शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

गायरानातल्या बिया करणार गावाला श्रीमंत-जैवविविधता शोधण्यासाठी जिल्ह्यात समिती; वनसंपदेला सोन्याचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:58 IST

आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. मात्र, त्या वनस्पतीचे ज्ञान नसल्यामुळे त्याची किंमत आपल्याला समजत नाही. परिणामी अशा वनसंपदेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव असतो. हे ओळखून शासनाने

दत्ता यादव ।सातारा : आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. मात्र, त्या वनस्पतीचे ज्ञान नसल्यामुळे त्याची किंमत आपल्याला समजत नाही. परिणामी अशा वनसंपदेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव असतो. हे ओळखून शासनाने ग्रामीण भागात वनसंपदा शोधण्यासाठी समिती गठीत केली आहे.

या समितीच्या माध्यमातून परिसरातील वनसंपदा शोधली जाणार आहे. एवढेच नव्हे तर या वनसंपदेला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यात येणार असून, त्यामुळे गावकरी आता श्रीमंत झालेले पाहायला मिळणार आहेत.अनेक व्यापारी गावकऱ्यांकडून वनसंपदा खरेदी करत जातात. त्या शेतकºयाला अथवा जमीन मालकाला त्यांच्याकडून कवडीमोल दर मिळत असतो. त्याच्या दृष्टीने त्याच्याजवळ असलेली वनसंपदा बिनकामी आणि निरोपयोगी वाटत असते. त्यामुळे मिळेल त्या दराने वनसंपदा तो व्यापाºयांच्या पदरात टाकत असतो.

गावोगावी जाऊन वनसंपदा शोधल्यानंतर त्याचे संकलन केले जाणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या बिया, पाने यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून विविध प्रकारची औषधे तयार केली जातात. त्यामुळे वनसंपदेला आता अत्यंत महत्त्व आले आहे. ग्रामीण भागामध्ये करंजीच्या बीया मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात. केवळ पाच ते सात रुपये किलोने या बिया दुकानदारांना विकल्या जातात; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये याच बियांना पाच हजारांच्या घरात दर मिळत असतो. त्यामुळे या वनसंपदेतून गावचा विकास आणि मालकाचीही भरभराटी झाली पाहिजे, हा हेतू ठेवून शासनाने जैवविविधतेचे रक्षण आमचे आम्हीच करू, असा नारा देत गावकºयांना श्रीमंत करण्याचा निर्धार केला आहे.नोंदी गोपनीय असणार..ज्या शेतकºयांच्या किंवा जमीन मालकाच्या बांधावर वनसंपदा सापडणार आहे. त्याला चांगला मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी शासनस्तरावरून आता प्रयत्न सुरू झाले असून, गावच्या परिसरात असलेली वनसंपदा शोधण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये कमीत कमी सात तज्ज्ञ लोक असणार आहेत. या समितीच्या माध्यमातून आपापल्या भागामध्ये फिरून वनसंपदा शोधल्या जाणार आहेत. कोणत्या प्रकारच्या जैवविविधता आहेत, याच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत; परंतु या नोंदी गुप्त ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून वनसंपदा सापडल्यानंतर त्याचा अन्य लोकांकडून गैरफायदा होऊ नये, याची खबरदारी घेतली जाणार आहे. 

ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वनपंदा आहे. या वनसंपदेच्या माध्यमातून गावकºयांनाही याचा मोठा मोबदलला मिळणार आहे. शासनाने नुकतीच यासंदर्भात कार्यशाळा घेतली आहे. याची विस्तृत माहितीही दिली आहे. तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून गावची वनसंपदा सुरक्षित राहाण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.-संजय जाधव (ग्रामविकास अधिकारी)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी