थकबाकीच्या रकमा तत्काळ भराव्यात तसेच अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांना यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे, त्यानंतर थकबाकीदार व अनधिकृत नळजोड तोडून पाणी बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.प्राधिकरणाच्या माध्यमातून गोडोली (शाहूनगर), शाहूपुरी, सदरबझार व खिंडवाडी या चार भागांतील जनतेला लष्कर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. तब्बल १७ हजार अधिकृत नळजोड आहेत. तर प्राधिकरणच्या अंदाजानुसार २५00 अनधिकृत नळजोडांद्वारे पाणी चोरुन वापरले जाते.पाणीपट्टीची बिले प्रत्येक दोन महिन्याला ग्राहकांना दिली जातात. पाणी पट्टी वसुलीची टक्केवारी तब्बल ७0 टक्के इतकी आहे. तरी देखील ३0 टक्के लोक पाणीपट्टी भरतच नसल्याचे समोर येत आहे. बिले थकवणाऱ्यांमुळे प्राधिकरणावर ताण येतो. आता ही थकबाकीची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे.प्राधिकरणतर्फे प्रत्येक भागात रिक्षा फिरवून नागरिकांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी ३२ ठिकाणी वसुली व समस्या निवारणाचे बुथ तयार केले आहेत. नागरिकांची या माध्यमातून सोय केली असल्याने त्यांनी वेळेत पाणीपट्टी भरणे अपेक्षित आहे.दरम्यान, १५ जानेवारीपर्यंत थकबाकीदारांना गांधीगिरीमार्गाने समजावले जाईल. मात्र तरीही थकबाकी न भरण्याची मानसिकता दिसून आल्यास नळजोड तोडण्याची कारवाई सुरु करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.प्राधिकरण आपल्या दारीचा प्रयोगजीवन प्राधिकरणच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत रिक्षाद्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पाणी गळतीच्या समस्येबाबतही नागरिकांनी तक्रार करावी. नळजोड नियमित करुन घ्यावेत तसेच पाणीपट्टी भरुन शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्राधिकरण आपल्या दारीच्या या प्रयोगामुळे जनजागृती होताना दिसते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून ज्या भागात पाणी पुरवठा केला जातो. त्या भागातील अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, थकबाकी भरावी, असे आवाहन नागरिकांना केले आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. आता लोकांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे.- संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर