शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

गांधी कुटुंबीयांचे योगदान विसरु नका, शरद पवारांनी मोदींना ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 14:26 IST

एवढा मोठा त्याग केल्यानंतर जे हयात नाहीत, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणं चुकीचं आहे, अशी टीका पवारांनी यावेळी केली. 

सातारा : ‘गांधी घराण्याने देशाला दोन पंतप्रधान दिले. पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली. देशासाठी एवढा मोठा त्याग केलेल्या गांधी घराण्याविषयी बोलताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घ्यावी, त्यांचं लक्षण काही चांगलं नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना ठणकावले. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गुरुवारी खासदार शरद पवार साताऱ्यात आले होते. या कार्यक्रमानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एवढा मोठा त्याग केल्यानंतर जे हयात नाहीत, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणं चुकीचं आहे, अशी टीका पवारांनी यावेळी केली. 

यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, ‘मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, ज्या पदावर ते काम करतात, याची अधिक काळजी घेऊन त्यांनी वक्तव्ये करायला हवीत. बोलताना ते काळजी घेताना दिसत नाहीत. ते रोज गांधीद्वेषाची भाषणे करत आहेत, ते चांगलं लक्षण नाही.’

पंतप्रधानपदावर महाराष्ट्राला संधी मिळू शकते का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘पंतप्रधानपद कुठल्या राज्याला मिळणार, कोणाला मिळणार? हा विषय माझ्यासाठी गौण आहे. आम्हाला परिवर्तन हवे आहे. परिवर्तनाला पोषक स्थिती आता तयार झाली असून त्यासाठी समर्थन देणाºया घटकांना एकत्र करुन एकवाक्यता करावी लागेल. जोपर्यंत ही एकवाक्यता होत नाही, तोपर्यंत एखाद्या राज्याला संधी देण्याबाबत चर्चाही करण्यात येणार नाही. आम्ही पाच वर्षे स्थिर सरकार देणार आहोत.’ 

दरम्यान, ही एकवाक्यता तुम्हीच घडवून आणू शकता, अशी चर्चा आहे? याबाबत विचारले असता पवारांनी, ‘व्यक्तिगत विचार न करता, एकवाक्यता करुन बहुमत कसं तयार करता येईल, यावर आम्ही भर देऊ,’ असे सांगितले. नारायण राणे यांच्या आत्मचरित्राविषयी पत्रकारांनी विचारले असता, ‘राणेंचे आत्मचरित्र हा फार गंभीर विषय आहे. त्यांनी काय लिहिलंय ते वाचल्याशिवाय मला काही बोलता येणार नाही,’ अशी टिपण्णीही त्यांनी यावेळी केली.

लोकसभेसाठी महाराष्ट्रातून आघाडीच्या जागा निश्चित वाढतील, असा विश्वास व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी काँगे्रस आघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीला ४ व काँगे्रसला २  जागा मिळाल्या होत्या. त्यात आता फार सुधारणा होईल. हे मी ज्योतिष सांगत नाही, तर हे मला सरळसरळ दिसतेय. महाराष्ट्रातलाही आकडा मोठा असेल. काही ठिकाणी उत्तम मते मिळतील, तर काही ठिकाणी यश मिळेल; पण मताधिक्य कमी मिळेल. महाराष्ट्रात आघाडीच्या खासदारांचा आकडा वाढलेलाच पाहायला मिळेल.’

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीSharad Pawarशरद पवारIndira Gandhiइंदिरा गांधीElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी