शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने... बळीराजाची चिंता वाढली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

जगन्नाथ कुंभार लोकमत न्यूज नेटवर्क मसूर : मसूर परिसरात पावसाने दडी मारली असली तरी पडलेल्या तुरळक सरींमुळे पेरणी व ...

जगन्नाथ कुंभार

लोकमत न्यूज नेटवर्क

मसूर : मसूर परिसरात पावसाने दडी मारली असली तरी पडलेल्या तुरळक सरींमुळे पेरणी व टोकणी केलेली पिके कशीबशी तग धरुन आहेत. परंतु, या भागात मोठ्या पावसाची गरज आहे. येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांची चिंता वाढेल. सद्यस्थितीत धरणामध्ये पाण्याचा पुरेसा साठा असल्याने कऱ्हाड तालुक्यातील आरफळ कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. परंतु, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर संपूर्ण कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी व टोकणीची कामे तसेच आडसाली ऊस लागणीची कामे पूर्ण केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिली आहे. जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर आडसाली लागण केलेल्या ऊसाची उगवण चांगल्या पद्धतीने झाली आहे. तसेच टोकणी व पेरणी केलेल्या सोयाबीन, भुईमूग, घेवडा, चवळी, मूग, मका आदी पिकांची उगवणही चांगल्याप्रकारे झाली आहे. त्यामुळे आभाळाकडे बघत शेतकरी पिकांची भांगलण, कोळपणी अशी आंतरमशागतीची कामे करत आहेत. मात्र, पावसाने ओढ दिल्याने आडसाली ऊसासह घेवडा, सोयाबीन, भुईमूग आदीसह सरीवर टोकणी केलेली पिके दुपार धरू लागली आहेत. याचा परिणाम ऊसासह सर्व पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

साधारणपणे रोहिणी नक्षत्रात रोपांच्या भात लागणीसाठी रोपे तयार करण्यासाठी शेतात बी टाकलेले असते. कऱ्हाड तालुक्याच्या काही भागात भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पेरणीऐवजी रोपांची लागण केलेल्या भाताचे उत्पादन चांगले मिळत असल्याने शेतकरी भाताच्या रोपांची लागण करतात. साधारणपणे जून अखेरपर्यंत भाताच्या रोपांच्या लागणीला सुरुवात होते. मात्र, पावसाने ओढ दिल्याने भाताच्या रोपांची लागण रखडली होती. आता पाऊस पडेल, या आशेवर लावणी केली जात आहे.

कोट.....

गेल्या काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. उन्हाळ्यासारखे रखरखीत कडक ऊन पडत आहे. त्याचा विपरीत परिणाम उभ्या पिकावर होत आहे. रुसलेला वरुणराजा वेळीच प्रसन्न होऊन बरसला नाही तर संकटाला सामोरे जावे लागेल. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल.

- सतीश कांबिरे, कांबिरवाडी.

फोटो १८मसूर-अॅग्री

माळवाडी येथील शेतात सायकल कोळप्याच्या सहाय्याने शेतकरी कोळपणी करत आहेत. (छाया : जगन्नाथ कुंभार)