शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

प्रभाग ‘वाय-फाय’, नगरसेवक ‘हाय-फाय’!

By admin | Updated: April 24, 2016 23:40 IST

नागरिकांचे गाऱ्हाणे : ठरवून बिनविरोध नगरसेवक लादू नका; लोकशाहीने दिलेला मताधिकार बजावू द्या

सातारा : पालिकेतील दोन्ही सत्ताधारी आघाड्यांचे नेते जेथे राहतात, त्याच प्रभागातील दोन ब्रिटिशकालीन पुलांच्या नूतनीकरणाला वारंवार स्थगिती कशी मिळते? लोकसंख्या आणि रहदारी वाढत चाललेली असताना या अरुंद पुलांवर अपघात झाले तर जबाबदार कोण? अशा प्रश्नांची सरबत्ती कोटेश्वर चौकाजवळील नागरिकांनी केली. तसेच, चार वर्षं वॉर्डात न फिरकणारे नगरसेवक नेत्यांनी आमच्यावर लादू नयेत. आम्हाला लोकशाहीने दिलेला मताधिकार बजावू द्यावा, असे काही नागरिकांनी खुलेपणाने सांगितले.‘लोकमत आपल्या प्रभागात’ या सुमारे पाच महिने सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सांगता रविवारी प्रभाग पाचमध्ये करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांचे ‘जलमंदिर’ आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ‘सुरुची बंगला’ हे निवासस्थान याच प्रभागात आहे. मनोमिलन पॅटर्नमुळे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, या निवडींना चार वर्षे उलटून गेल्यावर प्रभाग पाचमध्ये काही ठिकाणी समाधान तर काही ठिकाणी रोष दिसून आला. मंगळवार तळे, व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ आदी भागांमधील नागरिकांनी किरकोळ अडचणी वगळता नगरसेवकांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. काही ठिकाणी मात्र बिनविरोध निवडींमुळे समस्यांचे गांभीर्य नगरसेवकांच्या लक्षात येत नसल्याचा सूर आळवण्यात आला. शहरातील या पहिल्यावहिल्या ‘वाय-फाय’ प्रभागातील काही मूलभूत प्रश्न मात्र रखडले आहेत.शुक्रवार पेठेतील कोटेश्वर चौकातून शाहूपुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन मोठे पूल आहेत. हे पूल ब्रिटिशकालीन असून, त्यांची मुदत संपलेली आहे. या पुलांचे रुंदीकरण आणि उंची वाढविण्याचे प्रस्ताव अनेक वर्षे धूळ खात पडले आहेत. नागरिकांच्या सांगण्यानुसार, या पुलांच्या कामाचे तीन वेळा टेंडर निघाले आणि रद्दही झाले. या महत्त्वाच्या कामाला वारंवार स्थगिती मिळतेच कशी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. कोटेश्वर चौकाकडून ओढ्याकडे जाणारी गटारे खोल आणि उघडी आहेत. तसेच चौकात गतिरोधक नाहीत. पथदिवेही बंद असतात. त्यामुळे येथे वारंवार छोटे-मोठे अपघात होतात. ‘अनेकदा गटारात गेलेल्या दुचाकीस्वाराला आम्ही बाहेर काढतो,’ असे सांगणारे नागरिक येथे भेटले. ‘गेल्या चार वर्षांत नगरसेवक आमच्या गल्लीत फिरकले नाहीत. अनेकांना नगरसेवक कोण हेही माहीत नाही. त्यामुळे नेत्यांनी ठरवून बिनविरोध नगरसेवक यापुढे लादू नयेत. आम्हाला मताधिकार बजावू द्यावा,’ असा सूर काहींनी लावला. मटंगे पुलाजवळील ओढ्यात कचऱ्याचे साम्राज्य, सिटीबसच्या वेळी-अवेळी आणि कमी फेऱ्या, पोस्ट आणि पोलिस चौकीसाठी मंगळवार तळ्याजवळ बांधलेल्या बहुउद्देशीय इमारतीत दोन्ही यंत्रणांची कार्यालये अद्याप नसणे, व्यंकटपुरा पेठेत रात्री-अपरात्री गुरगुरणाऱ्या कुत्र्यांची फौज, अनंत इंग्लिश स्कूल चौकात शाळा सुटल्यावर होणारी गर्दी आणि वेगाने जाणारे बाइकर्स, रामाचा गोट येथील त्रिशंकू स्थिती निर्माण झालेल्या भागातील रखडलेला रस्ता, या रस्त्यावरील अतिक्रमणे, ओढ्यालगत भिंती नसल्याने पावसाळ्यात घरात शिरणारे पाणी, व्यंकटपुरा पेठेत तब्बल ४२ वर्षे रेंगाळलेला ड्रेनेजचा प्रश्न, त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि आजारांचा धोका, गोखले हौद ते गडकर आळी रस्त्यावर वारंवार तुंबणारी उघडी गटारे, बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्यांना तक्रारी करूनही मिळणारे अभय अशा काही समस्या नागरिकांनी सांगितल्या. अनेकांना मंगळवार तळ्याचे सुशोभीकरण होऊन एक ‘पिकनिक स्पॉट’ विकसित व्हावा असे वाटते. (लोकमत चमू)