शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : शाळा बंदचा निर्णय म्हणजे दार उघडं आणि मोरीला बोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 16:17 IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्व सुरू ठेऊन शाळा बंद करण्याचा निर्णय झालाच तर तो ‘दार उघडं आणि मोरीला बोळा’ असाच असणार आहे.

सातारा : कोरोनाची लागण सुरू झाल्यापासून दोन्ही लाटांमध्ये शाळा बंद करण्याच्या पर्यायावर अधिक भर देण्यात आला. शाळेत विद्यार्थी जातात म्हणून ती बंद करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. मात्र, हेच विद्यार्थी त्यांच्या पालकांबरोबर ज्या ज्या ठिकाणी फिरतात ती ठिकाणं मात्र सुरू ठेवण्यात येतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्व सुरू ठेऊन शाळा बंद करण्याचा निर्णय झालाच तर तो ‘दार उघडं आणि मोरीला बोळा’ असाच असणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पुण्यासह मुंबईतील शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा व्यवस्थापनांनी या निर्णयाला विरोध करण्याची संधीही प्रशासनाने त्यांना दिली नाही. महानगरांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातही शाळा बंदचा आदेश येऊ शकतो, याची धास्ती शाळांनी घेतली आहे.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडात विद्यार्थ्यांचे झालेले मानसिक आणि शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळा प्रयत्नशील असताना पुन्हा शाळा बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांशी खेळ केल्यासारखं होईल. समवयस्कांबरोबर वावरण्याबरोबरच शैक्षणिक प्रवाहात येण्याच्या प्रयत्नात असतानाच पुन्हा शाळा बंदचा निर्णय त्यांची मोठी वाताहात करणारा ठरेल, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात.

दोन वर्षांच्या कोरोना प्रादुर्भावानंतर गेल्या तीन महिन्यांपासून शाळा सुरू झाल्या. या तीन महिन्यात जिल्ह्यातील कोणत्याही शाळेतून विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे ऐकिवात नाही. संकट येणार आणि त्याच्याशी सामना करण्याची सवय मुलांना लावणं आता गरजेचं आहे. त्यामुळे शाळा बंद करून संकटाला घाबरून मुलांना आणि या पिढीला भित्रे बनवणे अयोग्य आहे. - राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, खासगी शाळा संघटना

 

मुलांचे भावविश्व वेगळे आहे. पालकांनी मुलांशी संवाद साधण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही समवयस्कांबरोबर व्यक्त होण्यातला आनंद काही वेगळाच असतो. सगळं सरसकट बंद असताना मुलांना आऊटसोर्स होण्यासाठी मुलांसाठी शाळा हे उत्तम माध्यम असताना वारंवार त्यावरच बंदी आणणे मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी धोक्याचे आहे. - अतुल शहा, शिक्षणतज्ज्ञ, सातारा

 

शाळेत गेल्यामुळे मुलांना त्यांच्या वयाचे सवंगडी मिळत आहेत. पण शाळांमध्ये अजूनही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घेण्यासाठी शालेय यंत्रणा असक्षम असल्याचे आढळून आले आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यात विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे आढळून आले नाही, पण भविष्यातही येणार नाही हे गृहित धरणं चुकीचे आहे. - प्रशांत मोदी, सातारा जिल्हा पालक संघ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा