शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

उदयनराजेंच्या आदेशानंतरच निर्णय : साळुंखे

By admin | Updated: January 26, 2016 00:56 IST

जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत तळ्यात-मळ्यात

सातारा : जिल्हा परिषदेच्या चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तयार असले तरी दोन पदाधिकारी अजूनही मुदतवाढीच्या मागणीवर अडून बसले आहेत. उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी तर ‘उदयनराजेंच्या आदेशाशिवाय मी कसा निर्णय घेणार?,’ असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. गोरेंचे उपोषण, नाराजांचा पक्षत्याग, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे बंड अशा घटनांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काही दिवसांपासून खळबळ माजली आहे. या परिस्थितीत विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर, आ. शशिकांत शिंदे या नेते मंडळींनी पक्षातील ‘पॅचवर्क’बाबत कोणतेच भाष्य केले नव्हते. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती; पण रविवारी राष्ट्रवादी भवनात हे दोन्ही एकत्र आले. त्यांनी सर्व आमदार व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढला. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत ही नेतेमंडळी ठाम आहेत. चार पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याबाबत सकारात्मकता दाखविली असली तरी उदयनराजे समर्थक असणारे रवी साळुंखे यांच्यासह जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण समितीचे सभापती अमित कदम हे राजीनामा देण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे. हा तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादीची नेतेमंडळी प्रयत्न करत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी बोलून तोडगा काढावा लागणार असल्याने त्यांच्याशी बोलणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. मात्र, उदयनराजेंशी कोणी बोलायचे? याबाबत निर्णय झालेला नाही. आमदार शशिकांत शिंदे अथवा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांपैकी एकावर ही जबाबदारी सोपविली जाणार आहे. आ. शिंदे यांनी अमित कदम यांची समजूत घालण्यासाठी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. (प्रतिनिधी) अमित कदमांना उपाध्यक्षपद ? जिल्हा परिषदेच्या मागील पदाधिकारी निवडीवेळी अमित कदम हे उपाध्यक्षपदासाठी अडून बसले होते; पण त्यांना शिक्षण व अर्थ समितीचे सभापतिपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली होती. आता उपाध्यक्षपदासाठी ते आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी पक्षाकडे राजीनामा दिलेला नाही. कदमांना उपाध्यक्षपद देऊन तोडगा काढायचा की नव्यांना संधी द्यायची, याबाबत हालचाली नेतेमंडळींनी सुरू केल्या आहेत.  

उदयनराजे भोसले माझे नेते आहेत. उपाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत त्यांनी मला सूचना केलेली नाही. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी कामकाजाच्या अनुषंगाने सूचना केल्या होत्या. मी स्वत: हून त्यांना राजीनामा देऊ का?, असे कसे विचारू? - रवी साळुंखे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद