शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न सत्यात उतरणार

By admin | Updated: September 23, 2014 00:14 IST

माणिकराव साळुंखे : भाऊराव पाटील जयंती सोहळ्यात दिली माहिती

सातारा : शाहू-फुले-आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्था निर्माण केली. कर्मवीरांनी पाहिलेले ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न संस्थेच्या शताब्दीपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत आशादायक घटना आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दिली.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२७ व्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. रावसाहेब शिंदे होते. यावेळी व्हाईस चेअरमन डॉ. अनिल पाटील, प्राचार्य आर. के. शिंदे, शहाजी डोंगरे, अ‍ॅड. के. व्ही. पाटील, अ‍ॅड. दिलावर मुल्ला, प्राचार्य नानासाहेब गायकवाड उपस्थित होते.डॉ. साळुंखे म्हणाले, ‘रयत शिक्षण संस्था ही भारतीय शिक्षण व्यवस्थेची मातृसंस्था असून देशाच्या प्रगतीचा दर ठरविण्याचे पायाभूत कार्य कर्मवीर अण्णांच्या कार्यामुळे घडले. शिक्षण हे नाविन्याचा शोध घेणारे असावे. केवळ माहिती देणारे शिक्षण पुरेसे नसून कौशल्यावर आधारित शिक्षणपद्धती असावी.’अ‍ॅड. शिंदे म्हणाले, ‘संस्थेने विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. बीपीओच्या माध्यमातून तसे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. तोच रयत शिक्षण संस्थेचा गाभा असून भविष्यात ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना असे शिक्षण दिले जाणार आहे.’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव प्राचार्य गणेश ठाकून यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. सहसचिव प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)