शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

शीतलहरीमुळे गारठा कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST

सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शीतलहरीमुळे थंडी कायम असून दिवसाही गारठा जाणवत असल्याने शेतीसह बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. ...

सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शीतलहरीमुळे थंडी कायम असून दिवसाही गारठा जाणवत असल्याने शेतीसह बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पारा १५ अंशाखाली कायम आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी थंडीला वेळेत सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यातच किमान तापमान १५ अंशाच्या खाली आले. तर दिवाळीच्या दरम्यान तापमान उतरून १२ अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे गारठा चांगलाच वाढला होता. मात्र, यानंतर थंडीत सतत चढ-उतार होत होता. काही दिवस थंडी गायबही झाली. त्यावेळी किमान तापमान २१ अंशावरही गेले होते. त्यानंतरही थंडीच्या प्रमाणात सतत चढ-उतार सुरू होता. असे असलेतरी डिसेंबर महिन्याच्या मध्यानंतर जिल्ह्यातील किमान तापमान १० अंशाखाली आले. तर सातारा शहरात एकवेळ ९ अंश तापमानाची नोंद झाली होती. दोन वर्षांतील हे नीच्चांकी तापमान ठरले होते.

डिसेंबर महिन्यात कमी तापमान होते. त्यामुळे पुन्हा थंडी कमी झाली. जानेवारी महिन्यातही थंडी कमीच राहिली. १५ ते १७ अंशादरम्यान सतत किमान तापमान होते. तर फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर गार हवा वाहू लागली आहे. त्यातच किमान तापमानही कमी झाल्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून तर शीतलहरीमुळे हवेत चांगलाच गारठा जाणवत आहे. सायंकाळी पाचपासूनच थंडी जाणवते. तर सकाळीही १२ पर्यंत अंगातून थंडी जात नाही, अशी स्थिती आहे.

चौकट :

सातारा शहरातील किमान तापमान असे :

दि. २६ जानेवारी १५.०७, दि. २७ जानेवारी १४.०६, दि. २८ जानेवारी १४.०२, दि. २९ जानेवारी १४.०७, दि. ३० जानेवारी १४.०६ आणि ३१ जानेवारी १५.०१, दि. १ फेब्रुवारी १५, दि. २ फेब्रुवारी १७.०२, दि. ३ फेब्रुवारी १२.०९, ४ फेब्रुवारी १२.०१, ५ फेब्रुवारी १३.०५, दि. ६ आणि ७ फेब्रुवारी १४.०९.

......................................................