शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

आंतरधर्मीय-आंतरजातीय विवाह संबधित समिती स्थापन करणे चुकिचे - दिलीप वळसे पाटील 

By प्रमोद सुकरे | Updated: December 15, 2022 19:55 IST

आंतरधर्मीय-आंतरजातीय विवाह संबधित समिती स्थापन करणे चुकिचे असल्याचे दिलीप वळसे यांनी म्हटले.  

कराड (सातारा) : आंतरधर्मीय- आंतरजातीय विवाह संबधित समिती स्थापन करणे हा अतिशय चुकीचा विचार आहे. राजकीय भूमिकेमधून लव्ह जिहाद सारखा प्रश्न निर्माण करून आज त्यामध्ये नविन कायदा निर्माण करण्याबाबत चर्चा होते. ती या देशाच्या राज्यघटनेशी सुसंगत नाही. घटना अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देत नाही. या निर्णयामुळे समाजा- समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम होत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केला आहे.

कराड येथे विजय दिवस समारोह तर्फे दिला जाणारा जीवन गाैरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमासाठी दिलीप वळसे- पाटील आले होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, नंदकुमार बटाणे, प्रशांत यादव,प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. एकीकडे राज्यात लव जिहादच्या विरोधात मोर्चे निघत आहेत. आमदार नितेश राणे हे कायदा केला जावा, यासाठी आग्रही असताना दुसरीकडे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मात्र घटनेत कोठेही विषय नाही. त्यामुळे या विरोधात कायदा करण्याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वळसे पाटील म्हणाले, राज्यात नव्हे तर देशात इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हे तर देशांशी संबधित प्रश्न आहे. केवळ महापुरूषांची बदनामी नव्हे तर इतिहास पुसण्याचे आणि बदलण्याचे काम सुरू आहे. काही अजेंडा सेट करून अशी वक्तव्ये केली जात आहेत आणि इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारच्या कामाबाबत आम्ही अजिबात समाधानी नाही. सध्याचे सरकार अजूनही सभा- समारंभात गुंतलेले आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्टे देण्याचा काम केलेले आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र विकासकामे रखडलेले असल्याचे माजी गृहमंत्री दिलीप- वळसे पाटील यांनी सांगितले.

मोर्चा निघणारचमहाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मोर्चाला  सरकारने परवानगी दिली पाहिजे. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. परंतु परवानगी मिळो अगर न मिळो हा महाविकास आघाडीचा मोर्चा निघणारच असे, दिलीप वळसे- पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

 

 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलState Governmentराज्य सरकारmarriageलग्न