शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

गायरानातल्या बिया करणार गावाला श्रीमंत-जैवविविधता शोधण्यासाठी जिल्ह्यात समिती; वनसंपदेला सोन्याचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:58 IST

आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. मात्र, त्या वनस्पतीचे ज्ञान नसल्यामुळे त्याची किंमत आपल्याला समजत नाही. परिणामी अशा वनसंपदेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव असतो. हे ओळखून शासनाने

दत्ता यादव ।सातारा : आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. मात्र, त्या वनस्पतीचे ज्ञान नसल्यामुळे त्याची किंमत आपल्याला समजत नाही. परिणामी अशा वनसंपदेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव असतो. हे ओळखून शासनाने ग्रामीण भागात वनसंपदा शोधण्यासाठी समिती गठीत केली आहे.

या समितीच्या माध्यमातून परिसरातील वनसंपदा शोधली जाणार आहे. एवढेच नव्हे तर या वनसंपदेला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यात येणार असून, त्यामुळे गावकरी आता श्रीमंत झालेले पाहायला मिळणार आहेत.अनेक व्यापारी गावकऱ्यांकडून वनसंपदा खरेदी करत जातात. त्या शेतकºयाला अथवा जमीन मालकाला त्यांच्याकडून कवडीमोल दर मिळत असतो. त्याच्या दृष्टीने त्याच्याजवळ असलेली वनसंपदा बिनकामी आणि निरोपयोगी वाटत असते. त्यामुळे मिळेल त्या दराने वनसंपदा तो व्यापाºयांच्या पदरात टाकत असतो.

गावोगावी जाऊन वनसंपदा शोधल्यानंतर त्याचे संकलन केले जाणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या बिया, पाने यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून विविध प्रकारची औषधे तयार केली जातात. त्यामुळे वनसंपदेला आता अत्यंत महत्त्व आले आहे. ग्रामीण भागामध्ये करंजीच्या बीया मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात. केवळ पाच ते सात रुपये किलोने या बिया दुकानदारांना विकल्या जातात; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये याच बियांना पाच हजारांच्या घरात दर मिळत असतो. त्यामुळे या वनसंपदेतून गावचा विकास आणि मालकाचीही भरभराटी झाली पाहिजे, हा हेतू ठेवून शासनाने जैवविविधतेचे रक्षण आमचे आम्हीच करू, असा नारा देत गावकºयांना श्रीमंत करण्याचा निर्धार केला आहे.नोंदी गोपनीय असणार..ज्या शेतकºयांच्या किंवा जमीन मालकाच्या बांधावर वनसंपदा सापडणार आहे. त्याला चांगला मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी शासनस्तरावरून आता प्रयत्न सुरू झाले असून, गावच्या परिसरात असलेली वनसंपदा शोधण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये कमीत कमी सात तज्ज्ञ लोक असणार आहेत. या समितीच्या माध्यमातून आपापल्या भागामध्ये फिरून वनसंपदा शोधल्या जाणार आहेत. कोणत्या प्रकारच्या जैवविविधता आहेत, याच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत; परंतु या नोंदी गुप्त ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून वनसंपदा सापडल्यानंतर त्याचा अन्य लोकांकडून गैरफायदा होऊ नये, याची खबरदारी घेतली जाणार आहे. 

ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वनपंदा आहे. या वनसंपदेच्या माध्यमातून गावकºयांनाही याचा मोठा मोबदलला मिळणार आहे. शासनाने नुकतीच यासंदर्भात कार्यशाळा घेतली आहे. याची विस्तृत माहितीही दिली आहे. तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून गावची वनसंपदा सुरक्षित राहाण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.-संजय जाधव (ग्रामविकास अधिकारी)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी