शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धरणांमुळे साताऱ्याचा चौफेर विकास (संडे स्पेशल)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST

सातारा जिल्हामध्ये कोयना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती होते. जिल्ह्यातील कन्हेर, उरमोडी, धोम, धोम बलकवडी असे मोठे प्रकल्प तर येरळवाडी, ...

सातारा जिल्हामध्ये कोयना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती होते. जिल्ह्यातील कन्हेर, उरमोडी, धोम, धोम बलकवडी असे मोठे प्रकल्प तर येरळवाडी, नेर, रानंद, आंधळी हे मध्यम प्रकल्प जनतेसाठी वरदान ठरलेले आहेत. जिल्ह्यामध्ये माण, खटाव, फलटण, खंडाळा या अवर्षणप्रवण तालुक्यांमध्ये वेळोवेळी दुष्काळ पडत असल्याने ज्या तालुक्यांसाठी धरणात साठवलेल्या पाण्याचा उपयोग होतो. धरणातील मुबलक पाण्यामुळे जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढले आहे, त्याचबरोबर लोकांना पिण्याच्या पाण्याची भ्रांतदेखील मिटलेली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी साठवण्याच्या आनुषंगाने सामाजिक उपक्रमातून अनेक कामे झाली. त्यामुळे बहुतांश ठिकाणी वॉटर बकेट तयार झाले. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने दुष्काळी भागातही आता पाणी पाहायला मिळत आहे.

सिंचन विभागाकडून कालवा सल्लागार समितीच्या सूचनेनुसार धरणांतील पाणी कालव्यात सोडले जाते. पाटातील पाण्याच्या रब्बी हंगामासाठी तीन पाळ्या, खरीप हंगामासाठी दोन पाळ्या तर उन्हाळा अन् गावासाठी तीन पाळ्या दिल्या जातात. धरणांतील पाणी कालव्यामध्ये सोडले जाते, त्यामुळे लाभक्षेत्रातील विहिरी बोरवेल यांना बारमाही पाणी राहते याचा फायदा शेतीसाठी तसेच पिण्यासाठीदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहे.

धरण निहाय वापरले जाणारे पाणी (सर्व आकडे टीएमसीमध्ये)

कोयना एकूण क्षमता १०५.२५ , जिवंत साठा १००.२५, सिंचनासाठी ३७.५, पिण्यासाठी २.६८, जलविद्युतसाठी ६७.५

कन्हेर एकूण क्षमता १०.१, जिवंत पाणीसाठा ९.५९, सिंचनासाठी ९.४, पिण्यासाठी २.१६, औद्योगिक वापरासाठी ०.१९,

उरमोडी एकूण क्षमता ९.९६, जिवंत पाणीसाठा ९.६५, सिंचनासाठी ८.९४, पिण्यासाठी ०.१७७, औद्योगिक वापरासाठी ०.००४

धोम एकूण क्षमता १३.५, जिवंत पाणीसाठा ११.६९, सिंचनासाठी ७.५८, पिण्यासाठी २.६४, औद्योगिक वापरासाठी ०.२३,

धोम बलकवडी एकूण क्षमता ४.०८, जिवंत पाणीसाठा ३.९६, सिंचनासाठी २.७, पिण्यासाठी ०.०७

सातारा जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १०,४८,४००

जिल्ह्यामध्ये ११ मोठे, १७ मध्यम, ६७ लघू, ७ उपसा सिंचन योजना तर ६४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असे सिंचन प्रकल्प आहेत.

जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये ७,९०९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झालेला आहे. या प्रकल्पाची एकूण सिंचनक्षमता ७,७१,२७२ हेक्टर आहे. जिल्ह्यामध्ये एकूण प्रत्यक्ष सिंचनाखाली असलेली ३,१८,४२५ हेक्टर इतकी जमीन आहे.

- सागर गुजर