शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

पावसामुळं गुळाला मिळेना गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:04 IST

आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सातारा, सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यात पूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील गु-हाळघरांना घरघर, गूळ हंगामाची बिकट स्थिती उत्पादनात मोठी घट

स्वप्नील शिंदे ।सातारा : यंदाच्या साखर हंगामाची सुरुवात जशी खडतर सुरू आहे, त्याहीपेक्षा बिकट स्थिती गूळ हंगामाची आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील गुºहाळघरांना घरघर लागली असून, गुºहाळघरांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याच्या आसपास येऊन ठेपली आहे. त्यात महापूर, अतिवृष्टीमुळे गुºहाळघरांची पडझड आणि चुलवाणासाठी आवश्यक असलेले जळण भिजले आहे. त्यात ऊस पाण्याखाली गेल्याने त्यातून गुळाला गोडवा मिळत नसल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सातारा, सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यात पूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते. तसेच काही गुºहाळांची पडझड झाली. या संकटातून सावरून अनेक गुºहाळ चालकांनी गुºहाळ चालू केली. मात्र, आॅक्टोबर महिन्यात दररोज पडत असलेल्या पावसामुळे गुºहाळासाठी आवश्यक असलेले साहित्य भिजून गेले.

दरवर्षी साधारण गौरी-गणपती व दसऱ्याच्या मुहूर्तावर गुºहाळ चालू होत असतात. मात्र, यंदा परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतातून ऊस बाहेर काढताच येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर गुºहाळ सुरू झाली. अनेक दिवस ऊस पाण्याखाली गेल्याने त्यातील गोडवा गायब झाला आहे. त्यामुळे गूळ उत्पादनासाठी गुºहाळघरात दरवर्षी सरासरी एका आदणात २०० ते २५० किलो गूळ तयार होत होता. परंतु सद्य:स्थितीत एका आदणासाठी दीड टन ऊस लागतो. त्यातून १4० ते १७० किलो गूळ तयार होतो. सध्या बाजारपेठेत सरासरी प्रतिक्विंटल ३२०० ते ४००० रुपये दर मिळतो. प्रत्यक्षात शेतकºयाला एका आदणामागे वाहतूक, मजुरी, रसायने, घाणा भाडे आदींसह ८००० ते ८५०० रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे मिळणारे उत्पन्न ६००० ते ६५०० रुपयांपर्यंतच आहे. एका आदणामागे ११०० ते १२०० रुपयांचा तोटा होत आहे.

दर मिळत नसल्याने जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी पर्यंत असलेली गुºहाळघरांची संख्या ५० पर्यंत कमी झाला आहे. भविष्यात गु-हाळघरे शोधायची वेळ येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने गुºहाळांना मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे

साखर कारखान्याला ऊस घातला तर एफआरपीनुसार प्रतिटन २८०० ते २९०० रुपये दर मिळतो. मात्र गूळ उत्पादनातील घसरणीमुळे एक टनाला सर्व खर्च धरून फक्त १७०० ते १८०० रुपयेच मिळत आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी गुºहाळघरांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.- बाळासाहेब नलवडे, गूळ उत्पादकमहापूर आणि परतीचा पाऊस यामुळे अजून १० टक्के गुºहाळ सुरू झाली नाहीत. त्यामुळे बाजारात गुळाची म्हणावी अशी आवक होत नाही. मात्र, आवक होणारा गूळही दर्जेदार नाही. त्यामुळे त्यांना तीन ते साडेतीन हजार रुपये दर मिळत आहे.- उत्तमराव जाधव-भाटवडीकर,आडतदार, क-हाड बाजार समितीसध्या गूळ व्यवसायातील अडचणींमुळे पुरता धोक्यात आला आहे. सुरुवातीला हंगामाच्या मुहूर्तावर सौदे काढताना दराचा जो फुगवटा तयार होतो, तो नंतरच्या काही दिवसांत कमालीचा घटतो. सरकारने साखरेला किमान आधारभूत किंमत जाहीर केल्यामुळे २९०० रुपयांच्या खाली साखर विकता येत नाही. शेतकरी गूळ उत्पादित करतो. मात्र व्यापाºयांच्या मनमानीपणावर गुळाचा दर ठरतात.- सचिन नलवडे, रयत क्रांती संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसर