शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वंचित घटकांना दहा जागा सोडल्याशिवाय चर्चा अशक्य : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:40 IST

आरएसएसच्या मदतीने संविधान बदलण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातला असून, सध्या त्यांची केवळ नौटंकी सुरू आहे,’

ठळक मुद्देसंविधान बदलण्याचा घाट पंतप्रधानांनी घातल्याचा आरोप

सातारा : ‘आरएसएसच्या मदतीने संविधान बदलण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातला असून, सध्या त्यांची केवळ नौटंकी सुरू आहे,’ असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, ‘लोकसभा निवडणुकीत वंचित घटक आघाडीला दहा जागा सोडल्या तरच भाजप, शिवसेना विरहित पक्षांशी चर्चेचे दरवाजे उघडे असतील,’ असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर दौरा काढण्यात आला असून, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे गुरुवारी साताऱ्यात आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलवत होते.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ‘सातारा जिल्'ाची समिती गठीत केली असून, त्यानंतर तालुक्याच्या समिती गठीत करण्यात येणार आहे,’ असे सांगून आंबेडकर पुढे म्हणाले, ‘मोदी सरकाच्या विरोधात वातावरण चालले आहे. हे वातावरण डायव्हर्ट करण्यासाठी भाजपाकडून मोदींच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. आत्तापर्यंत किती पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी आली, याची माहिती आरएसएस आणि भाजपाने द्यावी. पंतप्रधान मोदी यांचा जीव वाचविण्यासाठी दुसरा पंतप्रधान नेमावा म्हणजे त्यांच्या जीवाचा खतरा टळेल. शासनाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. काळा पैसा आणतो, अशी केलेली घोषणा ही घोषणाच राहिली.’

अ‍ॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, ‘संविधान मोडण्याचा घटनेत अधिकार नाही, असे असताना डायरेक्ट यूपीएससी अधिकारी नेमून संविधान मोडण्याचा घाट घातला जात आहे. लोकशाहीचे सामाजीकरण आणि सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. काही वर्षांपूर्वी संत कबीर यांच्या जीवनावर एक मालिका प्रसारित होणार होती. मात्र, त्यावेळी भाजपने आंदोलन करून त्याचे प्रसारण थांबविले होते. संत कबीर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरू मानले होते.

मात्र, संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मोदी यांनी गुरू मानले. मोदी यांच्या अशाप्रकारच्या संतांच्या बाबतीतही नौटंकी सुरू आहे.’यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवरही टीका केली. काँग्रेसचे एकला चलोचे राजकारण घातक असून, काँग्रेस अन् शरद पवार भाजपशी लढूच शकत नाहीत.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर