शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

ढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:50 IST

खंडाळा तालुक्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. खरिपाची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे अवकाळीची बाधा संपली नसतानाच आता दूषित हवामानाची बाधा शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

ठळक मुद्देढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच

दशरथ ननावरे खंडाळा : तालुक्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. खरिपाची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे अवकाळीची बाधा संपली नसतानाच आता दूषित हवामानाची बाधा शेतकऱ्यांवर ओढवली आहे.खंडाळा तालुक्याच्या शेतीचे आॅगस्टमधील पावसातच मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातला. यामध्ये बहुतांशी शेती पाण्याखाली गेली. शेतामध्ये पाणी घुसल्याने पिकाचेही मोठे नुकसान झाले. विशेषत: पिके कणसासह पाण्यात बुडाली, त्यामुळे मोठे नुकसान झाले.गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणाचे सावट राहिल्याने खंडाळा तालुक्यातील विविध भागातील ऊस, भुईमूग, टोमॅटो, कांदा तसेच कडधान्याची पिके व काही फळबागा यावर याचा मोठा परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोग, नवीन ऊस लागवडीवर तांबेरा, भाजीपाल्याच्या पिकावर अळीचा व किडीचा प्रादुर्भाव तसेच वेलीवर्गातील पिकांवर मुरकुटा रोग पसरण्याची भीती वाढली आहे.खंडाळा तालुकाच्या एकूण क्षेत्रापैकी खरीप हंगामात ९ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती. यापैकी तालुक्याच्या ६७ गावांमधील १३ हजार ११८ शेतकऱ्यांचे ४ हजार ४२४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे समोर आले. नुकसानीतून बाहेर पडण्यापूर्वीच दूषित हवामानाने घेरल्याने शेतकरी संकटात आहे. 

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संपूर्ण पिकांचे नुकसान झाले असतानाच आता ढगाळ हवामानाच्या कोंडीत शेतकरी सापडलाय. आमच्या नवीन ऊस लागवडीवर तांबेरा आणि करपा रोग पसरण्याची भीती आहे. अगोदरच शेतकरी उघड्यावर आला असताना हे पुन्हा संकट म्हणजे दुष्काळात तेरावा अशी स्थिती आहे.- अ‍ॅड. सचिन धायगुडे,शेतकरी बोरी

ढगाळ वातावरणाने कांदा पिकाची पात मुरकटली आहे. तसेच काही ठिकाणी करपा रोगाची लागण होऊ लागलीय. सुरुवातीच्या वाढीलाच प्रादुर्भाव झाल्याने पिकांची उत्पादन क्षमता घटते. शेतीवर एकामागे एक संकट राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त होईल.- नवनाथ ससाणे, शेतकरी अंदोरी

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर