शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

थकबाकीदारांचे पाणी बंद होणार, अनधिकृत नळजोड तोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:53 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील जनतेने थकबाकीच्या रकमा तत्काळ भराव्यात तसेच अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांना यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे, त्यानंतर थकबाकीदार व अनधिकृत नळजोड तोडून पाणी बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे थकबाकीदारांचे पाणी बंद होणार, अनधिकृत नळजोड तोडणारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून बिले भरण्यासाठी १५ जानेवारीचा अल्टिमेटम

सागर गुजरसातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील जनतेने थकबाकीच्या रकमा तत्काळ भराव्यात तसेच अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांना यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे, त्यानंतर थकबाकीदार व अनधिकृत नळजोड तोडून पाणी बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.प्राधिकरणाच्या माध्यमातून गोडोली (शाहूनगर), शाहूपुरी, सदरबझार व खिंडवाडी या चार भागांतील जनतेला लष्कर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. तब्बल १७ हजार अधिकृत नळजोड आहेत. तर प्राधिकरणच्या अंदाजानुसार २५00 अनधिकृत नळजोडांद्वारे पाणी चोरुन वापरले जाते.पाणीपट्टीची बिले प्रत्येक दोन महिन्याला ग्राहकांना दिली जातात. पाणी पट्टी वसुलीची टक्केवारी तब्बल ७0 टक्के इतकी आहे. तरी देखील ३0 टक्के लोक पाणीपट्टी भरतच नसल्याचे समोर येत आहे. बिले थकवणाऱ्यांमुळे प्राधिकरणावर ताण येतो. आता ही थकबाकीची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे.प्राधिकरणतर्फे प्रत्येक भागात रिक्षा फिरवून नागरिकांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी ३२ ठिकाणी वसुली व समस्या निवारणाचे बुथ तयार केले आहेत. नागरिकांची या माध्यमातून सोय केली असल्याने त्यांनी वेळेत पाणीपट्टी भरणे अपेक्षित आहे.दरम्यान, १५ जानेवारीपर्यंत थकबाकीदारांना गांधीगिरीमार्गाने समजावले जाईल. मात्र तरीही थकबाकी न भरण्याची मानसिकता दिसून आल्यास नळजोड तोडण्याची कारवाई सुरु करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.प्राधिकरण आपल्या दारीचा प्रयोगजीवन प्राधिकरणच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत रिक्षाद्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पाणी गळतीच्या समस्येबाबतही नागरिकांनी तक्रार करावी. नळजोड नियमित करुन घ्यावेत तसेच पाणीपट्टी भरुन शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्राधिकरण आपल्या दारीच्या या प्रयोगामुळे जनजागृती होताना दिसते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून ज्या भागात पाणी पुरवठा केला जातो. त्या भागातील अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, थकबाकी भरावी, असे आवाहन नागरिकांना केले आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. आता लोकांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे.- संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर