शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वर्षानुवर्षे साठलेली घाण स्वच्छ झाली अवघ्या काही तासांत-गोडोलीचे आयलँड झाले चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:59 IST

सातारा : बाहेर पडलेली कडाक्याची थंडी त्यात असलेली नाताळाची सुटी याचा लाभ घेऊन अनेकांनी आजची सकाळ थोड्या उशिरा उजाडली ...

ठळक मुद्देतरुणाईचा पुढाकार : रावाने नाही गावानेच करून दाखवले लोकमतचा प्रभाव

सातारा : बाहेर पडलेली कडाक्याची थंडी त्यात असलेली नाताळाची सुटी याचा लाभ घेऊन अनेकांनी आजची सकाळ थोड्या उशिरा उजाडली असेल; पण गावाच्या प्रेमासाठी आणि सामान्यांच्या काळजीप्रती वाहतुकीची वर्दळ सुरू व्हायच्या आधी गोडोलीतील युवांनी भल्या सकाळी उठून अवघ्या काही तासांत वर्षानुवर्षे साठलेली घाण काढून आयलँडची स्वच्छता केली.

गाव करील ते राव काय करील, या उक्तीप्रमाणे सकाळी साडेसहापासून गोडोलीतील युवांनी नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, राजू मोरे, चारू सकपाळ, विजयनाना मोरे, संदीप मोरे, सागर मोरे, सचिन बर्गे, मंगेश काशीद, लक्ष्मण माने, शशिकांत मोरे, सुभाष मोरे, गौरव पाटील, सागर जगताप, सुभाष शिंदे, सचिन काकडे यांनी सहभाग घेतला.

वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभे करण्यात आलेले आयलँड आता विद्रूप दिसू लागले आहेत. गोडोली नाका येथे आयलँडशेजारीच रिक्षा थांबा असल्यामुळे कित्येकदा अवजड वाहने येथे वळवणं अशक्य होत आहे. तत्कालीन स्थानिक लोकप्रतिनिधींनी निधीतील मलाई खाण्यासाठीच नागरिकांच्या माथी हे आयलँड मारल्याच्या तीव्र भावना स्थानिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या होत्या. जागा व्यापून राहिलेल्या या आयलँडची किमान निगा राखण्याची अपेक्षाही फोल ठरल्याच्या भावना स्थानिकांनी तीव्र शब्दांत व्यक्त केल्या होत्या.

लोकभावनेचा आदर करत नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी तरुणाईला समाजमाध्यमाद्वारे साद घातली आणि भल्या सकाळी तरुणाई आयलँड स्वच्छतेसाठी दाखल झाली.कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता सुमारे तीन तास काम करून तरूणाईने आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी तरूणांनी आयलँडची स्वच्छता करून वाळलेली झाडेझुडपे, प्लास्टिकचे कागद, वेष्टानने आदी वस्तु काढल्या. यातील प्लास्टिक घंटागाडीतून कचरा डेपोकडे रवाना करण्यात आले, तर वाळका पाला पाचोळा आणि कागद तिथेच जाळण्यात आले. तीन तासांच्या श्रमदानानंतर आयलँड पुन्हा चकाचक दिसु लागला.

गोडोली नाका येथे झाडी आणि घाणीचे साम्राज्य असलेले आयलँड. दुसºया छायाचित्रात आयलँडची स्वच्छता करताना शेखर मोरे-पाटील, रवी पवार व गोडोलीकर.

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत स्वच्छतागेल्या पाच वर्षांत या आयलँडची साधी देखभालही स्थानिक लोकप्रतिनिधींना करता आली नसल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने २१ डिसेंबरच्या अंकात ‘केवळ निधीसाठीच केला का हो अट्टाहास? या मथळल्याखाली प्रसिद्ध केले होेते. या वृत्ताची दखल संवेदनशील गोडोलीकरांनी घेतली आणि हक्काची एक सुटी गोडोली आयलँडच्या स्वच्छतेसाठी घालवली. आयलँडच्या स्वच्छतेबरोबरच गोडोली तळे परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. 

 

आयलँडची निर्मिती झाल्यापासून त्याच्या देखभाल दरुस्तीसाठी कोणीही उपाययोजना केल्या नाहीत. सौंदर्य वाढविण्यासाठी उभं करण्यात आलेलं हे धुड गोडोली विद्रूप करणारं ठरलं. यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला. ‘लोकमत’ने मांडलेल्या लोकभावना बऱ्याच बोलक्या होत्या. ‘लोकमत’ने मांडलेल्या प्रश्नावर उत्तर शोधणं ही आमचीच जबाबदारी आहे. सुटीचा दिवस बघून आम्ही स्वच्छता करण्याचं आवाहन केलं. भविष्यातही ‘लोकमत’ने मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, ही अपेक्षा.- शेखर मोरे-पाटील, नगरसेवक 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान