शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

स्वच्छतेची माहिती देणार दहिवडीतील बोलक्या भिंती : ग्रामस्थांची फलकातून जनजागृती, अनेक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:52 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायतांनी जोरदार तयारी केली असून, १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अभियानात विविध ठिकाणी संदेश देणारे, लोकांना प्रोत्साहित करणारे

ठळक मुद्दे स्वच्छता अभियान-हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.

दहिवडी : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायतांनी जोरदार तयारी केली असून, १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अभियानात विविध ठिकाणी संदेश देणारे, लोकांना प्रोत्साहित करणारे डिजिटल फलक लावले असून, सार्वजनिक भिंतीवर स्वच्छतेचे संदेश देणारी माहिती चित्र रंगवली जात आहेत.

गेली दोन दिवस विटा तसेच स्वच्छतेचे संदेश देणारे पथनाट्य सादर करून दहिवडी परिसर ढवळून काढला आहे. महास्वच्छता अभियान होणार असून, हजारो हात पुढे येऊन सर्व परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार दहिवडीकरांनी केला आहे. यासाठी दहिवडीतील तब्बल ६० ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.

यासाठी स्वच्छता साफसफाई करण्यासाठी लागणारी सामग्री गोळा करण्याचे काम नगरपंचायतीने सुरू केले आहे. लोकांना जास्तीत जास्त साहित्य देण्याचा प्रयत्न केला आहे. जनजागृतीसाठी विविध संघटना, शाळा, रिक्षा संघटना प्रशासकीय कार्यालये पतसंस्था महिला बचतगट यांनाही अभियानात सामील करून घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कॉलेज, महाविद्यालय माध्यमिक शाळा, खासगी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांना स्वच्छतेची शपथ दिली आहे. महास्वच्छता अभियानाची जय्यत तयारी सुरू आहे.दहिवडीकर सज्ज झाले पाच कोटी बक्षीस मिळविण्यासाठी..स्वच्छतेमध्ये असणारा पाच हजार मार्कांचा पेपर प्रत्येक व्यक्तीला समजावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर करून स्वच्छतेचे अ‍ॅप डाऊनलोड करून या स्पर्धेची माहिती घरोघरी देण्याचे काम सुरू आहे. शहरातील सर्व मंडळी राजकीय गटातटाला फाटा देत दहिवडी शहरासाठी एकत्र येत असून, हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.

संपूर्ण शहर स्वच्छतेबरोबरच आपला परिसर स्वच्छ ठेवणे, ओला, सुका कचरा वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करणे खतनिर्मिती करणे, सर्व कचरा घंटागाडीत टाकणे या दहिवडीच्या रोजच्या स्वच्छतेची तसेच ५००० मार्कांची पाहणी करणार आहे. दहिवडी नगरपंचायत पूर्ण क्षमतेने उतरून पाच कोटींचे बक्षीस मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान