शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

वंचित घटकांना दहा जागा सोडल्याशिवाय चर्चा अशक्य : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:40 IST

आरएसएसच्या मदतीने संविधान बदलण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातला असून, सध्या त्यांची केवळ नौटंकी सुरू आहे,’

ठळक मुद्देसंविधान बदलण्याचा घाट पंतप्रधानांनी घातल्याचा आरोप

सातारा : ‘आरएसएसच्या मदतीने संविधान बदलण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातला असून, सध्या त्यांची केवळ नौटंकी सुरू आहे,’ असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, ‘लोकसभा निवडणुकीत वंचित घटक आघाडीला दहा जागा सोडल्या तरच भाजप, शिवसेना विरहित पक्षांशी चर्चेचे दरवाजे उघडे असतील,’ असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर दौरा काढण्यात आला असून, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे गुरुवारी साताऱ्यात आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलवत होते.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ‘सातारा जिल्'ाची समिती गठीत केली असून, त्यानंतर तालुक्याच्या समिती गठीत करण्यात येणार आहे,’ असे सांगून आंबेडकर पुढे म्हणाले, ‘मोदी सरकाच्या विरोधात वातावरण चालले आहे. हे वातावरण डायव्हर्ट करण्यासाठी भाजपाकडून मोदींच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. आत्तापर्यंत किती पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी आली, याची माहिती आरएसएस आणि भाजपाने द्यावी. पंतप्रधान मोदी यांचा जीव वाचविण्यासाठी दुसरा पंतप्रधान नेमावा म्हणजे त्यांच्या जीवाचा खतरा टळेल. शासनाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. काळा पैसा आणतो, अशी केलेली घोषणा ही घोषणाच राहिली.’

अ‍ॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, ‘संविधान मोडण्याचा घटनेत अधिकार नाही, असे असताना डायरेक्ट यूपीएससी अधिकारी नेमून संविधान मोडण्याचा घाट घातला जात आहे. लोकशाहीचे सामाजीकरण आणि सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. काही वर्षांपूर्वी संत कबीर यांच्या जीवनावर एक मालिका प्रसारित होणार होती. मात्र, त्यावेळी भाजपने आंदोलन करून त्याचे प्रसारण थांबविले होते. संत कबीर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरू मानले होते.

मात्र, संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मोदी यांनी गुरू मानले. मोदी यांच्या अशाप्रकारच्या संतांच्या बाबतीतही नौटंकी सुरू आहे.’यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवरही टीका केली. काँग्रेसचे एकला चलोचे राजकारण घातक असून, काँग्रेस अन् शरद पवार भाजपशी लढूच शकत नाहीत.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर