शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग ‘वाय-फाय’, नगरसेवक ‘हाय-फाय’!

By admin | Updated: April 24, 2016 23:40 IST

नागरिकांचे गाऱ्हाणे : ठरवून बिनविरोध नगरसेवक लादू नका; लोकशाहीने दिलेला मताधिकार बजावू द्या

सातारा : पालिकेतील दोन्ही सत्ताधारी आघाड्यांचे नेते जेथे राहतात, त्याच प्रभागातील दोन ब्रिटिशकालीन पुलांच्या नूतनीकरणाला वारंवार स्थगिती कशी मिळते? लोकसंख्या आणि रहदारी वाढत चाललेली असताना या अरुंद पुलांवर अपघात झाले तर जबाबदार कोण? अशा प्रश्नांची सरबत्ती कोटेश्वर चौकाजवळील नागरिकांनी केली. तसेच, चार वर्षं वॉर्डात न फिरकणारे नगरसेवक नेत्यांनी आमच्यावर लादू नयेत. आम्हाला लोकशाहीने दिलेला मताधिकार बजावू द्यावा, असे काही नागरिकांनी खुलेपणाने सांगितले.‘लोकमत आपल्या प्रभागात’ या सुमारे पाच महिने सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सांगता रविवारी प्रभाग पाचमध्ये करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांचे ‘जलमंदिर’ आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ‘सुरुची बंगला’ हे निवासस्थान याच प्रभागात आहे. मनोमिलन पॅटर्नमुळे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, या निवडींना चार वर्षे उलटून गेल्यावर प्रभाग पाचमध्ये काही ठिकाणी समाधान तर काही ठिकाणी रोष दिसून आला. मंगळवार तळे, व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ आदी भागांमधील नागरिकांनी किरकोळ अडचणी वगळता नगरसेवकांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. काही ठिकाणी मात्र बिनविरोध निवडींमुळे समस्यांचे गांभीर्य नगरसेवकांच्या लक्षात येत नसल्याचा सूर आळवण्यात आला. शहरातील या पहिल्यावहिल्या ‘वाय-फाय’ प्रभागातील काही मूलभूत प्रश्न मात्र रखडले आहेत.शुक्रवार पेठेतील कोटेश्वर चौकातून शाहूपुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन मोठे पूल आहेत. हे पूल ब्रिटिशकालीन असून, त्यांची मुदत संपलेली आहे. या पुलांचे रुंदीकरण आणि उंची वाढविण्याचे प्रस्ताव अनेक वर्षे धूळ खात पडले आहेत. नागरिकांच्या सांगण्यानुसार, या पुलांच्या कामाचे तीन वेळा टेंडर निघाले आणि रद्दही झाले. या महत्त्वाच्या कामाला वारंवार स्थगिती मिळतेच कशी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. कोटेश्वर चौकाकडून ओढ्याकडे जाणारी गटारे खोल आणि उघडी आहेत. तसेच चौकात गतिरोधक नाहीत. पथदिवेही बंद असतात. त्यामुळे येथे वारंवार छोटे-मोठे अपघात होतात. ‘अनेकदा गटारात गेलेल्या दुचाकीस्वाराला आम्ही बाहेर काढतो,’ असे सांगणारे नागरिक येथे भेटले. ‘गेल्या चार वर्षांत नगरसेवक आमच्या गल्लीत फिरकले नाहीत. अनेकांना नगरसेवक कोण हेही माहीत नाही. त्यामुळे नेत्यांनी ठरवून बिनविरोध नगरसेवक यापुढे लादू नयेत. आम्हाला मताधिकार बजावू द्यावा,’ असा सूर काहींनी लावला. मटंगे पुलाजवळील ओढ्यात कचऱ्याचे साम्राज्य, सिटीबसच्या वेळी-अवेळी आणि कमी फेऱ्या, पोस्ट आणि पोलिस चौकीसाठी मंगळवार तळ्याजवळ बांधलेल्या बहुउद्देशीय इमारतीत दोन्ही यंत्रणांची कार्यालये अद्याप नसणे, व्यंकटपुरा पेठेत रात्री-अपरात्री गुरगुरणाऱ्या कुत्र्यांची फौज, अनंत इंग्लिश स्कूल चौकात शाळा सुटल्यावर होणारी गर्दी आणि वेगाने जाणारे बाइकर्स, रामाचा गोट येथील त्रिशंकू स्थिती निर्माण झालेल्या भागातील रखडलेला रस्ता, या रस्त्यावरील अतिक्रमणे, ओढ्यालगत भिंती नसल्याने पावसाळ्यात घरात शिरणारे पाणी, व्यंकटपुरा पेठेत तब्बल ४२ वर्षे रेंगाळलेला ड्रेनेजचा प्रश्न, त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि आजारांचा धोका, गोखले हौद ते गडकर आळी रस्त्यावर वारंवार तुंबणारी उघडी गटारे, बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्यांना तक्रारी करूनही मिळणारे अभय अशा काही समस्या नागरिकांनी सांगितल्या. अनेकांना मंगळवार तळ्याचे सुशोभीकरण होऊन एक ‘पिकनिक स्पॉट’ विकसित व्हावा असे वाटते. (लोकमत चमू)