शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

धोम धरणाच्या गाळात दडलाय काळ !

By admin | Updated: March 16, 2016 23:38 IST

डोहात उडी, मृत्यूशी गाठ : तहान भागविणाऱ्या जलाशयानं घेतले अनेकांचे जीव; सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा

वाई : दूरवर पसरलेला जलाशय अन् मनाला मोहिनी घालणारं निसर्गसौदर्य असं हे हिरव्या कोंदणात असलेलं ठिकाण म्हणजे वाई तालुक्यातील धोम धरण. पाचगणी, महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकांना धोम धरणाचा डोह जणू भुरळ पाडतो. म्हणूनच धोमच्या डोहात डुंबण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. पण हाय... डोळ्यांना सुखावणारा आणि कोरडे घसे ओलावणारा हा जलाशय गाळाचं प्रमाण वाढल्यानं चक्क माणसांच्याच जिवावर उठलाय. धरणे ही राष्ट्रीय सपत्ती मानली जाते. सातारा जिल्ह्यात कोयना धरणानंतर वाई तालुक्यातील धोम धरण महत्त्वाचे मानले जाते. या धरणामुळे वीज, शेती सिंचन, पिण्याचे पाणी हे प्रश्न सोडविण्यात मदत झाली आहे. या धरणामुळे अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. गेल्या चार दशकांपासून माणसासह पशु-पक्ष्यांची तहान भागविणाऱ्या धोम धरणाकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. असुरक्षितता वाढली आहे. प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे बनले आहे.महाबळेश्वरमध्ये उगम पावणाऱ्या कृष्णा नदीवर धोम येथे १३.५० टीएमसी क्षमतेच्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. ३८२.३२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असलेल्या धरणाचे पाणलोट क्षेत्र २१७.५६ चौरस किलोमीटर आहे. तर बुडित क्षेत्र २४०० हेक्टर इतके आहे. धरणनिर्मितीत ४२ गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या धरणामुळे राज्यातील हजारो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. दुष्काळी खंडाळा, फलटण तालुक्यातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची सोय होऊन अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. धोम धरणातून बोगद्याने खंडाळा तालुक्यात कालव्याने पाणी नेले आहे व यासाठी धोम बलकवडी या दुसऱ्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. पाचगणी, महाबळेश्वरला फिरण्यासाठी येणारे पर्यटक धोम धरण परिसरातील येथील निसर्गसौंदर्यामुळे आवर्जून भेटी देतात. या भागात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. चित्रसृष्टीलाही या परिसराने जणू वेड लावले आहे. परंतु वर्षानुवर्षे पावसाळ्यात डोंगराउतारावरील माती धरणाच्या पाण्यात वाहत जाऊन धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पर्यटक पोहोण्यासाठी पाण्यात उतरतात पण अंदाज न आल्यामुळे गाळात अडकतात. या गाळामुळे आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (प्रतिनिधी)प्रवासी लाँचला झुडपांचा विळखाधरणाच्या जलाशयात फिरण्यासाठी प्रवासी लाँचची सोय करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून ही लाँच धरणाच्या संरक्षक भिंतीजवळ पडून आहे. झाडाझुडपांच्या विळख्यात ही बोट अडकलेली पाहायला मिळते. मोडकळीस आलेल्या या बोटीला सुरक्षित ठिकाणी ठेवावे, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.संरक्षक कठडे ढासळले, सुरक्षा चौक्या मोडकळीसधरणाच्या भिंतीवरील संरक्षक कठड्याचे बांधकाम ढासळले आहे. विजेचे दिवे नादुरुस्त झाले आहेत. वाई-जांभळी रस्त्यावरील गेटवरही कोणतीही सुरुक्षा व्यवस्था राहिलेली नाही. सुरक्षा चौक्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.पोलिस संरक्षण नाहीधरणाच्या सुरक्षेसाठी पूर्वी पोलिस बंदोबस्त असायचा. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी पाठविले जात नाहीत. पूर्वी तीन पोलिस कर्मचारी व एक अधिकारी धोम धरणावर सुरक्षिततेसाठी असायचे. सध्या येथे नऊ ते दहा कर्मचारी असून त्यात वॉचमन, वायरलेस आॅपरेटर व देखरेखीसाठी मजूर अशी कामे करतात. कामगार निवृत्तीनंतर त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या झाल्या नाहीत. मद्याच्या बाटल्या अन् प्लास्टिक कचऱ्याचा खचधोम धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची व नागरिकांची मोठी संख्या आहे. काही पर्यटक धरणाच्या काठावर बसून मद्यपान करतात अन् बाटल्या तेथेच फेकून देतात. तसेच प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास, पिशव्या अशा कचऱ्याचा जागोजागी खच पडला आहे. याबाबत धरण व्यवस्थापनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.