शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:50 IST

खंडाळा तालुक्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. खरिपाची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे अवकाळीची बाधा संपली नसतानाच आता दूषित हवामानाची बाधा शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

ठळक मुद्देढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच

दशरथ ननावरे खंडाळा : तालुक्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. खरिपाची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे अवकाळीची बाधा संपली नसतानाच आता दूषित हवामानाची बाधा शेतकऱ्यांवर ओढवली आहे.खंडाळा तालुक्याच्या शेतीचे आॅगस्टमधील पावसातच मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातला. यामध्ये बहुतांशी शेती पाण्याखाली गेली. शेतामध्ये पाणी घुसल्याने पिकाचेही मोठे नुकसान झाले. विशेषत: पिके कणसासह पाण्यात बुडाली, त्यामुळे मोठे नुकसान झाले.गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणाचे सावट राहिल्याने खंडाळा तालुक्यातील विविध भागातील ऊस, भुईमूग, टोमॅटो, कांदा तसेच कडधान्याची पिके व काही फळबागा यावर याचा मोठा परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोग, नवीन ऊस लागवडीवर तांबेरा, भाजीपाल्याच्या पिकावर अळीचा व किडीचा प्रादुर्भाव तसेच वेलीवर्गातील पिकांवर मुरकुटा रोग पसरण्याची भीती वाढली आहे.खंडाळा तालुकाच्या एकूण क्षेत्रापैकी खरीप हंगामात ९ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती. यापैकी तालुक्याच्या ६७ गावांमधील १३ हजार ११८ शेतकऱ्यांचे ४ हजार ४२४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे समोर आले. नुकसानीतून बाहेर पडण्यापूर्वीच दूषित हवामानाने घेरल्याने शेतकरी संकटात आहे. 

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संपूर्ण पिकांचे नुकसान झाले असतानाच आता ढगाळ हवामानाच्या कोंडीत शेतकरी सापडलाय. आमच्या नवीन ऊस लागवडीवर तांबेरा आणि करपा रोग पसरण्याची भीती आहे. अगोदरच शेतकरी उघड्यावर आला असताना हे पुन्हा संकट म्हणजे दुष्काळात तेरावा अशी स्थिती आहे.- अ‍ॅड. सचिन धायगुडे,शेतकरी बोरी

ढगाळ वातावरणाने कांदा पिकाची पात मुरकटली आहे. तसेच काही ठिकाणी करपा रोगाची लागण होऊ लागलीय. सुरुवातीच्या वाढीलाच प्रादुर्भाव झाल्याने पिकांची उत्पादन क्षमता घटते. शेतीवर एकामागे एक संकट राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त होईल.- नवनाथ ससाणे, शेतकरी अंदोरी

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर