शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

मृत्यूला कवटाळतानाही वाचविले इतरांचे प्राण

By admin | Updated: January 12, 2015 21:48 IST

साखरवाडी : प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या चालकाने अखेरच्या क्षणीही दाखविली कर्तव्यदक्षता

साखरवाडी : न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी या साखर कारखान्याचे चालक भारत शिंदे यांना गाडी चालविताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या धक्क्यातून सावरणे शक्य नसतानाही शेवटच्या क्षणापर्यंत कर्तव्य बजावत कारखान्याचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील व अन्य तीन व्यक्तींना कोणतीही इजा होऊ न देता गाडी थांबवून शिंदे यांनी अखेरचा श्वास घेतला.मंगळवार, दि. ६ जानेवारी... दुपारची वेळ... साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक प्रल्हादराव साळुंखे-पाटील साखर व्यापारी विजय करवा व अन्य दोघांना घेऊन कारखान्याच्या कामानिमित्त त्यांच्या कारमधून अकलूजकडे निघाले होते. ड्रायव्हर म्हणून कारखान्याचे ट्रान्सपोर्ट विभागातील चालक भारत हणंमत शिंदे (वय ५१, रा. साखरवाडी, मूळगाव तांबवे, ता. फलटण) होते. गाडी साखरवाडी -फलटणमार्गे अकलूजकडे भरधाव वेगाने चालली होती. कार पिंपरद, ता. फलटण गावाजवळ आली असता चालक भारत शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी पिंपरद गावाजवळील मंगल कार्यालयाचे पुढे लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. या तीव्र झटक्यातून सावरणे शक्य नसल्याचे शिंदे यांना जाणवले. त्यांनी त्या गंभीरप्रसंगातूनही गाडी नियंत्रणात आणून रस्त्याकडेला उभी केली आणि ती बंद करण्याआधीच अखेरचा श्वास घेतला. प्रल्हाद पाटील व इतर तिघांना काय झाले हे लगेच समजलेच नाही.भारत शिंदे हे १९९९ पासून न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर काखान्यातील ट्रान्सपोर्ट विभागात चालक म्हणून कार्यरत होते. त्यांना साखर कामगारांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्य गेटवर शोकसभा घेण्यात आली. यावेळी युनियनचे माजी अध्यक्ष पोपटराव भोसले यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी बाळासाहेब भोसले, मारुती माडकर, चंद्रशेखर किरपेकर, सीताराम माने उपस्थित होते. (वार्ताहर)शर्थीचे प्रयत्न अयशस्वीअचानक घडलेल्या गंभीर प्रसंगाने प्रल्हाद पाटलांसह सर्वचजण घाबरले होते. यातून गाडी बंद करणेही लवकर जमले नाही. त्यातूनही सावरत प्रल्हाद पाटील यांनी प्रसंगावधान राखून भारत शिंदे यांना तातडीने फलटण येथे उपचारासाठी आणले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.