शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

केवळ निवडणुकांसाठी कोणी रस्त्यावर उतरू नका -सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:08 IST

महाबळेश्वर : ‘शेतकऱ्यांंच्या प्रश्नाचे भांडवल करून अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या; परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत.

ठळक मुद्देमहाबळेश्वरात ‘रयत क्रांती’च्या शिबिराचा समारोप

महाबळेश्वर : ‘शेतकऱ्यांंच्या प्रश्नाचे भांडवल करून अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या; परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. ज्यांनी राजकारण केले त्यांना खरे तर प्रश्न सोडवायचेच नव्हते. कारण जर प्रश्न सुटले तर यांचे राजकारणाचे दुकान कायमचे बंद होणार, ही भीती त्यांना वाटत होती. केवळ निवडणुकांसाठी रस्त्यावर उतरू नका तर सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत राहा,’ असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर येथील भाऊसाहेब माळवदे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, उपाध्यक्ष राहुल मोरे, युवा आघाडीचे अध्यक्ष शार्दुल जाधव, सागर खोत, दीपक भोसले, रवींद्र खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

खोत म्हणाले, ‘येथून गेल्यानंतर तळागाळातील लोकांचे व शेतकºयांचे प्रश्न हाती घ्या. पाणी, आरोग्य, शिक्षण व बेकारी यांचे प्रश्न हाती घ्या. ते सोडविण्यासाठी आक्रमकपणे झोकून देऊन काम करा. वैचारिक संघटन तयार करा. बुद्धिवादी लोकांनाही आपल्या या संघटनेचा हेवा वाटला पाहिजे, त्याचवेळी गुंडांनाही आपल्या संघटनेचा धाक वाटला पाहिजे, अशी संघटना बांधा. मतभेद विसरून संकटात धावून जा. संघटनेतील कोणावर अन्याय झाला तर तो एकाकी पडता कामा नये, अशा पद्धतीने त्याच्या पाठीशी उभे राहा, केवळ निवडणुकांसाठी रस्त्यावर उतरू नका तर सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत राहा.पक्षांच्या प्रवक्त्यांना आता जागरुकपणे काम करावे लागणार आहे. आपल्या संघटनेला केवळ पाच महिने झाले आहेत. एका वर्षात या रोपट्याचे वृक्षात रुपांतर झालं पाहिजे, असे काम करा, असे आवाहन खोत यांनी केले.कडधान्य देण्याची सक्ती नको..पुढील काही महिने तुम्हाला आंदोलने तीव्र करावी लागणार आहेत. पहिले आंदोलन उसाच्या दरासाठी करा. उसाला एफआरपीप्रमाणे कारखान्यांनी दर दिलाच पाहिजे. यासाठी २८ मे रोजी कारखान्यांवर मोटारसायकल मोर्चा काढा आणि निवेदन द्या. दुसरे आंदोलन कडधान्ये नियमनमुक्त करण्यासाठी करावे लागणार आहे. १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करा. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन द्या. आमच्या शेतात पिकलेले कडधान्य आम्ही कोणालाही विकू शकतो. शेती उत्पन्न बाजार समितीमध्येच कडधान्य देण्याची सक्ती आता या पुढे नको, असेही खोत म्हणाले. 

सर्वांना बरोबर घेऊन काम करारयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या आरोग्य शिबिरास माझ्या आमदार फंडातून दोन लाख रुपयांचा निधी मी देणार असल्याची घोषणा खोत यांनी या शिबिरात केली. रयत क्रांती ही संघटना कोणत्या एका विशिष्ट धर्माची अथवा जातीची संघटना नाही. ही संघटना राज्यातील अठरापगड जाती-धर्मातील लोकांची आहे. शेतकरी, दिन-दलित दुबळ्या कष्टकरी जनतेची आहे. या सर्वांना बरोबर घेऊन समाजात काम करा, असे आवाहनही खोत यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी