शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

शीतलहरीमुळे गारठा कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST

सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शीतलहरीमुळे थंडी कायम असून दिवसाही गारठा जाणवत असल्याने शेतीसह बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. ...

सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शीतलहरीमुळे थंडी कायम असून दिवसाही गारठा जाणवत असल्याने शेतीसह बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पारा १५ अंशाखाली कायम आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी थंडीला वेळेत सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यातच किमान तापमान १५ अंशाच्या खाली आले. तर दिवाळीच्या दरम्यान तापमान उतरून १२ अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे गारठा चांगलाच वाढला होता. मात्र, यानंतर थंडीत सतत चढ-उतार होत होता. काही दिवस थंडी गायबही झाली. त्यावेळी किमान तापमान २१ अंशावरही गेले होते. त्यानंतरही थंडीच्या प्रमाणात सतत चढ-उतार सुरू होता. असे असलेतरी डिसेंबर महिन्याच्या मध्यानंतर जिल्ह्यातील किमान तापमान १० अंशाखाली आले. तर सातारा शहरात एकवेळ ९ अंश तापमानाची नोंद झाली होती. दोन वर्षांतील हे नीच्चांकी तापमान ठरले होते.

डिसेंबर महिन्यात कमी तापमान होते. त्यामुळे पुन्हा थंडी कमी झाली. जानेवारी महिन्यातही थंडी कमीच राहिली. १५ ते १७ अंशादरम्यान सतत किमान तापमान होते. तर फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर गार हवा वाहू लागली आहे. त्यातच किमान तापमानही कमी झाल्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून तर शीतलहरीमुळे हवेत चांगलाच गारठा जाणवत आहे. सायंकाळी पाचपासूनच थंडी जाणवते. तर सकाळीही १२ पर्यंत अंगातून थंडी जात नाही, अशी स्थिती आहे.

चौकट :

सातारा शहरातील किमान तापमान असे :

दि. २६ जानेवारी १५.०७, दि. २७ जानेवारी १४.०६, दि. २८ जानेवारी १४.०२, दि. २९ जानेवारी १४.०७, दि. ३० जानेवारी १४.०६ आणि ३१ जानेवारी १५.०१, दि. १ फेब्रुवारी १५, दि. २ फेब्रुवारी १७.०२, दि. ३ फेब्रुवारी १२.०९, ४ फेब्रुवारी १२.०१, ५ फेब्रुवारी १३.०५, दि. ६ आणि ७ फेब्रुवारी १४.०९.

......................................................