शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

बंद महामंडळाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाणार : दीपक पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 16:20 IST

बंद पडलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी घड्याळाच्याच चिन्हावर लढविणार आहे. या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे हटाव, सातारा-जावळी बचाव असाच नारा देऊन घराणेशाही संपविणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी दिली.

ठळक मुद्देबंद महामंडळाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाणार : दीपक पवारशिवेंद्रसिंहराजेंची घराणेशाही हटविणार; साताऱ्यात भाजपला मोठा धक्का

सातारा : बंद पडलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी घड्याळाच्याच चिन्हावर लढविणार आहे. या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे हटाव, सातारा-जावळी बचाव असाच नारा देऊन घराणेशाही संपविणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी दिली.साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली. यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दीपक पवार पुढे म्हणाले,२०१४ च्या निवडणुकीत भाजपला सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार मिळत नव्हता. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी केल्यानंतर मला निवडणूक लढविण्यास सांगितले. शेवटच्या दिवशी भाजपची उमेदवारी मिळाली. प्रचारासाठी अवघे १२ दिवस शिल्लक असल्याने मतदारसंघात फारसे फिरत आले नाही. तरीही विरोधी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात चांगली मते घेतली.

या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्याचा पुढील आमदार आपल्याला भाजपचा करायचा म्हणून सांगितलं. त्यासाठी मतदारसंघात पाच वर्षे फिरतोय. प्रत्येक घरात पक्ष नेला. सातारा नगरपालिकेत प्रथमच भाजपचं पॅनेल टाकलं. तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी जावळीतून मताधिक्य दिलं. त्यानंतर जावळी आपल्या मागे नाही, हे ओळखूनच शिवेंद्रसिंहराजे भाजपात आले.भाजपच्या वरिष्ठांनी शिवेंद्रसिंहराजेंना पक्षात घेतले आणि साताऱ्याच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. यावरून आमचे कार्यकर्ते म्हणाले, सातारा-जावळी विधानसभेची निवडणूक लढवायची. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

दि. २२ सप्टेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सातारा दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी पक्षप्रवेश करणार आहे. सातारा विधानसभेची निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढविणार असून, शिवेंद्रसिंहराजे हटाव, सातारा-जावळी बचाव नारा देत त्यांची घराणेशाही संपविणार आहे. या निवडणुकीत माझ्याबरोबर भाजपचे अनेक बुथप्रमुख आणि पदाधिकारी असणार आहेत, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.वसुलीच्या महामंडळाकडे एक रुपयाचाही फंड नाही...पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ हे बंद पडलेलं आहे. त्याचं गॅझेटही झालेलं नाही. मी महामंडळ घेत नसतानाही ते मला दिलं. हे एक प्रकारचं गाजर दाखविण्याचं काम झालं असून, महामंडळाकडे एक रुपयाचा फंडही नाही. उलट ७०० कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे एकप्रकारे हे वसुलीचंच महामंडळ आहे का काय ? असा प्रश्न पडतो. भाजपने माझी प्रतारणा केली असलीतरी मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविषयी माझ्या मनात रोष नाही. फक्त शिवेंद्रसिंहराजेंना हटविण्यासाठीच हा निर्णय घेतलाय, असेही दीपक पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेSatara areaसातारा परिसरBJPभाजपाPoliticsराजकारण