शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
4
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
5
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
6
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
7
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
8
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
9
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
10
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
11
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
12
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
13
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
14
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
15
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
16
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
17
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
18
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
19
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
20
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?

पावसामुळं गुळाला मिळेना गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:04 IST

आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सातारा, सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यात पूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील गु-हाळघरांना घरघर, गूळ हंगामाची बिकट स्थिती उत्पादनात मोठी घट

स्वप्नील शिंदे ।सातारा : यंदाच्या साखर हंगामाची सुरुवात जशी खडतर सुरू आहे, त्याहीपेक्षा बिकट स्थिती गूळ हंगामाची आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील गुºहाळघरांना घरघर लागली असून, गुºहाळघरांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याच्या आसपास येऊन ठेपली आहे. त्यात महापूर, अतिवृष्टीमुळे गुºहाळघरांची पडझड आणि चुलवाणासाठी आवश्यक असलेले जळण भिजले आहे. त्यात ऊस पाण्याखाली गेल्याने त्यातून गुळाला गोडवा मिळत नसल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सातारा, सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यात पूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते. तसेच काही गुºहाळांची पडझड झाली. या संकटातून सावरून अनेक गुºहाळ चालकांनी गुºहाळ चालू केली. मात्र, आॅक्टोबर महिन्यात दररोज पडत असलेल्या पावसामुळे गुºहाळासाठी आवश्यक असलेले साहित्य भिजून गेले.

दरवर्षी साधारण गौरी-गणपती व दसऱ्याच्या मुहूर्तावर गुºहाळ चालू होत असतात. मात्र, यंदा परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतातून ऊस बाहेर काढताच येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर गुºहाळ सुरू झाली. अनेक दिवस ऊस पाण्याखाली गेल्याने त्यातील गोडवा गायब झाला आहे. त्यामुळे गूळ उत्पादनासाठी गुºहाळघरात दरवर्षी सरासरी एका आदणात २०० ते २५० किलो गूळ तयार होत होता. परंतु सद्य:स्थितीत एका आदणासाठी दीड टन ऊस लागतो. त्यातून १4० ते १७० किलो गूळ तयार होतो. सध्या बाजारपेठेत सरासरी प्रतिक्विंटल ३२०० ते ४००० रुपये दर मिळतो. प्रत्यक्षात शेतकºयाला एका आदणामागे वाहतूक, मजुरी, रसायने, घाणा भाडे आदींसह ८००० ते ८५०० रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे मिळणारे उत्पन्न ६००० ते ६५०० रुपयांपर्यंतच आहे. एका आदणामागे ११०० ते १२०० रुपयांचा तोटा होत आहे.

दर मिळत नसल्याने जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी पर्यंत असलेली गुºहाळघरांची संख्या ५० पर्यंत कमी झाला आहे. भविष्यात गु-हाळघरे शोधायची वेळ येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने गुºहाळांना मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे

साखर कारखान्याला ऊस घातला तर एफआरपीनुसार प्रतिटन २८०० ते २९०० रुपये दर मिळतो. मात्र गूळ उत्पादनातील घसरणीमुळे एक टनाला सर्व खर्च धरून फक्त १७०० ते १८०० रुपयेच मिळत आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी गुºहाळघरांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.- बाळासाहेब नलवडे, गूळ उत्पादकमहापूर आणि परतीचा पाऊस यामुळे अजून १० टक्के गुºहाळ सुरू झाली नाहीत. त्यामुळे बाजारात गुळाची म्हणावी अशी आवक होत नाही. मात्र, आवक होणारा गूळही दर्जेदार नाही. त्यामुळे त्यांना तीन ते साडेतीन हजार रुपये दर मिळत आहे.- उत्तमराव जाधव-भाटवडीकर,आडतदार, क-हाड बाजार समितीसध्या गूळ व्यवसायातील अडचणींमुळे पुरता धोक्यात आला आहे. सुरुवातीला हंगामाच्या मुहूर्तावर सौदे काढताना दराचा जो फुगवटा तयार होतो, तो नंतरच्या काही दिवसांत कमालीचा घटतो. सरकारने साखरेला किमान आधारभूत किंमत जाहीर केल्यामुळे २९०० रुपयांच्या खाली साखर विकता येत नाही. शेतकरी गूळ उत्पादित करतो. मात्र व्यापाºयांच्या मनमानीपणावर गुळाचा दर ठरतात.- सचिन नलवडे, रयत क्रांती संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसर