शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांचे पाणी बंद होणार, अनधिकृत नळजोड तोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:53 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील जनतेने थकबाकीच्या रकमा तत्काळ भराव्यात तसेच अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांना यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे, त्यानंतर थकबाकीदार व अनधिकृत नळजोड तोडून पाणी बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे थकबाकीदारांचे पाणी बंद होणार, अनधिकृत नळजोड तोडणारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून बिले भरण्यासाठी १५ जानेवारीचा अल्टिमेटम

सागर गुजरसातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील जनतेने थकबाकीच्या रकमा तत्काळ भराव्यात तसेच अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांना यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे, त्यानंतर थकबाकीदार व अनधिकृत नळजोड तोडून पाणी बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.प्राधिकरणाच्या माध्यमातून गोडोली (शाहूनगर), शाहूपुरी, सदरबझार व खिंडवाडी या चार भागांतील जनतेला लष्कर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. तब्बल १७ हजार अधिकृत नळजोड आहेत. तर प्राधिकरणच्या अंदाजानुसार २५00 अनधिकृत नळजोडांद्वारे पाणी चोरुन वापरले जाते.पाणीपट्टीची बिले प्रत्येक दोन महिन्याला ग्राहकांना दिली जातात. पाणी पट्टी वसुलीची टक्केवारी तब्बल ७0 टक्के इतकी आहे. तरी देखील ३0 टक्के लोक पाणीपट्टी भरतच नसल्याचे समोर येत आहे. बिले थकवणाऱ्यांमुळे प्राधिकरणावर ताण येतो. आता ही थकबाकीची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे.प्राधिकरणतर्फे प्रत्येक भागात रिक्षा फिरवून नागरिकांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी ३२ ठिकाणी वसुली व समस्या निवारणाचे बुथ तयार केले आहेत. नागरिकांची या माध्यमातून सोय केली असल्याने त्यांनी वेळेत पाणीपट्टी भरणे अपेक्षित आहे.दरम्यान, १५ जानेवारीपर्यंत थकबाकीदारांना गांधीगिरीमार्गाने समजावले जाईल. मात्र तरीही थकबाकी न भरण्याची मानसिकता दिसून आल्यास नळजोड तोडण्याची कारवाई सुरु करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.प्राधिकरण आपल्या दारीचा प्रयोगजीवन प्राधिकरणच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत रिक्षाद्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पाणी गळतीच्या समस्येबाबतही नागरिकांनी तक्रार करावी. नळजोड नियमित करुन घ्यावेत तसेच पाणीपट्टी भरुन शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्राधिकरण आपल्या दारीच्या या प्रयोगामुळे जनजागृती होताना दिसते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून ज्या भागात पाणी पुरवठा केला जातो. त्या भागातील अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, थकबाकी भरावी, असे आवाहन नागरिकांना केले आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. आता लोकांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे.- संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर