शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केवळ निवडणुकांसाठी कोणी रस्त्यावर उतरू नका -सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:08 IST

महाबळेश्वर : ‘शेतकऱ्यांंच्या प्रश्नाचे भांडवल करून अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या; परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत.

ठळक मुद्देमहाबळेश्वरात ‘रयत क्रांती’च्या शिबिराचा समारोप

महाबळेश्वर : ‘शेतकऱ्यांंच्या प्रश्नाचे भांडवल करून अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या; परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. ज्यांनी राजकारण केले त्यांना खरे तर प्रश्न सोडवायचेच नव्हते. कारण जर प्रश्न सुटले तर यांचे राजकारणाचे दुकान कायमचे बंद होणार, ही भीती त्यांना वाटत होती. केवळ निवडणुकांसाठी रस्त्यावर उतरू नका तर सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत राहा,’ असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर येथील भाऊसाहेब माळवदे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, उपाध्यक्ष राहुल मोरे, युवा आघाडीचे अध्यक्ष शार्दुल जाधव, सागर खोत, दीपक भोसले, रवींद्र खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

खोत म्हणाले, ‘येथून गेल्यानंतर तळागाळातील लोकांचे व शेतकºयांचे प्रश्न हाती घ्या. पाणी, आरोग्य, शिक्षण व बेकारी यांचे प्रश्न हाती घ्या. ते सोडविण्यासाठी आक्रमकपणे झोकून देऊन काम करा. वैचारिक संघटन तयार करा. बुद्धिवादी लोकांनाही आपल्या या संघटनेचा हेवा वाटला पाहिजे, त्याचवेळी गुंडांनाही आपल्या संघटनेचा धाक वाटला पाहिजे, अशी संघटना बांधा. मतभेद विसरून संकटात धावून जा. संघटनेतील कोणावर अन्याय झाला तर तो एकाकी पडता कामा नये, अशा पद्धतीने त्याच्या पाठीशी उभे राहा, केवळ निवडणुकांसाठी रस्त्यावर उतरू नका तर सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत राहा.पक्षांच्या प्रवक्त्यांना आता जागरुकपणे काम करावे लागणार आहे. आपल्या संघटनेला केवळ पाच महिने झाले आहेत. एका वर्षात या रोपट्याचे वृक्षात रुपांतर झालं पाहिजे, असे काम करा, असे आवाहन खोत यांनी केले.कडधान्य देण्याची सक्ती नको..पुढील काही महिने तुम्हाला आंदोलने तीव्र करावी लागणार आहेत. पहिले आंदोलन उसाच्या दरासाठी करा. उसाला एफआरपीप्रमाणे कारखान्यांनी दर दिलाच पाहिजे. यासाठी २८ मे रोजी कारखान्यांवर मोटारसायकल मोर्चा काढा आणि निवेदन द्या. दुसरे आंदोलन कडधान्ये नियमनमुक्त करण्यासाठी करावे लागणार आहे. १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करा. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन द्या. आमच्या शेतात पिकलेले कडधान्य आम्ही कोणालाही विकू शकतो. शेती उत्पन्न बाजार समितीमध्येच कडधान्य देण्याची सक्ती आता या पुढे नको, असेही खोत म्हणाले. 

सर्वांना बरोबर घेऊन काम करारयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या आरोग्य शिबिरास माझ्या आमदार फंडातून दोन लाख रुपयांचा निधी मी देणार असल्याची घोषणा खोत यांनी या शिबिरात केली. रयत क्रांती ही संघटना कोणत्या एका विशिष्ट धर्माची अथवा जातीची संघटना नाही. ही संघटना राज्यातील अठरापगड जाती-धर्मातील लोकांची आहे. शेतकरी, दिन-दलित दुबळ्या कष्टकरी जनतेची आहे. या सर्वांना बरोबर घेऊन समाजात काम करा, असे आवाहनही खोत यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी