शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

पावसाने ओढ दिल्याने... बळीराजाची चिंता वाढली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

जगन्नाथ कुंभार लोकमत न्यूज नेटवर्क मसूर : मसूर परिसरात पावसाने दडी मारली असली तरी पडलेल्या तुरळक सरींमुळे पेरणी व ...

जगन्नाथ कुंभार

लोकमत न्यूज नेटवर्क

मसूर : मसूर परिसरात पावसाने दडी मारली असली तरी पडलेल्या तुरळक सरींमुळे पेरणी व टोकणी केलेली पिके कशीबशी तग धरुन आहेत. परंतु, या भागात मोठ्या पावसाची गरज आहे. येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांची चिंता वाढेल. सद्यस्थितीत धरणामध्ये पाण्याचा पुरेसा साठा असल्याने कऱ्हाड तालुक्यातील आरफळ कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. परंतु, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर संपूर्ण कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी व टोकणीची कामे तसेच आडसाली ऊस लागणीची कामे पूर्ण केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिली आहे. जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर आडसाली लागण केलेल्या ऊसाची उगवण चांगल्या पद्धतीने झाली आहे. तसेच टोकणी व पेरणी केलेल्या सोयाबीन, भुईमूग, घेवडा, चवळी, मूग, मका आदी पिकांची उगवणही चांगल्याप्रकारे झाली आहे. त्यामुळे आभाळाकडे बघत शेतकरी पिकांची भांगलण, कोळपणी अशी आंतरमशागतीची कामे करत आहेत. मात्र, पावसाने ओढ दिल्याने आडसाली ऊसासह घेवडा, सोयाबीन, भुईमूग आदीसह सरीवर टोकणी केलेली पिके दुपार धरू लागली आहेत. याचा परिणाम ऊसासह सर्व पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

साधारणपणे रोहिणी नक्षत्रात रोपांच्या भात लागणीसाठी रोपे तयार करण्यासाठी शेतात बी टाकलेले असते. कऱ्हाड तालुक्याच्या काही भागात भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पेरणीऐवजी रोपांची लागण केलेल्या भाताचे उत्पादन चांगले मिळत असल्याने शेतकरी भाताच्या रोपांची लागण करतात. साधारणपणे जून अखेरपर्यंत भाताच्या रोपांच्या लागणीला सुरुवात होते. मात्र, पावसाने ओढ दिल्याने भाताच्या रोपांची लागण रखडली होती. आता पाऊस पडेल, या आशेवर लावणी केली जात आहे.

कोट.....

गेल्या काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. उन्हाळ्यासारखे रखरखीत कडक ऊन पडत आहे. त्याचा विपरीत परिणाम उभ्या पिकावर होत आहे. रुसलेला वरुणराजा वेळीच प्रसन्न होऊन बरसला नाही तर संकटाला सामोरे जावे लागेल. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल.

- सतीश कांबिरे, कांबिरवाडी.

फोटो १८मसूर-अॅग्री

माळवाडी येथील शेतात सायकल कोळप्याच्या सहाय्याने शेतकरी कोळपणी करत आहेत. (छाया : जगन्नाथ कुंभार)