शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

गांधी कुटुंबीयांचे योगदान विसरु नका, शरद पवारांनी मोदींना ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 14:26 IST

एवढा मोठा त्याग केल्यानंतर जे हयात नाहीत, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणं चुकीचं आहे, अशी टीका पवारांनी यावेळी केली. 

सातारा : ‘गांधी घराण्याने देशाला दोन पंतप्रधान दिले. पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली. देशासाठी एवढा मोठा त्याग केलेल्या गांधी घराण्याविषयी बोलताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घ्यावी, त्यांचं लक्षण काही चांगलं नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना ठणकावले. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गुरुवारी खासदार शरद पवार साताऱ्यात आले होते. या कार्यक्रमानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एवढा मोठा त्याग केल्यानंतर जे हयात नाहीत, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणं चुकीचं आहे, अशी टीका पवारांनी यावेळी केली. 

यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, ‘मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, ज्या पदावर ते काम करतात, याची अधिक काळजी घेऊन त्यांनी वक्तव्ये करायला हवीत. बोलताना ते काळजी घेताना दिसत नाहीत. ते रोज गांधीद्वेषाची भाषणे करत आहेत, ते चांगलं लक्षण नाही.’

पंतप्रधानपदावर महाराष्ट्राला संधी मिळू शकते का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘पंतप्रधानपद कुठल्या राज्याला मिळणार, कोणाला मिळणार? हा विषय माझ्यासाठी गौण आहे. आम्हाला परिवर्तन हवे आहे. परिवर्तनाला पोषक स्थिती आता तयार झाली असून त्यासाठी समर्थन देणाºया घटकांना एकत्र करुन एकवाक्यता करावी लागेल. जोपर्यंत ही एकवाक्यता होत नाही, तोपर्यंत एखाद्या राज्याला संधी देण्याबाबत चर्चाही करण्यात येणार नाही. आम्ही पाच वर्षे स्थिर सरकार देणार आहोत.’ 

दरम्यान, ही एकवाक्यता तुम्हीच घडवून आणू शकता, अशी चर्चा आहे? याबाबत विचारले असता पवारांनी, ‘व्यक्तिगत विचार न करता, एकवाक्यता करुन बहुमत कसं तयार करता येईल, यावर आम्ही भर देऊ,’ असे सांगितले. नारायण राणे यांच्या आत्मचरित्राविषयी पत्रकारांनी विचारले असता, ‘राणेंचे आत्मचरित्र हा फार गंभीर विषय आहे. त्यांनी काय लिहिलंय ते वाचल्याशिवाय मला काही बोलता येणार नाही,’ अशी टिपण्णीही त्यांनी यावेळी केली.

लोकसभेसाठी महाराष्ट्रातून आघाडीच्या जागा निश्चित वाढतील, असा विश्वास व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी काँगे्रस आघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीला ४ व काँगे्रसला २  जागा मिळाल्या होत्या. त्यात आता फार सुधारणा होईल. हे मी ज्योतिष सांगत नाही, तर हे मला सरळसरळ दिसतेय. महाराष्ट्रातलाही आकडा मोठा असेल. काही ठिकाणी उत्तम मते मिळतील, तर काही ठिकाणी यश मिळेल; पण मताधिक्य कमी मिळेल. महाराष्ट्रात आघाडीच्या खासदारांचा आकडा वाढलेलाच पाहायला मिळेल.’

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीSharad Pawarशरद पवारIndira Gandhiइंदिरा गांधीElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी