शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

स्वच्छतेची माहिती देणार दहिवडीतील बोलक्या भिंती : ग्रामस्थांची फलकातून जनजागृती, अनेक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:52 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायतांनी जोरदार तयारी केली असून, १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अभियानात विविध ठिकाणी संदेश देणारे, लोकांना प्रोत्साहित करणारे

ठळक मुद्दे स्वच्छता अभियान-हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.

दहिवडी : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायतांनी जोरदार तयारी केली असून, १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अभियानात विविध ठिकाणी संदेश देणारे, लोकांना प्रोत्साहित करणारे डिजिटल फलक लावले असून, सार्वजनिक भिंतीवर स्वच्छतेचे संदेश देणारी माहिती चित्र रंगवली जात आहेत.

गेली दोन दिवस विटा तसेच स्वच्छतेचे संदेश देणारे पथनाट्य सादर करून दहिवडी परिसर ढवळून काढला आहे. महास्वच्छता अभियान होणार असून, हजारो हात पुढे येऊन सर्व परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार दहिवडीकरांनी केला आहे. यासाठी दहिवडीतील तब्बल ६० ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.

यासाठी स्वच्छता साफसफाई करण्यासाठी लागणारी सामग्री गोळा करण्याचे काम नगरपंचायतीने सुरू केले आहे. लोकांना जास्तीत जास्त साहित्य देण्याचा प्रयत्न केला आहे. जनजागृतीसाठी विविध संघटना, शाळा, रिक्षा संघटना प्रशासकीय कार्यालये पतसंस्था महिला बचतगट यांनाही अभियानात सामील करून घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कॉलेज, महाविद्यालय माध्यमिक शाळा, खासगी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांना स्वच्छतेची शपथ दिली आहे. महास्वच्छता अभियानाची जय्यत तयारी सुरू आहे.दहिवडीकर सज्ज झाले पाच कोटी बक्षीस मिळविण्यासाठी..स्वच्छतेमध्ये असणारा पाच हजार मार्कांचा पेपर प्रत्येक व्यक्तीला समजावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर करून स्वच्छतेचे अ‍ॅप डाऊनलोड करून या स्पर्धेची माहिती घरोघरी देण्याचे काम सुरू आहे. शहरातील सर्व मंडळी राजकीय गटातटाला फाटा देत दहिवडी शहरासाठी एकत्र येत असून, हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.

संपूर्ण शहर स्वच्छतेबरोबरच आपला परिसर स्वच्छ ठेवणे, ओला, सुका कचरा वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करणे खतनिर्मिती करणे, सर्व कचरा घंटागाडीत टाकणे या दहिवडीच्या रोजच्या स्वच्छतेची तसेच ५००० मार्कांची पाहणी करणार आहे. दहिवडी नगरपंचायत पूर्ण क्षमतेने उतरून पाच कोटींचे बक्षीस मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान