शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

गांधी कुटुंबीयांचे योगदान विसरु नका, शरद पवारांनी मोदींना ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 14:26 IST

एवढा मोठा त्याग केल्यानंतर जे हयात नाहीत, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणं चुकीचं आहे, अशी टीका पवारांनी यावेळी केली. 

सातारा : ‘गांधी घराण्याने देशाला दोन पंतप्रधान दिले. पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली. देशासाठी एवढा मोठा त्याग केलेल्या गांधी घराण्याविषयी बोलताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घ्यावी, त्यांचं लक्षण काही चांगलं नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना ठणकावले. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गुरुवारी खासदार शरद पवार साताऱ्यात आले होते. या कार्यक्रमानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एवढा मोठा त्याग केल्यानंतर जे हयात नाहीत, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणं चुकीचं आहे, अशी टीका पवारांनी यावेळी केली. 

यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, ‘मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, ज्या पदावर ते काम करतात, याची अधिक काळजी घेऊन त्यांनी वक्तव्ये करायला हवीत. बोलताना ते काळजी घेताना दिसत नाहीत. ते रोज गांधीद्वेषाची भाषणे करत आहेत, ते चांगलं लक्षण नाही.’

पंतप्रधानपदावर महाराष्ट्राला संधी मिळू शकते का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘पंतप्रधानपद कुठल्या राज्याला मिळणार, कोणाला मिळणार? हा विषय माझ्यासाठी गौण आहे. आम्हाला परिवर्तन हवे आहे. परिवर्तनाला पोषक स्थिती आता तयार झाली असून त्यासाठी समर्थन देणाºया घटकांना एकत्र करुन एकवाक्यता करावी लागेल. जोपर्यंत ही एकवाक्यता होत नाही, तोपर्यंत एखाद्या राज्याला संधी देण्याबाबत चर्चाही करण्यात येणार नाही. आम्ही पाच वर्षे स्थिर सरकार देणार आहोत.’ 

दरम्यान, ही एकवाक्यता तुम्हीच घडवून आणू शकता, अशी चर्चा आहे? याबाबत विचारले असता पवारांनी, ‘व्यक्तिगत विचार न करता, एकवाक्यता करुन बहुमत कसं तयार करता येईल, यावर आम्ही भर देऊ,’ असे सांगितले. नारायण राणे यांच्या आत्मचरित्राविषयी पत्रकारांनी विचारले असता, ‘राणेंचे आत्मचरित्र हा फार गंभीर विषय आहे. त्यांनी काय लिहिलंय ते वाचल्याशिवाय मला काही बोलता येणार नाही,’ अशी टिपण्णीही त्यांनी यावेळी केली.

लोकसभेसाठी महाराष्ट्रातून आघाडीच्या जागा निश्चित वाढतील, असा विश्वास व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी काँगे्रस आघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीला ४ व काँगे्रसला २  जागा मिळाल्या होत्या. त्यात आता फार सुधारणा होईल. हे मी ज्योतिष सांगत नाही, तर हे मला सरळसरळ दिसतेय. महाराष्ट्रातलाही आकडा मोठा असेल. काही ठिकाणी उत्तम मते मिळतील, तर काही ठिकाणी यश मिळेल; पण मताधिक्य कमी मिळेल. महाराष्ट्रात आघाडीच्या खासदारांचा आकडा वाढलेलाच पाहायला मिळेल.’

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीSharad Pawarशरद पवारIndira Gandhiइंदिरा गांधीElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी