शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुन्हा मुलींचाच डंका !

By admin | Updated: June 7, 2016 07:34 IST

दहावी परीक्षा : ४० हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण; ९३.५२ टक्के निकाल

सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सातारा जिल्ह्याने कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक मिळविला. जिल्ह्याचा निकाल ९३.५२ टक्के लागला असून, सर्वाधिक उत्तीर्ण होण्यात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. या परीक्षेत ४० हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. सातारा जिल्हा हा कोल्हापूर विभागात येतो. कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.८९ टक्के इतका लागला आहे. या विभागात सातारा जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक ९४.८४ टक्के इतका निकाल कोल्हापूर जिल्ह्याचा तर सर्वात कमी सांगलीचा निकाल ९२.९६ टक्के इतका लागला आहे. विभागात सर्वाधिक प्रमाणात मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विभागातील मुलांची उत्तीर्णची टक्केवारी ९२.८१ टक्के असून, मुलींची टक्केवारी ९५.२२ टक्के आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २.४१ टक्के इतके अधिक आहे. जिल्ह्यातील ४३,५५० मुलांपैकी ४३ हजार ४९५ जणांनी परीक्षा दिली होती. प्रत्यक्षात ४० हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी २३ हजार ७३५ विद्यार्थ्यांपैकी २१ हजार ८८२ जण उत्तीर्ण झाले. १९ हजार ७६० मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी १८ हजार ७९४ उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.११ टक्के तर मुलींचे ९५.११ टक्के आहे. दरम्यान, या परीक्षेत फलटण येथील मुधोजी हायस्कूलच्या मयूर शेंडगे याने ९९ टक्के गुण मिळविले. तसेच साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालयातील यश सत्रे याला ९८.४० टक्के, अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातील प्राजक्ता पवार ९८ टक्के, मुधोजी हायस्कूल फलटणच्या गौरव लखन नाळे ९७.६० टक्के, खटाव येथील लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूलमधील जास्मीन झारी ९६.६ टक्के, म्हसवड येथील प.पू. आत्मगिरी माध्यमिक विद्यालयातील संध्या धनवडे ९६.४० टक्के, देऊर येथील मुधाई हायस्कूलच्या अभिजित वेळेकर ९५.८८ टक्के, साताऱ्यातील कन्या शाळेच्या क्रांती भुजबळ ९५.४० टक्के तसेच म्हसवडच्या सिद्धनाथ हायस्कूलच्या अंकिता अब्दागिरे हिने ९४.६० टक्के गुण मिळविले. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील दहावी परीक्षेची गुणवत्ता चांगली आहे. यावर्षी सातारा जिल्हा विभागात दुसरा आला आहे. यापुढे अधिकाधिक विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण कसे मिळवतील याकडे लक्ष देण्यात येणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (माध्यमिक स्तर) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी निकाल आणखी चांगला लागलेला दिसेल. - देवीदास कुलाळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग