शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्के उठविण्यात केवळ कागदपत्रांचा खेळ ! खंडाळा एमआयडीसी टप्पा ३ : खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 21:45 IST

खंडाळा तालुक्याच्या एमआयडीसी टप्पा क्रमांक ३ मधील शेतकºयांच्या जमिनीवरील शिक्के उठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे

ठळक मुद्दे शेतकऱ्यांची मागणी जोर धरू लागली

खंडाळा : खंडाळा तालुक्याच्या एमआयडीसी टप्पा क्रमांक ३ मधील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के उठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे. हरकती देऊनही जमिनी अधिग्रहणासाठी नोटिसा देऊन प्रक्रिया पुन्हा-पुन्हा राबवून केवळ वेळकाढूपणाचे धोरण राबविल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. कागदोपत्रांचा हा खेळ आता थांबवून प्रथम शिक्के उठवा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

वास्तविक एमआयडीसी प्राधिकरणाने वारंवार बैठका घेऊन शेतकऱ्यांना आश्वासने दिली. मात्र त्यानंतर प्रत्यक्षात शिक्के काढण्याबाबत प्रशासन ठप्प आहे. तर निवडणुकीपुरता कळवळा आणलेल्या पदाधिकाऱ्यांनीही सोयीस्करपणे डोळेझाक केली आहे. त्यामुळे या शेतकºयांना शासन व प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याची भावना उमटू लागली आहे. हरकती दाखल केलेल्या शेतकºयांच्या जमिनीवरील शिक्के तातडीने न उठविल्यास शेतकरी बचाव कृती समितीने पुन्हा आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे.

सातारा जिल्'ामध्ये खंडाळा तालुक्यात एमआयडीसी टप्पा क्रमांक ३ मध्ये शिवाजीनगर, भादे, अहिरे, म्हावशी, बावडा, खंडाळा, मोर्वे या सात गावांतील सुमारे १८३२ हेक्टर म्हणजेच जवळपास ४५०० एकर जमीन नीरा देवघर कालव्याच्या लाभक्षेत्रातील संपादित करण्याचा प्रयत्न २०१० पासून सुरू आहे. त्यापैकी भांडवलदार, मोठे बिल्डर आणि अनेक राजकीय वरदहस्त असलेल्यांच्या सुमारे १५० हेक्टर जमिनी विनाअधिसूचित केल्या. गुंतवणूकदारांच्या गवतपड माळपड जमिनी एमआयडीसीने सोडल्यात आणि गरीब शेतकºयांच्या बागायती जमिनी अनेकदा हरकत देऊन देखील सुटकेची वाट पाहत आहेत.

याबाबत वेळोवेळी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्वरित हरकतींचा अहवाल पाठवून एक-एका गावाचे शिक्के काढण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. शेतकºयांचा विरोध असल्यास जमीन संपादित केली जाणार नाही, असेही स्पष्ट केले होते. तसेच प्रक्रिया तातडीने पूर्ण केल्यानंतर बाकी संमती देणाऱ्या असलग जमिनी घ्यायच्या की नाही, याबाबत निर्णय होईल, असे सांगण्यात आले होते. खातेदारांनी सुनावणीमध्ये आपली हरकत नोंदवली. ज्या खातेदारांना सुनावणीस हजर राहता आले नाही त्यांनी फलटण प्रांत कार्यालयात आपले हरकत अर्ज दाखल केले होते. मात्र ही सर्वच प्रक्रिया ठप्प असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरLand Roverलँड रोव्हर