शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:50 IST

खंडाळा तालुक्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. खरिपाची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे अवकाळीची बाधा संपली नसतानाच आता दूषित हवामानाची बाधा शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

ठळक मुद्देढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच

दशरथ ननावरे खंडाळा : तालुक्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. खरिपाची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे अवकाळीची बाधा संपली नसतानाच आता दूषित हवामानाची बाधा शेतकऱ्यांवर ओढवली आहे.खंडाळा तालुक्याच्या शेतीचे आॅगस्टमधील पावसातच मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातला. यामध्ये बहुतांशी शेती पाण्याखाली गेली. शेतामध्ये पाणी घुसल्याने पिकाचेही मोठे नुकसान झाले. विशेषत: पिके कणसासह पाण्यात बुडाली, त्यामुळे मोठे नुकसान झाले.गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणाचे सावट राहिल्याने खंडाळा तालुक्यातील विविध भागातील ऊस, भुईमूग, टोमॅटो, कांदा तसेच कडधान्याची पिके व काही फळबागा यावर याचा मोठा परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोग, नवीन ऊस लागवडीवर तांबेरा, भाजीपाल्याच्या पिकावर अळीचा व किडीचा प्रादुर्भाव तसेच वेलीवर्गातील पिकांवर मुरकुटा रोग पसरण्याची भीती वाढली आहे.खंडाळा तालुकाच्या एकूण क्षेत्रापैकी खरीप हंगामात ९ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती. यापैकी तालुक्याच्या ६७ गावांमधील १३ हजार ११८ शेतकऱ्यांचे ४ हजार ४२४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे समोर आले. नुकसानीतून बाहेर पडण्यापूर्वीच दूषित हवामानाने घेरल्याने शेतकरी संकटात आहे. 

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संपूर्ण पिकांचे नुकसान झाले असतानाच आता ढगाळ हवामानाच्या कोंडीत शेतकरी सापडलाय. आमच्या नवीन ऊस लागवडीवर तांबेरा आणि करपा रोग पसरण्याची भीती आहे. अगोदरच शेतकरी उघड्यावर आला असताना हे पुन्हा संकट म्हणजे दुष्काळात तेरावा अशी स्थिती आहे.- अ‍ॅड. सचिन धायगुडे,शेतकरी बोरी

ढगाळ वातावरणाने कांदा पिकाची पात मुरकटली आहे. तसेच काही ठिकाणी करपा रोगाची लागण होऊ लागलीय. सुरुवातीच्या वाढीलाच प्रादुर्भाव झाल्याने पिकांची उत्पादन क्षमता घटते. शेतीवर एकामागे एक संकट राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त होईल.- नवनाथ ससाणे, शेतकरी अंदोरी

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर