शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

कोयनानगर आपत्तीग्रस्तांबाबत जिल्हा प्रशासन असंवेदनशील : देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST

सातारा : ‘कोयना धरण क्षेत्र परिसरातील व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील पाटण तालुक्यातील पाच व कऱ्हाड तालुक्यातील सात अशा बारा ...

सातारा : ‘कोयना धरण क्षेत्र परिसरातील व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील पाटण तालुक्यातील पाच व कऱ्हाड तालुक्यातील सात अशा बारा भूस्खलन व पूरस्थिती झालेल्या गावांमध्ये पुनर्वसनासह मूलभूत सुविधांच्या केवळ शासकीय घोषणा झाल्या. प्रत्यक्षात या सुविधा पूर्णतः स्वरूपात येथील नागरिकांना पोहोचल्या नाहीत. नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत जिल्हा प्रशासन अत्यंत असंवेदनशील आहे,’ असा आरोप लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक ॲड. वर्षा देशपांडे यांनी केला.

मुक्तांगण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कोयना क्षेत्रातील कामरगाव, हुंबरळी, तोरणे, ढोकावळे, हेळवाक, कोयनानगर रासाटी, दास्ताने, गोष टवाडी, शिरळ त्रिपुडी म्हावशी येथील ग्रामस्थांनी पत्रकारांशी संवाद साधला.

वर्षा देशपांडे म्हणाल्या, ‘व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सात गावांत पूर्ण क्षमतेने मदत पोहोचली नाही. गृहराज्यमंत्री व पालकमंत्री यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये रुग्णांना साधी रुग्णवाहिका मिळू शकत नाही. व्याघ्र प्रकल्पातील गावांना केवळ वर्षभर अनुदानित सिलिंडर मिळाले. मात्र गेल्या दोन वर्षात तेही मिळाले नाहीत. वनविभागाच्या मालकीच्या डोंगर क्षेत्रातील भूस्खलनाची पाहणी करायला वनविभागाचे कर्मचारी फिरकलेसुध्दा नाहीत. या बारा गावांतील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह आज अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची भेट घेतली. पुनर्वसनाच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, मात्र गणेशोत्सवापूर्वी आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन होणे शक्य नाही अशी साचेबद्ध उत्तरे दिली. या गावांमध्ये एनडीआरएफला लागणारी किट आमच्या वतीने पुरविण्यात आली. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची केवळ नौटंकी चालविली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे जिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीत अधीक्षक यांना सहकार्य मागूनही त्यांनी काहीच सहकार्य केले नाही. आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख शेखर ताम्हाणे हा अधिकारी कायम नॉटरिचेबल असतो असा आरोप ॲड. देशपांडे यांनी केला.

चौकट

ऐंशी बंगले ताब्यात घेण्यासाठी आंदोलन

कोयना क्षेत्रातील गावांना मोफत धान्य वितरण. रस्ते व वीज सुविधा, त्यांचे पुनर्वसन, पाणी पुरवठा योजनांचे पूर्णत्व, मोफत गॅस सिलिंडर वाटप, इत्यादी मूलभूत सोयीचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. कोरोनाच्या या लाटेत या विभागातील २२ जणांचा बळी गेला. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने या नागरिकांचे स्वतंत्र पुनर्वसन अत्यावश्यक आहे. या प्रश्नाचा जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा कोयना प्रकल्पाचे रिकामे ८० बंगले ताब्यात घेण्याचे आंदोलन करण्यात येऊन तेथे या आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करू, अशा इशारा ॲड. देशपांडे यांनी दिला.