शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

गांधी कुटुंबीयांचे योगदान विसरु नका, शरद पवारांनी मोदींना ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 14:26 IST

एवढा मोठा त्याग केल्यानंतर जे हयात नाहीत, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणं चुकीचं आहे, अशी टीका पवारांनी यावेळी केली. 

सातारा : ‘गांधी घराण्याने देशाला दोन पंतप्रधान दिले. पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली. देशासाठी एवढा मोठा त्याग केलेल्या गांधी घराण्याविषयी बोलताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घ्यावी, त्यांचं लक्षण काही चांगलं नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना ठणकावले. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गुरुवारी खासदार शरद पवार साताऱ्यात आले होते. या कार्यक्रमानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एवढा मोठा त्याग केल्यानंतर जे हयात नाहीत, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणं चुकीचं आहे, अशी टीका पवारांनी यावेळी केली. 

यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, ‘मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, ज्या पदावर ते काम करतात, याची अधिक काळजी घेऊन त्यांनी वक्तव्ये करायला हवीत. बोलताना ते काळजी घेताना दिसत नाहीत. ते रोज गांधीद्वेषाची भाषणे करत आहेत, ते चांगलं लक्षण नाही.’

पंतप्रधानपदावर महाराष्ट्राला संधी मिळू शकते का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘पंतप्रधानपद कुठल्या राज्याला मिळणार, कोणाला मिळणार? हा विषय माझ्यासाठी गौण आहे. आम्हाला परिवर्तन हवे आहे. परिवर्तनाला पोषक स्थिती आता तयार झाली असून त्यासाठी समर्थन देणाºया घटकांना एकत्र करुन एकवाक्यता करावी लागेल. जोपर्यंत ही एकवाक्यता होत नाही, तोपर्यंत एखाद्या राज्याला संधी देण्याबाबत चर्चाही करण्यात येणार नाही. आम्ही पाच वर्षे स्थिर सरकार देणार आहोत.’ 

दरम्यान, ही एकवाक्यता तुम्हीच घडवून आणू शकता, अशी चर्चा आहे? याबाबत विचारले असता पवारांनी, ‘व्यक्तिगत विचार न करता, एकवाक्यता करुन बहुमत कसं तयार करता येईल, यावर आम्ही भर देऊ,’ असे सांगितले. नारायण राणे यांच्या आत्मचरित्राविषयी पत्रकारांनी विचारले असता, ‘राणेंचे आत्मचरित्र हा फार गंभीर विषय आहे. त्यांनी काय लिहिलंय ते वाचल्याशिवाय मला काही बोलता येणार नाही,’ अशी टिपण्णीही त्यांनी यावेळी केली.

लोकसभेसाठी महाराष्ट्रातून आघाडीच्या जागा निश्चित वाढतील, असा विश्वास व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी काँगे्रस आघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीला ४ व काँगे्रसला २  जागा मिळाल्या होत्या. त्यात आता फार सुधारणा होईल. हे मी ज्योतिष सांगत नाही, तर हे मला सरळसरळ दिसतेय. महाराष्ट्रातलाही आकडा मोठा असेल. काही ठिकाणी उत्तम मते मिळतील, तर काही ठिकाणी यश मिळेल; पण मताधिक्य कमी मिळेल. महाराष्ट्रात आघाडीच्या खासदारांचा आकडा वाढलेलाच पाहायला मिळेल.’

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीSharad Pawarशरद पवारIndira Gandhiइंदिरा गांधीElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी