शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

धोम धरणाच्या गाळात दडलाय काळ !

By admin | Updated: March 16, 2016 23:38 IST

डोहात उडी, मृत्यूशी गाठ : तहान भागविणाऱ्या जलाशयानं घेतले अनेकांचे जीव; सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा

वाई : दूरवर पसरलेला जलाशय अन् मनाला मोहिनी घालणारं निसर्गसौदर्य असं हे हिरव्या कोंदणात असलेलं ठिकाण म्हणजे वाई तालुक्यातील धोम धरण. पाचगणी, महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकांना धोम धरणाचा डोह जणू भुरळ पाडतो. म्हणूनच धोमच्या डोहात डुंबण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. पण हाय... डोळ्यांना सुखावणारा आणि कोरडे घसे ओलावणारा हा जलाशय गाळाचं प्रमाण वाढल्यानं चक्क माणसांच्याच जिवावर उठलाय. धरणे ही राष्ट्रीय सपत्ती मानली जाते. सातारा जिल्ह्यात कोयना धरणानंतर वाई तालुक्यातील धोम धरण महत्त्वाचे मानले जाते. या धरणामुळे वीज, शेती सिंचन, पिण्याचे पाणी हे प्रश्न सोडविण्यात मदत झाली आहे. या धरणामुळे अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. गेल्या चार दशकांपासून माणसासह पशु-पक्ष्यांची तहान भागविणाऱ्या धोम धरणाकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. असुरक्षितता वाढली आहे. प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे बनले आहे.महाबळेश्वरमध्ये उगम पावणाऱ्या कृष्णा नदीवर धोम येथे १३.५० टीएमसी क्षमतेच्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. ३८२.३२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असलेल्या धरणाचे पाणलोट क्षेत्र २१७.५६ चौरस किलोमीटर आहे. तर बुडित क्षेत्र २४०० हेक्टर इतके आहे. धरणनिर्मितीत ४२ गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या धरणामुळे राज्यातील हजारो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. दुष्काळी खंडाळा, फलटण तालुक्यातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची सोय होऊन अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. धोम धरणातून बोगद्याने खंडाळा तालुक्यात कालव्याने पाणी नेले आहे व यासाठी धोम बलकवडी या दुसऱ्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. पाचगणी, महाबळेश्वरला फिरण्यासाठी येणारे पर्यटक धोम धरण परिसरातील येथील निसर्गसौंदर्यामुळे आवर्जून भेटी देतात. या भागात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. चित्रसृष्टीलाही या परिसराने जणू वेड लावले आहे. परंतु वर्षानुवर्षे पावसाळ्यात डोंगराउतारावरील माती धरणाच्या पाण्यात वाहत जाऊन धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पर्यटक पोहोण्यासाठी पाण्यात उतरतात पण अंदाज न आल्यामुळे गाळात अडकतात. या गाळामुळे आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (प्रतिनिधी)प्रवासी लाँचला झुडपांचा विळखाधरणाच्या जलाशयात फिरण्यासाठी प्रवासी लाँचची सोय करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून ही लाँच धरणाच्या संरक्षक भिंतीजवळ पडून आहे. झाडाझुडपांच्या विळख्यात ही बोट अडकलेली पाहायला मिळते. मोडकळीस आलेल्या या बोटीला सुरक्षित ठिकाणी ठेवावे, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.संरक्षक कठडे ढासळले, सुरक्षा चौक्या मोडकळीसधरणाच्या भिंतीवरील संरक्षक कठड्याचे बांधकाम ढासळले आहे. विजेचे दिवे नादुरुस्त झाले आहेत. वाई-जांभळी रस्त्यावरील गेटवरही कोणतीही सुरुक्षा व्यवस्था राहिलेली नाही. सुरक्षा चौक्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.पोलिस संरक्षण नाहीधरणाच्या सुरक्षेसाठी पूर्वी पोलिस बंदोबस्त असायचा. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी पाठविले जात नाहीत. पूर्वी तीन पोलिस कर्मचारी व एक अधिकारी धोम धरणावर सुरक्षिततेसाठी असायचे. सध्या येथे नऊ ते दहा कर्मचारी असून त्यात वॉचमन, वायरलेस आॅपरेटर व देखरेखीसाठी मजूर अशी कामे करतात. कामगार निवृत्तीनंतर त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या झाल्या नाहीत. मद्याच्या बाटल्या अन् प्लास्टिक कचऱ्याचा खचधोम धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची व नागरिकांची मोठी संख्या आहे. काही पर्यटक धरणाच्या काठावर बसून मद्यपान करतात अन् बाटल्या तेथेच फेकून देतात. तसेच प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास, पिशव्या अशा कचऱ्याचा जागोजागी खच पडला आहे. याबाबत धरण व्यवस्थापनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.